शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
4
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
5
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
6
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
7
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
8
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
9
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
10
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
11
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
12
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
13
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
14
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
15
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
16
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
17
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
18
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
19
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
20
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!

..त्यामुळे नाणार, बारसू यापैकी कोणतेही प्रकल्प कोकणात होणार नाहीत; भास्कर जाधवांचा भाजपवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 12:42 IST

४० आमदार जे विकास करायला गेलेत यांची बुद्धी घाण पडली आहे. तुम्हीच मंजूर केलेल्या कामांना स्टे दिला जातो. तरीही शिंदे गटाचे मंत्री गप्प का?

दापोली : भाजपला महाराष्ट्रात प्रकल्प करायचेच नाहीत. त्यामुळे नाणार आणि बारसू यापैकी कोणतेही प्रकल्प कोकणात होणार नाहीत. भाजपचे केंद्रात सरकार आहे, त्यांना हे प्रकल्प करणे केव्हाही सहज शक्य आहे. मात्र, विरोधाचे थातूरमातूर कारण देऊन भाजपचे राजकारण सुरू आहे, असा आराेप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते व आमदार भास्कर जाधव यांनी केला.दापोली तालुका भगवा सप्ताहनिमित्त ते साेमवारी (१६ राेजी) दापोलीत बोलत होते. ते पुढे म्हणाले की, लाखो तरुणांच्या रोजगाराचा घास पळविण्याचे काम सरकारने केले. अखंड देश, महाराष्ट्र जेव्हा कोविडशी लढत होता, तेव्हा देवेंद्र फडणवीस फक्त राजकारण करत होते.सकाळ - संध्याकाळ पत्रकार परिषदा घेऊन चांगले काम करणाऱ्या माणसाचे केवळ खच्चीकरण करण्याचे काम भाजपने सुरू ठेवले होते, असा आराेप भास्कर जाधव यांनी केला.ते पुढे म्हणाले की, लाखो कोटींचे प्रकल्प बाहेर पाठवायचे आणि ३०० कोटींचा प्रकल्प आणायचे एवढेच काम शिंदे-फडणवीस सरकारने केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना गुजरात सोडून इतर ठिकाणी मोठा प्रकल्प द्यायचे नाहीत, असे सांगितले. त्यांना महाराष्ट्राला प्रकल्प द्यायचे नाहीत एवढं त्यांचे हृदय मोठे नाही, असा आराेपही जाधव यांनी केला.महाराष्ट्र ही देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे ती दुबळी करण्याचा प्रयत्न भाजपकडून सतत सुरू आहे. राज्यातील प्रकल्प बाहेर घालवून मुख्यमंत्री दाओसला गेलेत, तिथे जाऊन आता काहीच फायदा होणार नाही. झालाच तर आम्ही तुमचे स्वागत करतो. दाओसला ते केवळ पर्यटन भेट म्हणून जाऊन येतील. त्यांच्या पदरात काहीही पडणार नाही, अशी टीका त्यांनी केली.जाधव म्हणाले, अनेक प्रकल्प येऊ पाहत आहेत. परंतु, त्यांना कोणताही प्रकल्प आणायचा नाही. फक्त शिवसेनेला बदनाम करायचे एवढेच सुरू आहे. प्रकल्प आणायचे असेल तर आणा, वर्षात एकही प्रकल्प येथे आणला नाहीच; पाणी योजना पण आणली नाही, असा आराेप त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला. ४० आमदार जे विकास करायला गेलेत यांची बुद्धी घाण पडली आहे. तुम्हीच मंजूर केलेल्या कामांना स्टे दिला जातो. तरीही शिंदे गटाचे मंत्री गप्प का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPoliticsराजकारणBhaskar Jadhavभास्कर जाधवBJPभाजपा