शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
5
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
7
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
8
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
9
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
10
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
11
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
12
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
13
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
14
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
15
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
16
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
17
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
18
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
19
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
20
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
Daily Top 2Weekly Top 5

‘शिपयार्ड’चे कर्मचारी वाऱ्यावर

By admin | Updated: August 28, 2015 23:41 IST

आर्थिक मंदीचे कारण : युनियनकडून कणखर भूमिका हवी

दापोली : तालुक्यातील उसगाव येथील भारती शिपयार्ड कंपनी व्यवस्थापनाने आर्थिक मंदीचे कारण पुढे करून सामान्य कर्मचाऱ्यांना वेठीस धरले आहे. या प्रकरणी कामगार युनियनने कर्मचाऱ्यांच्या बाजूने कणखर भूमिका न घेतल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.गेल्या तीन वर्षापूर्वीपासूनचा दिवाळी बोनस, ओव्हरटाईम, फरकाच्या रकमा, प्रमोशन तसेच मागील सहा महिन्यांचा पगार कंपनीने थकवल्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. मुलांच्या शिक्षणाची, घरातील व्यक्तींच्या आजारपणाची, तसेच इतर गरजांची पूर्तता कोठून करायची हा यक्ष प्रश्न कामगारांपुढे आवासून उभा ठाकलेला आहे. मात्र, भारतीय कामगार सेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी भारती शिपयार्ड कंपनीमध्ये स्थापन केलेल्या युनियन कमिटीस याचे कोणतेच सोयरसुतक नाही, असे दिसते. गेल्या ३ वर्षांपासून कामगार युनियन कमिटीने कामगारांच्या कोणत्याही समस्या जाणून घेतलेल्या नाहीत. तसेच कामगारांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न देखील केलेला नाही. याउलट कामगार कमिटीने कंपनी व्यवस्थापनाशी जवळीक साधून आपल्या स्वत:चे प्रमोशन करून घेतले. तसेच थकीत पगारापैकी आपल्या स्वत:च्या काही रकमा काढून घेतल्या. कामगार कमिटीच्या नावाखाली कमिटी अध्यक्षांनी स्वत:चे नावावरती हाऊस किपिंंगचे कान्टॅ्रक्ट घेऊन लाखो रूपयांचा फायदा करून कामगार बांधवांची फसवणूक केली आहे. एखादा कामगार युनियन कमिटीकडे जाब विचारावयास गेल्यास त्याला कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली जाते. त्यामुळे कामगारांच्या मनात दहशत निर्माण झाली आहे. कामगार युनियन कमिटीचा बेजबाबदारपणा, त्यांची हुकुमशाही यामुळे कंपनीत अनुचित प्रकार घडत आहेत. या सर्व प्रकरणात भारतीय कामगार सेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्वरीत लक्ष घालून कामागारांवर होत असणाऱ्या अन्यायाची चौकशी करावी. कामगारांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नये. अन्यथा संतप्त कामागारांकडून काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास कंपनी प्रशासन, लेबर कमिशन जबाबदार राहतील. या सर्वप्रकाराची संबंधित शासकीय अ$ि$िधकाऱ्यांनी सखोल चौकशी करून कामगारांना त्यांचा न्याय हक्क मिळवून द्यावा अशी मागणी कामगारांकडून करण्यात येत आहे. (वार्ताहर)