शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
2
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
3
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
4
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
5
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
6
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
7
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
8
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
9
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
10
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
11
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
12
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
13
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
14
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
15
IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?
16
Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
17
लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
18
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
19
Video - अतूट बंध! तू एकटी नाहीस... कॅन्सरशी लढणाऱ्या पत्नीसाठी पतीनेही कापले स्वत:चे केस
20
किम जोंगच्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास थेट अणुबॉम्बच टाकणार, उत्तर कोरियाने घेतला मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अस्मानी संकटाचा दुसरा फटकाही मजबूत, आधी अतिवृष्टीने हिरावून नेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 13:42 IST

वर्षभर काबाडकष्ट केल्यानंतर हाता-तोंडाशी आलेला पिकाचा घास निसर्गाच्या अवकृपेमुळे हिरावला गेल्याने संगमेश्वर तालुक्यातील शेतकरी हतबल झाला आहे. आधीच अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेले भातपीक परतीच्या पावसाने मातीमोल केले. त्यात तालुक्यातील ३० टक्क्यांहून अधिक भातशेतीचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देआधी अतिवृष्टीने हिरावून नेले, वादळसदृश पावसाने आणखी घाव घातलेशेतकऱ्यांची व्यथा अधिकच गडद

सचित मोहिते

देवरूख : वर्षभर काबाडकष्ट केल्यानंतर हाता-तोंडाशी आलेला पिकाचा घास निसर्गाच्या अवकृपेमुळे हिरावला गेल्याने संगमेश्वर तालुक्यातील शेतकरी हतबल झाला आहे. आधीच अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेले भातपीक परतीच्या पावसाने मातीमोल केले. त्यात तालुक्यातील ३० टक्क्यांहून अधिक भातशेतीचे नुकसान झाले आहे.

यावर्षी कोकणात चांगला पाऊस बरसला होता. त्यामुळे भाताचे पीक चांगले मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली होती. मात्र, ऑगस्टमध्ये संततधार कोसळलेल्या पावसाने अनेक ठिकाणी शेतीचे नुकसान झाले. यानंतर भातशेती कापणीच्या ऐन हंगामात संगमेश्वर तालुक्यात पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या भात पिकाचे अपरिमित नुकसान झाले आहे.

शेतकरी शेतावर वर्षभर राबत असतो. अपार कष्ट करुन घाम गाळून तो शेती पिकवितो आणि जेव्हा तयार झालेली शेती पिवळी धमक सोनेरी होते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान असते. मात्र, याच्या उलट जेव्हा परिस्थिती ओढवते. तेव्हा हाच शेतकरी हबकून जातो. मात्र, तरीही तो हिंमत हरत नाही.

कुजलेल्या अवस्थेतीलदेखील भाताचा एक एक दाणा निवडून घरी आणण्याचा प्रयत्न करतो. यावेळी शेतकऱ्यांच्या घामाबरोबरच डोळ्यांतून अश्रू देखील ओघळले जातात आणि म्हणूनच जेव्हा वर्षभर केलेल्या श्रमाचे चीज होत नाही तेव्हा शेतकरी वर्गाला खऱ्या अर्थाने भरीव मदतीची गरज असते. अशीच प्रतिक्रिया सर्वसामान्य शेतकरी वर्गामधून तालुक्यातून उमटत आहे.

संगमेश्वर तालुका हा भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण आहे. साखरप्याच्या टोकापासून ते आरवलीपर्यंत वसलेला आहे. या तालुक्यातील बोंड्ये, मारळ, निवे, खडीकोळवण, साखरपा, कोंडगाव, वांझोळे, बामणोली, आंगवली, मुरादपूर, हातीव, देवरुख, कोसुंब, करंबेळे, तेºहे, माभळे, बावनदी, परचुरी, कोळंबे, माखजन दशक्रोशी, कसबा, पंचक्रोशी आदी गावांमधील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

पाऊस, ढगाळ वातावरण आणि क्यार वादळ अशा तिहेरी संकटात भातपीक सापडले. त्यामुळे उभे असलेले पीक काही दिवसांपूर्वी आलेल्या क्यार वादळात भुईसपाट झाले. जोडीला पावसाची रिपरित असल्याने शेतात पडलेल्या भाताला कोंब येण्याची प्रक्रिया सुरू झाली. तर काही ठिकाणी भात पूर्णत: कुजले आहे.

विविध संघटना आणि वृत्तपत्रातून जोरदार मागणी झाल्यानंतर शासनाने दखल घेतली आणि पंचनामे सुरू झाले. काही गावांतील पंचनामे पूर्ण झाले आहेत. मात्र, अनेक गावांतून भातशेती कुजलेल्या अवस्थेत असतानाही कापण्यात आली होती. जे काही मिळेल ते भात हाती यावे, अशा विचाराने ते कापण्यात आले. मात्र अशा शेतीच्या नुकसानाचे पंचनामे केले नसल्याचे अनेक शेतकरी भरपाईपासून वंचित राहणार आहेत.

कापलेल्या शेतीचेही होणार पंचनामे

नुकसान झालेली शेती कापली असेल आणि अशा शेतकऱ्यांनी बाधित क्षेत्र आपल्या गावातील पंचनामा करणाऱ्या तलाठी, ग्रामसेवक, कृषीपर्यवेक्षक यांच्या निदर्शनास आणून दिले तरीही पंचनामे केले जातील, असेही नायब तहसीलदार अनिल गोसावी यांनी स्पष्ट केले आहे. याबरोबरच ज्या शेतकऱ्यांचे शेतीच्या नुकसानाचे पंचनामे झाले नसतील, अशा शेतकऱ्यांनी देवरूख तहसीलदार कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षाशी (०२३५४) २६००२४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन तहसीलदार सुहास थोरात यांनी केले आहे.

कसणाऱ्याला भरपाई मिळावी

तालुक्यातील अनेक शेतकरी दुसऱ्याची शेती कसताना दिसत आहेत. वर्षानुवर्षे सुरू असलेली जमीन कसण्याची परंपरा अनेक ठिकाणी अजूनही सुरू आहे. मात्र, भरपाई मिळते जमीन मालकांना. जमीन कसणाऱ्याला भरपाई मिळावी, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटत आहे.


संगमेश्वर तालुक्यात एकूण १९६ इतकी गावे आहेत. ११ हजार ६१३ हेक्टर आर इतके क्षेत्र लागवडीखालील असल्याची माहिती कृषी विभागाकडून प्राप्त झाली आहे. या ११,६१३ हेक्टर लागवडीखालील क्षेत्रापैकी ३५५.५५ हेक्टर क्षेत्र सध्या बाधित झाले असल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाकडून वर्तविला जात आहे, तर ऑगस्ट महिन्यामध्ये आलेल्या पुरामुळे २६०.७९ हेक्टर इतके क्षेत्र बाधित झाले आहे. सोमवारपर्यंत ५,२५९ शेतकऱ्यांचे १०५९.५३ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.
 

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसRatnagiriरत्नागिरी