शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

सागरी मासेमारी ठप्प; २०० कोटींचे नुकसान- सागरी वाऱ्यांमुळे मच्छीमारी नौका बंदरातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2020 11:55 AM

समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या नौका वाऱ्याचा वेग वाढल्याने मासेमारी न करताच माघारी फिरल्या असून, वारा कमी होण्याची प्रतीक्षा करीत आहेत.

ठळक मुद्देनिसर्गाच्या अवकृपेने जिल्ह्यातील सागरी मासेमारीचे करोडोंचे नुकसान, भरपाई नाहीच.संपलेल्या ६ महिन्यांच्या हंगामातील ४ महिने सागरी मासेमारी ठप्पच.हंगामातील महा, क्यार यासारख्या चार वादळांनी सागरी मासेमारीचे कंबरडेच मोडले परकीय चलनातही मोठी घट.

रत्नागिरी : पावसाळ्यानंतर सुरू झालेल्या सागरी मासेमारी व्यवसायाला गेल्या ६ महिन्यांपासून संकटांच्या गर्तेतून जावे लागत आहे. गेल्या पंधरवड्यापासून सातत्याने सागरी वारे वाहू लागल्याने सागरातील मासेमारी ठप्प झाली आहे. गजबजलेल्या मिरकरवाडा व अन्य मासेमारी बंदरांमध्ये मासेमारी नौका नांगरून ठेवण्यात आल्या आहेत. सहा महिन्यांच्या संपलेल्या हंगामात मासेमारी व्यवसायाचे सुमारे २०० कोटींचे नुकसान झाले आहे.दिनांक १ जून ते ३१ जुलै २०१९ या दोन महिन्यांच्या काळात पावसाळी मासेमारीला बंदी होती. १ ऑगस्ट २०१९पासून पारंपरिक तर १ सप्टेंबर २०१९पासून पर्ससीन मासेमारी सुरू झाली. मात्र, निसर्गाची अवकृपा सातत्याने सागरी मासेमारीच्या मुळावर आली. ऑगस्ट महिन्यात पावसामुळे संपूर्ण महिना मासेमारी होऊ शकली नाही. १ सप्टेंबर २०१९ ते ३१ जानेवारी २०२० या पाच महिन्यांच्या काळात तुफानी वारे, अतिवृष्टी यामुळे सागरी मासेमारी ३ महिन्यांपेक्षा अधिक काळ ठप्प होती. त्यामुळे संपलेल्या सहा महिन्यातील एकूण ४ महिने मासेमारी हंगाम चाललाच नाही.दिनांक ३१ डिसेंबर २०१९ला पर्ससीन मासेमारीचा चार महिन्यांचा हंगामही संपुष्टात आला. आधीच चार महिने हंगाम असताना तोही हातातून गेल्याने पर्ससीन मासेमारीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे मत्स्योत्पादनात या हंगामात मोठी घट झाली आहे. पर्ससीन मासेमारी १ जानेवारी २०२०पासून बंद झालेली असली तरी पारंपरिक मासेमारी सुरू आहे. मात्र, जिल्ह्याच्या सागरी क्षेत्रात काही बेकायदा पर्ससीन, मिनी पर्ससीन, परराज्यातील घुसखोर मासेमारी नौका तसेच एलईडी मासेमारीचे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे पारंपरिक मच्छिमारांच्या जाळ्यातही मासळीच येत नसल्याचे पारंपरिक मच्छिमारांचे म्हणणे आहे.समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या नौका वाऱ्याचा वेग वाढल्याने मासेमारी न करताच माघारी फिरल्या असून, वारा कमी होण्याची प्रतीक्षा करीत आहेत. गेल्या सहा दिवसांपासून या नौका बंदरांमध्ये नांगरून ठेवण्यात आल्या आहेत. मासेमारीवरील संकटांमुळे पर्ससीन मासेमारी, पारंपरिक मच्छीमारी प्रकारांमधील रापण, होडीतून वल्हवून मासेमारी करणारे तियानीवाले, आऊटबोर्ड इंजिनच्या सहाय्याने होणारी गिलनेट मासेमारी, बलावाद्वारे होणारी मासेमारी तसेच मच्छी विक्रेत्या महिला, मासळी वाहतूक करणारे हातगाडी-रिक्षा टेम्पो, बर्फ कारखानदार, मच्छीमारी सहकारी संस्था, मासेमारीचे साहित्य विकणारे, मासळी एजंट, हॉटेल्स, पर्यटन व्यावसायिक यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.यंदाच्या हंगामात सागरी मासेमारीला ग्रहण लागले आहे. जिल्ह्याच्या बाजारपेठेतील उलाढालीवरही त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. मच्छिमारांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने जिल्ह्यात मत्स्यदुष्काळ जाहीर करावा व मच्छिमारांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे. जिल्ह्यातील सागरी मासेमारी ठप्प झाल्याने, ४ महिने हंगाम वाया गेल्याने मच्छिमारांचे संपलेल्या हंगामामध्ये सुमारे २०० कोटींपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. मासेमारी व्यवसायातून शासनाला करोडोंचे परकीय चलन मिळते. परंतु, यावेळी परकीय चलनात मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे. त्यावरून मच्छिमारांचे किती नुकसान झाले, याचा अंदाज शासनालाही घेता येईल, असे मच्छीमार नेते नदीम सोलकर म्हणाले.मत्स्यदुष्काळ जाहीर करासागरी मासेमारीवर सातत्याने गेल्या सहा महिन्यांच्या हंगामात संकटे आली. हंगामात चारवेळा महा, क्यारसारखी वादळे झाली. अवकाळी पावसाने शेतीचे, मासेमारीचे करोडोंचे नुकसान झाले. शेतकऱ्यांना काही प्रमाणात शासनाची मदत मिळाली. मात्र, मच्छिमारांना प्रचंड नुकसान होऊनही मदत मिळालेली नाही, असे मच्छीमार नेते नदीम सोलकर यांनी ह्यलोकमतह्णला सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीkonkanकोकणfishermanमच्छीमार