शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
3
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
7
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
8
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
9
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
10
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
11
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
12
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
13
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
14
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
15
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
16
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
17
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
18
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
19
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
20
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली

रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:22 IST

जिल्ह्यातील सर्वच रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. काही रस्त्यांवर तात्पुरते पॅचवर्क आलेले होते. त्यावर लाखो रुपये खर्च करण्यात ...

जिल्ह्यातील सर्वच रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. काही रस्त्यांवर तात्पुरते पॅचवर्क आलेले होते. त्यावर लाखो रुपये खर्च करण्यात आले होते. मात्र, या खड्ड्यांमुळे पुन्हा केलेला खर्च पाण्यात गेलेला आहे. राष्ट्रीय महामार्ग, ग्रामीण व शहरी मार्गावरून दररोज वाहनांवर जाणाऱ्या वाहनचालकांना तसेच प्रवाशांना या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे खूप त्रास सहन करावा लागत आहे. महामार्गावरील रस्त्यांची परिस्थिती पाहता मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. मणक्याच्या आजाराबरोबरच सांधेदुखी, मानदुखीच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढत होत चालली आहे. रस्त्यावरील या खड्ड्यांमुळे गर्भवती महिलांना मोठा त्रास होत आहे. अनेक वाहनचालकांना कंबरदुखीच्या त्रासाशी झगडावे लागत आहे.

मुंबई-गोवा महामार्गाची सध्याची स्थिती फार बिकट आहे. अनेक ठिकाणी खड्डेमय रस्त्या आहे. रुंदीकरणाचे काम सुरू असलेल्या काही ठिकाणांवर सुरक्षारक्षकही नाही. शिवाय सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहे. त्यामुळे अपघातांना आळा घालण्यासाठी आणि नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एनएचएआय या दोन्ही विभागांनी तात्काळ पावले उचलणे आवश्यक आहे. खड्ड्यांच्या ठिकाणी तातडीने डागडुजीसह रुंदीकरणाची कामे सुरू असलेल्या ठिकाणांवर अडथळे उभारावेत. जेणेकरून अपघात टळतील आणि लोकांचे जीव वाचतील. कोणाचा संसार उद्ध्वस्त होणार नाही. यासाठी काही तरी करण्यात यावे, अशी आपेक्षाही व्यक्त करण्यापलिकडे या दिवसांत काहीही करु शकत नाही.

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाळ्यांच्या दिवसात रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हा मोठा संशोधनाचा विषय बनला आहे. खड्डे बुजविण्यासाठी दरवर्षी लाखो रुपये खर्च करण्यात येतात. दरवर्षी गणेशोत्सवाच्या तोंडावर गणरायाच्या आगमनाच्या पूर्वी खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर होतो. तो महामार्गावरच्या खड्ड्याचा सोडाच, शहरी आणि ग्रामीण भागातही ही ओरड सुरु होते. मात्र, सणासुदीचे दिवस गेल्यानंतर सर्वांनाचा त्याचा विसर पडला जातो. गणेशोत्सवाला काही दिवस असताना रस्त्यांवरील खड्डे भरण्यात येतात. ते लाल दगड, खडीचा वापर करण्यात येतो. मात्र, हा मुलामा काही दिवसांपुरताच टिकतो. त्यानंतर पुन्हा तेच खड्डे काही दिवसांतच दिसू लागतात. त्यामुळे खड्डे भरण्यासाठी केलेला खर्च पाण्यात जातो. हा दरवर्षीचा मुद्दा झालेला आहे.

दरवर्षी खड्ड्यांचे विघ्न टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजनांची आवश्यकता आहे. तसेच खड्डे बुजविण्यासाठी कोट्यवधी रुपयांची उधळण करणाऱ्या यंत्रणावर कारवाई का होत नाही, असे अनेक प्रश्न आहेत. हे प्रश्न केव्हा आणि कोण सोडवणार, हा एक संशोधनाचा विषय बनला आहे.

रहिम दलाल