शहरं
Join us  
Trending Stories
1
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
2
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
3
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
4
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
5
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
6
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
7
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
8
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
9
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
10
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
11
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
12
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
13
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
14
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
15
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
16
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
17
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
18
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
19
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
20
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...

कांद्याची आवक घटल्याने दरातील वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:29 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : परजिल्ह्यातून कांदा, बटाटे, लसणासह कडधान्य, डाळींची आवक होत आहे. लाॅकडाऊन सुरू असल्याने परजिल्ह्यातून येणारी ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : परजिल्ह्यातून कांदा, बटाटे, लसणासह कडधान्य, डाळींची आवक होत आहे. लाॅकडाऊन सुरू असल्याने परजिल्ह्यातून येणारी आवक घटली आहे. त्यामुळे दरातील वाढ सुरूच आहे. बेगमीसाठी कांदा, बटाटा, डाळी, कडधान्ये खरेदी करण्यात येतात. मात्र, दर कडाडल्याने खरेदीवर परिणाम झाला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील भडकलेल्या दरामुळे तेलाचे दरही कडाडले आहेत. १७० ते १७५ रुपये लिटर दराने तेल विक्री सुरू असल्याने तेल वापर ग्राहकांनी कमी केला आहे. कडधान्य, डाळी, तांदूळ, गव्हाच्या किमतीत चढउतार सुरूच आहे. कांदा २० ते ३० रुपये तर बटाट्याची २५ ते ३० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. शेतकऱ्यांना शेतीच्या कामामुळे पावसाळ्यातील चार महिने खरेदीसाठी जाणे अशक्य असल्याने एकदाच जीवनावश्यक वस्तूंची खरेदी केली जाते. वाढत्या दरामुळे बजेटनुसारच किंबहुना गरजेपुरते लागणारे साहित्य खरेदी केले जात आहे.

गत दीड वर्षापासून साखरेचे भाव मात्र नियंत्रित आहेत. ३२ ते ३५ रुपये किलो दराने साखर विक्री सुरू आहे. किरकोळ विक्री मात्र ३७ रुपये दराने सुरू आहे. पावसाळ्यासाठी साखर खरेदी करण्यात येत आहे. साखरेबरोबर गुळाचेही दर स्थिर आहेत. ३० ते ३२ रुपये किलो दराने गूळ विक्री सुरू आहे. साखरेपेक्षा गुळाचा वापर कमी आहे.

उष्म्यामुळे हैराण झाल्यावर प्राधान्याने लिंबू-पाणी सेवन नागरिक करीत आहेत. ‘क’ जीवनसत्व मुबलक असल्याने लिंबू सेवनाने कसर भरून काढली जाते. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी लिंबू सेवन आवर्जून केले जात आहे.

दैनंदिन स्वयंपाकात कांद्यापाठोपाठ बटाट्याचा वापर सर्रास केला जातो. २५ ते ३० रुपये किलो दराने बटाट्याची विक्री सुरू आहे. पावसाळ्यासाठी बटाटा खरेदी सुरू असून, टिकावू बटाटा खरेदी केला जातो. बटाट्याला अंकुर येत असल्याने खरेदीवर नियंत्रण आहे.

पावसाळा तोंडावर आहे. लाॅकडाऊन सुरू असल्याने जीवनावश्यक वस्तूंची फारशी आवक होत नसल्याने दरात वाढ झाली आहे. ग्राहकांना लागणाऱ्या गरजेच्या वस्तूंची उपलब्धता सवलतीच्या दरात करावी.

- अविना पांचाळ, गृहिणी

दरवाढीमुळे दैनंदिन स्वयंपाकच महागला आहे. कुठे खर्च व कुठे नियंत्रण, असा प्रश्न सद्य:स्थितीत निर्माण होत आहे. शासनाने यावर योग्य निर्बंध सुरू करावेत, अशी मागणी जोर धरत आहे.

- दीपा पवार, गृहिणी