शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याची आवक घटल्याने दरातील वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:29 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : परजिल्ह्यातून कांदा, बटाटे, लसणासह कडधान्य, डाळींची आवक होत आहे. लाॅकडाऊन सुरू असल्याने परजिल्ह्यातून येणारी ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : परजिल्ह्यातून कांदा, बटाटे, लसणासह कडधान्य, डाळींची आवक होत आहे. लाॅकडाऊन सुरू असल्याने परजिल्ह्यातून येणारी आवक घटली आहे. त्यामुळे दरातील वाढ सुरूच आहे. बेगमीसाठी कांदा, बटाटा, डाळी, कडधान्ये खरेदी करण्यात येतात. मात्र, दर कडाडल्याने खरेदीवर परिणाम झाला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील भडकलेल्या दरामुळे तेलाचे दरही कडाडले आहेत. १७० ते १७५ रुपये लिटर दराने तेल विक्री सुरू असल्याने तेल वापर ग्राहकांनी कमी केला आहे. कडधान्य, डाळी, तांदूळ, गव्हाच्या किमतीत चढउतार सुरूच आहे. कांदा २० ते ३० रुपये तर बटाट्याची २५ ते ३० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. शेतकऱ्यांना शेतीच्या कामामुळे पावसाळ्यातील चार महिने खरेदीसाठी जाणे अशक्य असल्याने एकदाच जीवनावश्यक वस्तूंची खरेदी केली जाते. वाढत्या दरामुळे बजेटनुसारच किंबहुना गरजेपुरते लागणारे साहित्य खरेदी केले जात आहे.

गत दीड वर्षापासून साखरेचे भाव मात्र नियंत्रित आहेत. ३२ ते ३५ रुपये किलो दराने साखर विक्री सुरू आहे. किरकोळ विक्री मात्र ३७ रुपये दराने सुरू आहे. पावसाळ्यासाठी साखर खरेदी करण्यात येत आहे. साखरेबरोबर गुळाचेही दर स्थिर आहेत. ३० ते ३२ रुपये किलो दराने गूळ विक्री सुरू आहे. साखरेपेक्षा गुळाचा वापर कमी आहे.

उष्म्यामुळे हैराण झाल्यावर प्राधान्याने लिंबू-पाणी सेवन नागरिक करीत आहेत. ‘क’ जीवनसत्व मुबलक असल्याने लिंबू सेवनाने कसर भरून काढली जाते. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी लिंबू सेवन आवर्जून केले जात आहे.

दैनंदिन स्वयंपाकात कांद्यापाठोपाठ बटाट्याचा वापर सर्रास केला जातो. २५ ते ३० रुपये किलो दराने बटाट्याची विक्री सुरू आहे. पावसाळ्यासाठी बटाटा खरेदी सुरू असून, टिकावू बटाटा खरेदी केला जातो. बटाट्याला अंकुर येत असल्याने खरेदीवर नियंत्रण आहे.

पावसाळा तोंडावर आहे. लाॅकडाऊन सुरू असल्याने जीवनावश्यक वस्तूंची फारशी आवक होत नसल्याने दरात वाढ झाली आहे. ग्राहकांना लागणाऱ्या गरजेच्या वस्तूंची उपलब्धता सवलतीच्या दरात करावी.

- अविना पांचाळ, गृहिणी

दरवाढीमुळे दैनंदिन स्वयंपाकच महागला आहे. कुठे खर्च व कुठे नियंत्रण, असा प्रश्न सद्य:स्थितीत निर्माण होत आहे. शासनाने यावर योग्य निर्बंध सुरू करावेत, अशी मागणी जोर धरत आहे.

- दीपा पवार, गृहिणी