शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

आरजीपीपीएलचा रेल्वेबराेबरचा करार संपणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:33 IST

संकेत गाेयथळे / गुहागर : गेली अनेक वर्षे चर्चेत असलेला आरजीपीपीएल प्रकल्पाचा भारतीय रेल्वेशी केलेला वीजपुरवठा करार संपत आला ...

संकेत गाेयथळे / गुहागर : गेली अनेक वर्षे चर्चेत असलेला आरजीपीपीएल प्रकल्पाचा भारतीय रेल्वेशी केलेला वीजपुरवठा करार संपत आला आहे. नव्याने हा करार पूर्ववत करण्यासंदर्भात अद्याप कोणत्याही हालचाली केंद्र व राज्य शासनाकडून झालेल्या नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा आरजीपीएल प्रकल्पावर टांगती तलवार उभी राहिली आहे.

एन्रॉन प्रकल्प बुडीत गेल्यानंतर कोट्यवधींची गुंतवणूक व तब्बल १९६० मेगावॅट वीजनिर्मिती क्षमता असल्याने विजेचा तुटवडा असल्याने पुन्हा एकदा हा प्रकल्प २००५ मध्ये सुरू करण्यात आला. सात वर्षांपूर्वी प्रकल्पातून होणारी महागडी वीजनिर्मिती कोणत्याही आस्थापनेला परवडणारी नसल्याने ही वीज घेणार कोण, अशा स्थितीत निर्माण झाली होती. काही दिवस निर्मिती क्षमता असूनही प्रकल्प बंद ठेवण्याची वेळ आली. त्यानंतर भाजप सरकारच्या कारकीर्दीत प्रकल्पातून निर्मित होणारी वीज भारतीय रेल्वेला देण्याचा करार करण्यात आला. त्यानुसार गेली अनेक वर्षे ५०० मेगावॅट वीजनिर्मिती सातत्याने होत आहे. ‘ना नफा ना तोटा’ अशा स्थितीत प्रकल्प सुरू ठेवण्यात आला आहे. हा करार आता संपत आल्याने येथील अधिकाऱ्यांची धावपळ उडाली आहे.

रेल्वेसोबतचा वीज करार संपत आल्याची टांगती तलवार असतानाच अपुरा गॅस पुरवठा ते दुहेरी संकट सध्या प्रकल्पावर आहे. गॅसच्या कमी पुरवठ्यामुळे सध्या प्रकल्पातून दोनशे मेगावॅटच वीजनिर्मिती होत आहे. देशात निर्माण होणाऱ्या गॅस वापराचा प्राधान्यक्रमात वीजनिर्मिती प्रकल्पांना सर्वांत शेवटी ठेवण्यात आले आहे. घरगुती खतनिर्मितीसाठी वाहनांसाठी देऊन शिल्लक गॅस निर्मितीकडे वळविला जातो. त्यामुळे कावेरी बेसिनमधून आजी बिल्ला मिळणारा गॅस ७.६ एमएससीएमडी गॅसवर हा प्रकल्प तग धरून होता. ओएनजीसीकडून केवळ ०.०२ एमएससीएमडी गॅसपुरवठा होईल, असा विश्वास व्यवस्थापनाला होता. मात्र, गेल्या दोन महिन्यांत हा गॅस पुरवठाही अनियमित झाल्याने केवळ दोनशे मेगावॅट वीजनिर्मिती होते आहे. त्यामुळे रेल्वेसोबतचा करार संपण्याबरोबरच अपुऱ्या गॅस पुरवठ्याचे दुहेरी संकट प्रकल्पावर ओढवले आहे.

--------------------

कामगार धास्तावले

आरजीपीपीएल व्यवस्थापनाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार विनायक राऊत यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली आहे. अद्याप यावर कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. प्रकल्पामध्ये तब्बल एक हजाराहून अधिक स्थानिक कामगार कार्यरत आहेत. पुन्हा एकदा प्रकल्पाबाबत अस्थिरता निर्माण झाल्याने कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.