शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
2
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
3
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
4
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
5
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
6
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
7
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
8
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
9
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
10
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
11
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
12
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
13
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
14
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
15
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
16
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
17
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
18
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
19
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
20
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?

आरजीपीपीएलचा रेल्वेबराेबरचा करार संपणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:33 IST

संकेत गाेयथळे / गुहागर : गेली अनेक वर्षे चर्चेत असलेला आरजीपीपीएल प्रकल्पाचा भारतीय रेल्वेशी केलेला वीजपुरवठा करार संपत आला ...

संकेत गाेयथळे / गुहागर : गेली अनेक वर्षे चर्चेत असलेला आरजीपीपीएल प्रकल्पाचा भारतीय रेल्वेशी केलेला वीजपुरवठा करार संपत आला आहे. नव्याने हा करार पूर्ववत करण्यासंदर्भात अद्याप कोणत्याही हालचाली केंद्र व राज्य शासनाकडून झालेल्या नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा आरजीपीएल प्रकल्पावर टांगती तलवार उभी राहिली आहे.

एन्रॉन प्रकल्प बुडीत गेल्यानंतर कोट्यवधींची गुंतवणूक व तब्बल १९६० मेगावॅट वीजनिर्मिती क्षमता असल्याने विजेचा तुटवडा असल्याने पुन्हा एकदा हा प्रकल्प २००५ मध्ये सुरू करण्यात आला. सात वर्षांपूर्वी प्रकल्पातून होणारी महागडी वीजनिर्मिती कोणत्याही आस्थापनेला परवडणारी नसल्याने ही वीज घेणार कोण, अशा स्थितीत निर्माण झाली होती. काही दिवस निर्मिती क्षमता असूनही प्रकल्प बंद ठेवण्याची वेळ आली. त्यानंतर भाजप सरकारच्या कारकीर्दीत प्रकल्पातून निर्मित होणारी वीज भारतीय रेल्वेला देण्याचा करार करण्यात आला. त्यानुसार गेली अनेक वर्षे ५०० मेगावॅट वीजनिर्मिती सातत्याने होत आहे. ‘ना नफा ना तोटा’ अशा स्थितीत प्रकल्प सुरू ठेवण्यात आला आहे. हा करार आता संपत आल्याने येथील अधिकाऱ्यांची धावपळ उडाली आहे.

रेल्वेसोबतचा वीज करार संपत आल्याची टांगती तलवार असतानाच अपुरा गॅस पुरवठा ते दुहेरी संकट सध्या प्रकल्पावर आहे. गॅसच्या कमी पुरवठ्यामुळे सध्या प्रकल्पातून दोनशे मेगावॅटच वीजनिर्मिती होत आहे. देशात निर्माण होणाऱ्या गॅस वापराचा प्राधान्यक्रमात वीजनिर्मिती प्रकल्पांना सर्वांत शेवटी ठेवण्यात आले आहे. घरगुती खतनिर्मितीसाठी वाहनांसाठी देऊन शिल्लक गॅस निर्मितीकडे वळविला जातो. त्यामुळे कावेरी बेसिनमधून आजी बिल्ला मिळणारा गॅस ७.६ एमएससीएमडी गॅसवर हा प्रकल्प तग धरून होता. ओएनजीसीकडून केवळ ०.०२ एमएससीएमडी गॅसपुरवठा होईल, असा विश्वास व्यवस्थापनाला होता. मात्र, गेल्या दोन महिन्यांत हा गॅस पुरवठाही अनियमित झाल्याने केवळ दोनशे मेगावॅट वीजनिर्मिती होते आहे. त्यामुळे रेल्वेसोबतचा करार संपण्याबरोबरच अपुऱ्या गॅस पुरवठ्याचे दुहेरी संकट प्रकल्पावर ओढवले आहे.

--------------------

कामगार धास्तावले

आरजीपीपीएल व्यवस्थापनाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार विनायक राऊत यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली आहे. अद्याप यावर कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. प्रकल्पामध्ये तब्बल एक हजाराहून अधिक स्थानिक कामगार कार्यरत आहेत. पुन्हा एकदा प्रकल्पाबाबत अस्थिरता निर्माण झाल्याने कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.