शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाने भात, नागली, भाजीपाला पिके बाधित; रत्नागिरीतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 18:14 IST

लांजा आणि राजापूर वगळता अन्य सर्व तालुक्यांना अतिवृष्टीचा फटका

रत्नागिरी : सप्टेंबरमध्ये परतीच्या पावसाने जाता जाता राज्याला मोठा दणका दिला. रत्नागिरी जिल्ह्यालाही त्याचा मोठा फटका बसला. या अतिवृष्टीमुळे भात, नाचणी, भाजीपाला पिके बाधित झाली. जिल्ह्यातील एकूण १,१४८ शेतकऱ्यांच्या १०३.१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून, १३ लाख २९९ रुपयांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील लांजा आणि राजापूर वगळता अन्य सर्व तालुक्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे.सप्टेंबरमध्ये राज्यात सर्वत्र अतिवृष्टी झाली. विदर्भ, मराठवाडा या भागात तर प्रचंड नुकसान झाले. तुलनेने त्या काळात रत्नागिरी जिल्ह्यात कमी पाऊस पडला. मात्र, जितका पाऊस पडला त्याने शेतीला दणका दिला आहे. जिल्ह्यात भात, नाचणी, भाजीपाला पिकांचे पावसामुळे नुकसान झाले. तयार भात पावसाच्या जोराने जमिनीवर कोसळले. काही ठिकाणी भात दोन, चार दिवस पावसात राहिल्यामुळे भाताला अंकुरही आले. भाजीपाला कुजला आहे. नाचणीही पावसामुळे जमिनीवर पडून पाण्यात भिजून कुजली असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.जिल्ह्यात खरीप हंगामात एकूण ८१ हजार ९५५.६६ हेक्टर क्षेत्रांवर विविध पिकांची लागवड करण्यात आली आहे. त्यामध्ये सर्वाधिक भात लागवड असून, ती एकूण ७० हजार ५७२ हेक्टर क्षेत्रात, तर नाचणी लागवड १०,२३६.३५ हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. सर्वाधिक नुकसान नाचणी पिकाचे असून, ७०.६ हेक्टर क्षेत्रांवरील नाचणी बाधित झाली आहे. भात पिकाचे ३०.९९ हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले आहे.भाजीपाला पिकाचे ०.६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. कृषी विभागाकडून बाधित क्षेत्राचे पंचनामे करून शासनाकडे अहवाल पाठविण्यात आला आहे. अहवालानुसार शेतकऱ्यांचे १३ लाख २९९ रुपयांचे नुकसान असल्याचे सांगण्यात येत आहे.

जिल्ह्यातील तालुकानिहाय शेतकरी संख्या, बाधित क्षेत्र, आर्थिक नुकसान पुढीलप्रमाणे तालुका - शेतकरी संख्या - बाधित क्षेत्र - आर्थिक नुकसानमंडणगड - ७३ -  ६.९८ - ०.८३दापोली - ४८४ - २८.१७ - ५.१७५खेड - ४२ - ७.६५ - ०.६९१चिपळूण - ८६ - १६.७२ - १.५९गुहागर - ४३३ - ४०.९७ - ४.६७संगमेश्वर - १८ - १.६८ - ०.२२३रत्नागिरी - १२ - ०.८४ - ०.१२लांजा - ०० - ००० - ०००राजापूर -  ०० -  ०० -  ००

सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात बाधित झालेल्या पिकांचे नुकसान करून शासनाला अहवाल सादर करण्यात आला आहे. भात, नाचणी, भाजीपाला पिकाचे नुकसान झाले असून सर्वाधिक नुकसान नाचणी पिकाचे आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनस्तरावरून नुकसानभरपाई मिळणार आहे.  - शिवकुमार सदाफुले, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, रत्नागिरी.

English
हिंदी सारांश
Web Title : Heavy Rains Damage Crops in Ratnagiri; Farmers Face Losses

Web Summary : Unseasonal rains in Ratnagiri damaged paddy, finger millet, and vegetable crops. Over 1,148 farmers suffered losses across 103 hectares, amounting to ₹13.29 lakhs. Finger millet crops were the most affected. The agriculture department has submitted a report to the government for compensation.