शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

परतीच्या पावसाने भात, नागली, भाजीपाला पिके बाधित; रत्नागिरीतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 18:14 IST

लांजा आणि राजापूर वगळता अन्य सर्व तालुक्यांना अतिवृष्टीचा फटका

रत्नागिरी : सप्टेंबरमध्ये परतीच्या पावसाने जाता जाता राज्याला मोठा दणका दिला. रत्नागिरी जिल्ह्यालाही त्याचा मोठा फटका बसला. या अतिवृष्टीमुळे भात, नाचणी, भाजीपाला पिके बाधित झाली. जिल्ह्यातील एकूण १,१४८ शेतकऱ्यांच्या १०३.१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून, १३ लाख २९९ रुपयांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील लांजा आणि राजापूर वगळता अन्य सर्व तालुक्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे.सप्टेंबरमध्ये राज्यात सर्वत्र अतिवृष्टी झाली. विदर्भ, मराठवाडा या भागात तर प्रचंड नुकसान झाले. तुलनेने त्या काळात रत्नागिरी जिल्ह्यात कमी पाऊस पडला. मात्र, जितका पाऊस पडला त्याने शेतीला दणका दिला आहे. जिल्ह्यात भात, नाचणी, भाजीपाला पिकांचे पावसामुळे नुकसान झाले. तयार भात पावसाच्या जोराने जमिनीवर कोसळले. काही ठिकाणी भात दोन, चार दिवस पावसात राहिल्यामुळे भाताला अंकुरही आले. भाजीपाला कुजला आहे. नाचणीही पावसामुळे जमिनीवर पडून पाण्यात भिजून कुजली असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.जिल्ह्यात खरीप हंगामात एकूण ८१ हजार ९५५.६६ हेक्टर क्षेत्रांवर विविध पिकांची लागवड करण्यात आली आहे. त्यामध्ये सर्वाधिक भात लागवड असून, ती एकूण ७० हजार ५७२ हेक्टर क्षेत्रात, तर नाचणी लागवड १०,२३६.३५ हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. सर्वाधिक नुकसान नाचणी पिकाचे असून, ७०.६ हेक्टर क्षेत्रांवरील नाचणी बाधित झाली आहे. भात पिकाचे ३०.९९ हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले आहे.भाजीपाला पिकाचे ०.६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. कृषी विभागाकडून बाधित क्षेत्राचे पंचनामे करून शासनाकडे अहवाल पाठविण्यात आला आहे. अहवालानुसार शेतकऱ्यांचे १३ लाख २९९ रुपयांचे नुकसान असल्याचे सांगण्यात येत आहे.

जिल्ह्यातील तालुकानिहाय शेतकरी संख्या, बाधित क्षेत्र, आर्थिक नुकसान पुढीलप्रमाणे तालुका - शेतकरी संख्या - बाधित क्षेत्र - आर्थिक नुकसानमंडणगड - ७३ -  ६.९८ - ०.८३दापोली - ४८४ - २८.१७ - ५.१७५खेड - ४२ - ७.६५ - ०.६९१चिपळूण - ८६ - १६.७२ - १.५९गुहागर - ४३३ - ४०.९७ - ४.६७संगमेश्वर - १८ - १.६८ - ०.२२३रत्नागिरी - १२ - ०.८४ - ०.१२लांजा - ०० - ००० - ०००राजापूर -  ०० -  ०० -  ००

सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात बाधित झालेल्या पिकांचे नुकसान करून शासनाला अहवाल सादर करण्यात आला आहे. भात, नाचणी, भाजीपाला पिकाचे नुकसान झाले असून सर्वाधिक नुकसान नाचणी पिकाचे आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनस्तरावरून नुकसानभरपाई मिळणार आहे.  - शिवकुमार सदाफुले, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, रत्नागिरी.

English
हिंदी सारांश
Web Title : Heavy Rains Damage Crops in Ratnagiri; Farmers Face Losses

Web Summary : Unseasonal rains in Ratnagiri damaged paddy, finger millet, and vegetable crops. Over 1,148 farmers suffered losses across 103 hectares, amounting to ₹13.29 lakhs. Finger millet crops were the most affected. The agriculture department has submitted a report to the government for compensation.