शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
4
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
5
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
6
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
7
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
8
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
9
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
10
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
11
फायद्याची गोष्ट! स्टील, अ‍ॅल्युमिनियम की लोखंड... स्वयंपाकासाठी कोणतं भांडं सर्वात बेस्ट?
12
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
13
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
14
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
15
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
16
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
17
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली
18
IND vs WI: सर्फराज खानला विंडिजविरूद्ध कसोटी संघात का घेतलं नाही? अखेर BCCI ने दिलं उत्तर
19
'लडाखमध्ये जे घडत आहे ते चिंताजनक, प्रत्येक देशभक्ताने लोकांना पाठिंबा दिला पाहिजे'; अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टच सांगितले
20
"पुन्हा NDA चे सरकार आल्यास नीतीश कुमार नव्हे तर...!"; ओवेसींनी सांगितलं, कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री?

रत्नागिरी जिल्हा परिषदेतील दोन वर्षांपूर्वीचा स्थायी समितीतील ठराव फाईलबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 14:43 IST

रत्नागिरी जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत दोन वर्षांपूर्वी झालेला ठराव प्रशासनाकडून फाईलमध्ये बंद करुन ठेवण्यात आला आहे़. त्यामुळे फिरतीवर जाणारे कर्मचारी व अधिकाऱ्यांनी त्या-त्या ग्रामपंचायतींमध्ये नोंद करण्याच्या ठरावाची अंमलबजावणी होत नाही.

ठळक मुद्दे दोन वर्षे प्रतीक्षा, सभेतील ठरावाची प्रशासन अंमलबजावणी करत नसल्याने आश्चर्य फिरतीच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांवर वॉचकर्मचारी, अधिकारी या ठरावामुळे अडचणीत येऊ शकतात

रत्नागिरी : जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत दोन वर्षांपूर्वी झालेला ठराव प्रशासनाकडून फाईलमध्ये बंद करुन ठेवण्यात आला आहे़. त्यामुळे फिरतीवर जाणारे कर्मचारी व अधिकाऱ्यांनी त्या-त्या ग्रामपंचायतींमध्ये नोंद करण्याच्या ठरावाची अंमलबजावणी होत नाही.जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील अनेक कर्मचारी, अधिकारी हे कार्यालयीन कामानिमित्त फिरतीवर असतात. अनेकदा काही कर्मचारी, अधिकारी हे फिरतीचे कारण सांगतात आणि कार्यालयीन काम सोडून वैयक्तिक कामात गुंतले असल्याचे अनेकवेळा निदर्शनास आले आहे. त्यामुळे जे कर्मचारी, अधिकारी फिरतीवर जाणार असतील, त्यांची नोंद त्या-त्या ग्रामपंचायतीच्या रजिस्टरमध्ये करण्यात यावी, असा ठराव दोन वर्षांपूर्वी झालेल्या रत्नागिरी स्थायी समितीच्या सभेमध्ये मंजूर करण्यात आला होता.आजही अनेक कर्मचारी, अधिकारी हे फिरतीवर जात असतात. मात्र, दोन वर्षांपूर्वी झालेल्या स्थायी समितीच्या ठरावाप्रमाणे त्या-त्या ग्रामपंचायतींच्या नोंदवहीत त्या कर्मचारी, अधिकाऱ्यांची नोंद होणे आवश्यक आहे. मात्र, तशी नोंद होत नसल्याचे पुढे आले आहे.

स्थायी समितीने घेतलेल्या या ठरावाची अंमलबजावणी न झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. स्थायी समितीच्या या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास फिरतीवर जाणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांवर वचक राहणार होता. मात्र, तशी अंमलबजावणी करण्यास जिल्हा परिषदेकडूनच चालढकल करण्यात येत असल्याचे या प्रकारावरून दिसून येत आहे़फिरतीच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांवर वॉचजिल्हा परिषदेच्या कोणत्याही सभेत झालेल्या एखाद्या ठरावाची अंमलबजावणी करणे प्रशासनाला बंधनकारक आहे़ मात्र, दोन वर्षांचा कालावधी उलटून गेला तरी स्थायी समितीच्या सभेतील ठरावाची प्रशासन अंमलबजावणी करत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

या ठरावाची अंमलबजावणी केल्यास फिरतीवर जाणाऱ्या  कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना त्या-त्या गावातील ग्रामपंचायतीत आपली नोंद करणे बंधनकारक आहे. त्यामुळे त्यांच्यावर वॉच ठेवण्याचेच काम केले जाणार आहे. कर्मचारी, अधिकारी या ठरावामुळे अडचणीत येऊ शकतात, म्हणूनच याच्या अंमलबजावणीला टाळाटाळ केली जात असल्याची चर्चा सुरू आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीzpजिल्हा परिषद