शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
2
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
3
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
4
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
5
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
6
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
7
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
8
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
9
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
10
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
11
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
12
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
13
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
14
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
15
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
16
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
17
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
18
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
19
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
20
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग

रत्नागिरी जिल्हा परिषदेतील दोन वर्षांपूर्वीचा स्थायी समितीतील ठराव फाईलबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 14:43 IST

रत्नागिरी जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत दोन वर्षांपूर्वी झालेला ठराव प्रशासनाकडून फाईलमध्ये बंद करुन ठेवण्यात आला आहे़. त्यामुळे फिरतीवर जाणारे कर्मचारी व अधिकाऱ्यांनी त्या-त्या ग्रामपंचायतींमध्ये नोंद करण्याच्या ठरावाची अंमलबजावणी होत नाही.

ठळक मुद्दे दोन वर्षे प्रतीक्षा, सभेतील ठरावाची प्रशासन अंमलबजावणी करत नसल्याने आश्चर्य फिरतीच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांवर वॉचकर्मचारी, अधिकारी या ठरावामुळे अडचणीत येऊ शकतात

रत्नागिरी : जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत दोन वर्षांपूर्वी झालेला ठराव प्रशासनाकडून फाईलमध्ये बंद करुन ठेवण्यात आला आहे़. त्यामुळे फिरतीवर जाणारे कर्मचारी व अधिकाऱ्यांनी त्या-त्या ग्रामपंचायतींमध्ये नोंद करण्याच्या ठरावाची अंमलबजावणी होत नाही.जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील अनेक कर्मचारी, अधिकारी हे कार्यालयीन कामानिमित्त फिरतीवर असतात. अनेकदा काही कर्मचारी, अधिकारी हे फिरतीचे कारण सांगतात आणि कार्यालयीन काम सोडून वैयक्तिक कामात गुंतले असल्याचे अनेकवेळा निदर्शनास आले आहे. त्यामुळे जे कर्मचारी, अधिकारी फिरतीवर जाणार असतील, त्यांची नोंद त्या-त्या ग्रामपंचायतीच्या रजिस्टरमध्ये करण्यात यावी, असा ठराव दोन वर्षांपूर्वी झालेल्या रत्नागिरी स्थायी समितीच्या सभेमध्ये मंजूर करण्यात आला होता.आजही अनेक कर्मचारी, अधिकारी हे फिरतीवर जात असतात. मात्र, दोन वर्षांपूर्वी झालेल्या स्थायी समितीच्या ठरावाप्रमाणे त्या-त्या ग्रामपंचायतींच्या नोंदवहीत त्या कर्मचारी, अधिकाऱ्यांची नोंद होणे आवश्यक आहे. मात्र, तशी नोंद होत नसल्याचे पुढे आले आहे.

स्थायी समितीने घेतलेल्या या ठरावाची अंमलबजावणी न झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. स्थायी समितीच्या या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास फिरतीवर जाणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांवर वचक राहणार होता. मात्र, तशी अंमलबजावणी करण्यास जिल्हा परिषदेकडूनच चालढकल करण्यात येत असल्याचे या प्रकारावरून दिसून येत आहे़फिरतीच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांवर वॉचजिल्हा परिषदेच्या कोणत्याही सभेत झालेल्या एखाद्या ठरावाची अंमलबजावणी करणे प्रशासनाला बंधनकारक आहे़ मात्र, दोन वर्षांचा कालावधी उलटून गेला तरी स्थायी समितीच्या सभेतील ठरावाची प्रशासन अंमलबजावणी करत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

या ठरावाची अंमलबजावणी केल्यास फिरतीवर जाणाऱ्या  कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना त्या-त्या गावातील ग्रामपंचायतीत आपली नोंद करणे बंधनकारक आहे. त्यामुळे त्यांच्यावर वॉच ठेवण्याचेच काम केले जाणार आहे. कर्मचारी, अधिकारी या ठरावामुळे अडचणीत येऊ शकतात, म्हणूनच याच्या अंमलबजावणीला टाळाटाळ केली जात असल्याची चर्चा सुरू आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीzpजिल्हा परिषद