शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

रत्नागिरी : गायींची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करा, ग्रामस्थांचा मुंबई-गोवा महामार्ग रास्तारोको

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 9:08 AM

गायींची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी खेड तालुक्यातील पीरलोटे येथील ग्रामस्थांनी मुंबई-गोवा महामार्ग अडवला आहे.

ठळक मुद्देलोटे परिसरात गोवंश हत्येची चर्चा गायींची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करावी -ग्रामस्थ

रत्नागिरी -गायींची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी खेड तालुक्यातील पीरलोटे येथील ग्रामस्थांनी मुंबई-गोवा महामार्ग अडवला आहे. त्यामुळे येथील वाहतूक ठप्प झाली आहे.  कत्तल करण्यासाठी गायींची वाहतूक केली जात असल्याचा संशय ग्रामस्थांना आहे. याविरोधात ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन केले. यावेळेस लोकांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज करण्याचे आदेश देणारे उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वेश्वर नांदेडकर यांना धक्काबुक्की करुन ग्रामस्थांनी पोलिसांची गाडी पेटवली. इतर गाड्यांवरही दगडफेक झाली. यामध्ये एस.टी.बससह काही अन्य गाड्याही फोडण्यात आल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून लोटे परिसरात गोवंश हत्येची चर्चा सुरू आहे. यावर ग्रामस्थ पाळत ठेवून होते. शनिवारी (26 जानेवारी) पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थांनी एक गाडी अडवली. यात एक गाय होती. मात्र गाडीतील लोक बंदुक आणि तलवारीचा धाक दाखवून पळून गेल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या लोकांवर तातडीने कारवाई करावी, या मागणीसाठी महामार्ग अडवण्यात आला आहे.

लोकांना बाजूला करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वेश्वर नांदेडकर यांनी लाठीहल्ला करण्याचे आदेश दिले. यामुळे जमाव संतप्त झाला आणि त्यांनी नांदेडकर यांना धक्काबुक्की केली. तेवढ्यावरच न थांबता लोकांनी पोलिसांची गाडीही पेटवून दिली. 

यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वेश्वर नांदेडकर, खेडचे पोलीस निरीक्षक अनिल हे गंभीर स्वरुपात जखमी झाले आहेत.

टॅग्स :cowगाय