शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
7
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
8
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
9
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
10
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
11
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
12
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
13
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
14
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
15
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
16
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
17
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
18
शारदीय नवरात्र म्हणजे निर्मितीशक्तीचा उत्सव; पूजा नऊ दिवसच का? महत्त्व जाणून घ्या
19
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
20
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...

रत्नागिरी : स्वाभिमान - शिवसेनेत पुन्हा वादाची ठिणगी?, नीलेश राणे यांच्या ट्विटला उदय सामंतांचे उत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 16:28 IST

शिवसेना आणि स्वाभिमान पक्षातील वाद अजूनही सुरूच आहे. म्हाडा अध्यक्ष म्हणून उदय सामंत यांच्यावर माजी खासदार नीलेश राणे यांनी ट्वीटरवरून वार केला आणि पाठोपाठ उदय सामंत यांनी त्याला प्रत्युत्तर दिले आहे. बाकी पक्षांमध्ये सध्या शांतता असली तरी शिवसेना आणि स्वाभिमान यांच्यातील कलगी-तुरा सुरूच आहे.

ठळक मुद्देस्वाभिमान - शिवसेनेत पुन्हा वादाची ठिणगी?नीलेश राणे यांच्या ट्विटला उदय सामंतांचे उत्तर

रत्नागिरी : शिवसेना आणि स्वाभिमान पक्षातील वाद अजूनही सुरूच आहे. म्हाडा अध्यक्ष म्हणून उदय सामंत यांच्यावर माजी खासदार नीलेश राणे यांनी ट्वीटरवरून वार केला आणि पाठोपाठ उदय सामंत यांनी त्याला प्रत्युत्तर दिले आहे. बाकी पक्षांमध्ये सध्या शांतता असली तरी शिवसेना आणि स्वाभिमान यांच्यातील कलगी-तुरा सुरूच आहे.

गतमहिन्यात एका वृत्त वाहिनीच्या कार्यक्रमात स्वाभिमान आणि शिवसेना यांच्यामध्ये वादाची पहिली ठिणगी पडली. जैतापूर प्रकल्पाला आमदार उदय सामंत यांचा पाठिंबा असल्याचा एक व्हिडिओ एका कार्यकर्त्याने दाखवला.

 

 

स्वाभिमान पक्षाचा तो असल्याने शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी त्याला धक्काबुक्की केली. त्यानंतर दोनच दिवसात शिवसेनेच्या उपशहर प्रमुखाचे केशकर्तनालय काही लोकांनी फोडले. या प्रकरणात स्वाभिमान पक्षाच्या काही कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला. या दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमधील हा वाद अजूनही धुमसत आहे.

निवडणुकीपर्यंत आरोप-प्रत्यारोपांच्या माध्यमातून हा वाद सुरूच राहील, असे स्पष्ट दिसत आहे. घरांचा ताबा न देणाऱ्या बिल्डरला नोटीस काढणार असल्याचे उद्गार म्हाडाचे अध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर उदय सामंत यांनी एका पत्रकार परिषदेत काढले होते. मुंबईतील लोढा बिल्डर्सने पैसे भरूनही लाभार्थींना घरांचा ताबा दिला नव्हता. त्यामुळे हा ताबा लगेचच देण्यासाठी त्यांना म्हाडाकडून नोटीस काढण्यात येईल, असे आमदार सामंत यांनी सांगितले.माजी खासदार नीलेश राणे यांनी याच वक्तव्याचा आधार घेत ट्वीटरवर चांगलाच समाचार घेतला होता. बिल्डरना नोटीस देऊन पैसे काढण्याची सवय असलेल्या शिवसेना आमदाराविरोधात आपण लाचलुचपत खात्याकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी ट्वीट केले. राणे यांनी केलेल्या या ट्वीटचा उल्लेख न करता आमदार उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.चिपळूण येथे आमदार सदानंद चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात बोलताना आमदार सामंत म्हणाले की, मुंबईमध्ये कल्याण - डोंबिवली येथे म्हाडामधील घरांसाठी अनेक लोकांनी पैसे भरले आहेत. मात्र, त्यांची घरे कोठे आहेत, हे त्यांनाच माहिती नाही. बिल्डरने त्यांना ही घरे दाखवलेलीच नाहीत.

भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा हे या प्रकल्पाचे काम करत आहेत. राज्य सरकारमध्ये त्यांचे मोठे वजन आहे. म्हाडाची घरे ही सर्वसामान्य लोकांसाठीची असल्याने आपण म्हाडाकडून ही नोटीस पाठवली आहे. हे सांगतानाच आमदार सामंत यांनी आपण शिवसेनेचे आमदार असल्याने कोणाला घाबरत नसल्याची पुष्टीही जोडली आहे.शिवसेनेवर हल्लाबोल सुरूच राहणाररत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून नीलेश राणे निवडणूक लढवणार असल्याचे भाजपचे खासदार नारायण राणे यांनी स्वाभिमान पक्षाच्या रत्नागिरीतील मेळाव्यात स्पष्ट केले होते. त्यामुळे नीलेश राणे यांनी रत्नागिरीतील घडामोडी विशेषत: शिवसेनेच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले आहे. निवडणुकीपर्यंत शिवसेनेवर हल्लाबोल करण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Twitterट्विटरRatnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंतNilesh Raneनिलेश राणे