शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

रत्नागिरीतील टंचाईला विंधन विहिरींचा उतारा, पाणी असलेल्या जागांची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 3:05 PM

रत्नागिरी शहरातील पाणीटंचाई आता अधिकच तीव्र झाली आहे. दररोज पाणी नाही, पाणी द्या, म्हणून शहराच्या विविध भागातील महिला नगर परिषदेवर हल्लाबोल करीत आहेत. नळांना कमी दाबाने पाणी येत असताना टॅँकरचे पाणीही शहरवासियांना पुरत नसल्याने आता या टंचाईवर विंधन विहिरींचा उतारा केला जाणार आहे. त्यासाठी शहरात पाणी असलेल्या जागांचे सर्वेक्षण सुरू असून, किमान १० ते १५ विंधन विहिरी उभारण्याचा नगर परिषदेचा प्रस्ताव आहे.

ठळक मुद्देरत्नागिरीतील टंचाईला विंधन विहिरींचा उतारा, पाणी असलेल्या जागांची पाहणीतज्ज्ञांमार्फत रत्नागिरी शहरात विंधन विहिरींसाठी सर्वेक्षण

प्रकाश वराडकर रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील पाणीटंचाई आता अधिकच तीव्र झाली आहे. दररोज पाणी नाही, पाणी द्या, म्हणून शहराच्या विविध भागातील महिला नगर परिषदेवर हल्लाबोल करीत आहेत. नळांना कमी दाबाने पाणी येत असताना टॅँकरचे पाणीही शहरवासियांना पुरत नसल्याने आता या टंचाईवर विंधन विहिरींचा उतारा केला जाणार आहे. त्यासाठी शहरात पाणी असलेल्या जागांचे सर्वेक्षण सुरू असून, किमान १० ते १५ विंधन विहिरी उभारण्याचा नगर परिषदेचा प्रस्ताव आहे.शहरातील पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी सुधारित नळपाणी योजनेचे काम सुरु करण्यात आले आहे. मात्र, हे काम सुरु होऊन प्रत्यक्ष पाणी मिळेपर्यंत दीड वर्षाचा कालावधी जाणार आहे.शीळमध्ये अपुरा पाणीसाठारत्नागिरी शहराला सर्वाधिक पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणातही यंदा पाण्याचा अपुरा साठा आहे. गेल्या पावसाळ्यात हे धरण पूर्ण भरले होते. मात्र, सुरुवातीला पाऊस मोठ्या प्रमाणात झाला. आॅक्टोबर, नोव्हेंबरमध्ये ओढ दिल्याने घसरलेली धरणपातळी पुन्हा भरून निघाली नाही.आता विंधन विहिरींचा उपाय!शहराच्या काही भागात पाणीच येत नाही. टॅँकरने पुरवठाही अपुरा पडत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील टंचाईच्या तीव्र झळा बसणाºया भागांमध्ये विंधन विहिरी उभारण्यासाठी तज्ज्ञांमार्फत तातडीने सर्वेक्षण केले जात आहे. आवश्यक तेथे पाणीसाठा असल्यास अशा ठिकाणी विंधन विहिरी अर्थात बोअरवेल उभारल्या जाणार आहेत, अशी माहिती प्रभारी नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी लोकमतला दिली.टॅँकरच्या दररोज ५५ फेऱ्याशहरातील पाणी टंचाईची समस्या सोडविण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेकडून सध्या शहरातील विविध भागात टॅँकरमधून पाण्याच्या रोज ५५ फेऱ्या मारल्या जात आहेत. गेल्या पावसाळ्यात पाऊस कोसळत असतानाही टॅँकरने पाणी पुरवण्याची वेळ नगर परिषदेवर आली होती. टॅँकरने अद्याप पाठ सोडलेली नाही.धरणावर नवीन बंधारापानवल धरणातील पाणी नेहमीप्रमाणे फेब्रुवारी महिन्यातच संपले आहे, तर नाचणे तलावातून मिळणारे ०.५ दशलक्ष लीटर पाणीही तलाव आटल्याने पाणी स्थिती शहरात गंभीर झाली आहे. सुधारित नळपाणी योजनेमध्ये पानवल धरणावर नवीन बंधारा उभारण्यात येणार आहे. मात्र, त्याला अजून दीड ते दोन वर्षांचा कालावधी जाणार आहे.रोज १६ दशलक्ष लीटरची गरजरत्नागिरी शहराला दररोज १६ ते १८ दशलक्ष लीटर पाणी लागते. सध्या शीळ धरणावरून १२ दशलक्ष लीटर पाणी पुरवठा शहराला होत आहे, तर एमआयडीसीकडून दररोज एक ते दीड दशलक्ष लीटर पाणी रत्नागिरी शहराला पुरविले जाते. त्यातही जुन्या वितरण वाहिन्या व जुनी मुख्य जलवाहिनी यामुळे जागोजागी फुटण्याचे प्रकार व त्यातून होणारी गळती मोठी असल्याची खंत आहे.पाणी आले तर आले...जुुनाट झाल्याने वारंवार फुटणाऱ्या जलवाहिन्या दुरुस्त करायलाही कर्मचाऱ्यांना वेळ पुरत नाही, अशी स्थिती सध्या आहे. त्यामुळे शहरातील अनेक भाग असे आहेत की, तेथे नळाला पाणी येईल की नाही, याची खात्री देता येत नाही. पाणी आले तर आले, अशी विचित्र स्थिती आहे. गेल्या काही वर्षांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा ही समस्या रत्नागिरीकरांच्या पाचवीलाच पुजलेली आहे.पाणी १५ जूनपर्यंत पुरेलयावर्षी १५ जूनपर्यंत पुरेल इतकाच साठा या धरणात आहे. त्यामुळे यावेळी पाऊस उशिरा सुरू झाला, तर जलसंकट गंभीर होण्याची भीती आहे.नागरिकांना तोंड देताना हैराणपाणी समस्येमुळे सातत्याने शहरातील महिलावर्ग पाणी आलेच नाही, पाणीच येत नाही, अशा तक्रारी घेऊन प्रभारी नगराध्यक्ष बंड्या साळवी, पाणी समिती सभापती सुहेल मुकादम यांच्याकडे येत आहेत. पाणी समस्येवरून त्यांना तोंड देताना सर्वच पदाधिकारी हैराण झाले आहेत. गेल्या काही महिन्यात रत्नागिरी नगर परिषदेवर पाण्यासाठी सातत्याने हल्लाबोल करणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे. अनेक प्रभागांमधून महिलांनी पाण्यासाठी नगर परिषदेकडे धाव घेतली होती.

टॅग्स :Damधरणwater shortageपाणीटंचाईRatnagiriरत्नागिरी