शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

रत्नागिरी : महावितरणच्या वसुलीत कोकण विभाग द्वितीय, विक्रमी वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 5:46 PM

महावितरण कंपनीकडून राज्यातील सर्व विभागांना दरवर्षी वसुलीचे उद्दिष्ट देण्यात येते. शिवाय वर्षभरातील संपूर्ण कामकाजाचा आढावाही घेण्यात येत असतो. कोकण परिमंडलाने यावर्षी विक्रमी वसुली करीत महाराष्ट्रात व्दितीय क्रमांक मिळवला आहे. प्रथम क्रमांक भांडूप परिमंडलने पटकावला आहे.

ठळक मुद्दे महावितरणच्या वसुलीत कोकण विभाग द्वितीयकोकण परिमंडलाविक्रमी वसुली

रत्नागिरी : महावितरण कंपनीकडून राज्यातील सर्व विभागांना दरवर्षी वसुलीचे उद्दिष्ट देण्यात येते. शिवाय वर्षभरातील संपूर्ण कामकाजाचा आढावाही घेण्यात येत असतो. कोकण परिमंडलाने यावर्षी विक्रमी वसुली करीत महाराष्ट्रात व्दितीय क्रमांक मिळवला आहे. प्रथम क्रमांक भांडूप परिमंडलने पटकावला आहे.महावितरण कंपनीतर्फे सर्व पातळ्यांवर कामकाजाचा आढावा घेतला जात असताना केवळ वसुलीमध्येच नाही तर परिमंडलात असलेल्या वीज हानीचा आढावा, ग्राहकांना देण्यात येणारी सेवा, वीज जोडण्यांची परिस्थिती, फिडरनिहाय भारनियमन आदी निकषांवर गुणांक दिले जातात. दि. १ एप्रिल ते दि. ३१ मार्चअखेर कोकण परिमंडलाने ९९.६४ टक्के विक्रमी वसुली करून राज्यात व्दितीय क्रमांक मिळवला आहे.राज्यातील १६ परिमंडलांतर्गत यावर्षी भांडूप परिमंडलाने प्रथम क्रमांक मिळवला आहे. भांडुप परिमंडलाची वीज वसुली ९९.८२ टक्के इतकी आहे. पुणे विभागाने ९८.६० टक्के वसुली करीत तृतीय क्रमांक कायम राखला आहे. कोकण प्रदेशचे प्रादेशिक संचालक सतीश कर्पे यांनी या यशाबद्दल मुख्य अभियंता प्रभाकर पेठकर, सर्व सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे. 

कोकणातील जनतेत वक्तशीरपणामहावितरणच्या यशात सर्व अधिकारी, कर्मचारी यांचा वाटा महत्त्वपूर्ण आहेच, पण त्याशिवाय कोकणातील जनता शासकीय देणी वक्तशीरपणे भरतात. यामुळेच हे शक्य झाले. सर्व कार्यकारी अभियंता व त्यांचे सर्व तांत्रिक कर्मचारी तसेच आस्था विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वसुलीसाठी मेहनत घेतल्यामुळेच विक्रमी वसुली करण्यात यश आले.- पी. जी. पेठकर,प्रभारी मुख्य अभियंता, कोकण परिमंडल.

टॅग्स :mahavitaranमहावितरणRatnagiriरत्नागिरी