शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

रत्नागिरी : शिक्षकांवर अशैक्षणिक कामे लादू नयेत : निरंजन डावखरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 14:46 IST

शिक्षकांवर अशैक्षणिक कामे लादू नयेत याकरिता आपण वारंवार पाठपुरावा करत आहोत. शिक्षकांच्या सर्वांगिण हितासाठी आपण सदैव प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी केले.

ठळक मुद्देशिक्षकांवर अशैक्षणिक कामे लादू नयेत : डावखरेदापोलीत मुख्याध्यापकांचे राज्य शैक्षणिक कृतीसत्र

दापोली : शिक्षकांवर अशैक्षणिक कामे लादू नयेत याकरिता आपण वारंवार पाठपुरावा करत आहोत. शिक्षकांच्या सर्वांगिण हितासाठी आपण सदैव प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी केले.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाचे राज्यस्तरीय वार्षिक शैक्षणिक कृतीसत्र दापोली येथील नवभारत छात्रालयात आयोजित करण्यात आले आहे.

रत्नागिरी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघातर्फे आयोजित या कार्यक्रमाला आमदार निरंजन डावखरे, आमदार बाळाराम पाटील, युवा सेना राज्य कार्यकारिणी सदस्य योगेश कदम, राजेश क्षीरसागर, माध्यमिक शिक्षणाधिकारी तसेच रत्नागिरी महामंडळाचे राज्याध्यक्ष विजयसिंह गायकवाड, विद्या समिती राज्याध्यक्ष संदीपान मस्तूद आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी डावखरे पुढे म्हणाले की, शिक्षकांकडून समाज घडविण्याचे पवित्र काम होत असून, शिक्षकांना केवळ विद्यादानाचे काम करु द्यायला हवे. परंतु, शासनाकडून शिक्षकांवर अशैक्षणिक कामे लादली जात असल्याने शिक्षणक्षेत्राचे मोठे नुकसान होऊ शकते.

मुख्याध्यापकांना काम केले तरी त्रास होतोय. काम नाही केले तरीही त्रास होतोय. संस्थेला सांभाळायचे की शिक्षकांना सांभाळायचे की शासनाचा आदेश सांभाळायचा या अडचणींना मुख्याध्यापकांना तोंड द्यावे लागत आहे. मुख्याध्यापकांवरील कामाचा ताण वाढत असून, अशावेळी मुख्याध्यापकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे गरजेचे आहे.अशैक्षणिक कामे शिक्षकांना जबरदस्तीने करायला लावण्यापेक्षा ही कामे गरजू सुशिक्षित बेरोजगार तरुणांना द्यावीत याकरिता आपण वारंवार पाठपुरावा करीत आहोत. अधिवेशन काळात याविषयीचा प्रश्न उपस्थित करुन शासनाला धोरणात्मक निर्णय घ्यायला भाग पाडू, असेही डावखरे यांनी सांगितले.निरंजन डावखरे पुढे म्हणाले की, शिक्षकांवर अशैक्षणिक कामे जबरदस्तीने लादली गेली तर त्यातून समाधानकारक ह्यरिझल्टह्ण मिळेलच, असे नाही. त्यामुळे शिक्षकांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी अशैक्षणिक कामे बंद व्हायला हवीत, असे डावखरे म्हणाले.शिक्षणक्षेत्रातील अनुकंपाखालून पदे भरण्यासंदर्भात आपण वारंवार पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले असून, लवकरच शासन एक परिपत्रक काढून नोकरभरती करेल. शिक्षकांना जुनी पेन्शन लागू व्हावी, यासाठीही आपला पाठपुरावा सुरु आहे.

समाज घडविण्याचे काम करणाऱ्या शिक्षकांवर अन्याय होऊ नये यासाठी आपण वारंवार सरकारकडे पाठपुरावा करत आहोत. शिक्षणक्षेत्राच्या हितासंबंधित निर्णयांसाठी आपला लढा यापुढेही सुरुच राहील, असे डावखरे यावेळी म्हणाले.शैक्षणिक क्षेत्रात बदलकोकणात अतिशय चांगले शैक्षणिक वातावरण आहे. येथील शैक्षणिक क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहे. कोकणातील शैक्षणिक दर्जा राज्याच्या तुलनेत चांगला आहे. परंतु, काही शाळांना डिजिटल होण्याकरिता शासनाच्या मदतीची गरज आहे. शैक्षणिक प्रगतीसाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. परंतु, शासन मात्र दररोज नवनवीन परिपत्रके काढून शिक्षणक्षेत्रातील संभ्रम वाढवत आहे. 

टॅग्स :Teacherशिक्षकRatnagiriरत्नागिरीMLAआमदारkonkanकोकण