शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांचा आत्मविश्वास दुणावला; पहिल्यांदाच सांगितला सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा आकडा!
2
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
3
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
4
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
5
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
6
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
7
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
8
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
9
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
10
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
11
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
12
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
13
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
14
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
15
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
16
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
17
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
18
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
19
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
20
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल

रत्नागिरी : सागरी मार्ग दुपदरीकरण आराखडाही रडतखडत, महामार्ग केंद्र सरकारकडे, रेवस-आरोंदा अंतर ५७० किलोमीटरचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 4:55 PM

रायगड जिल्ह्यातील रेवस येथून सुरू होऊन रत्नागिरीच्या सागरी किनाऱ्यावरून थेट सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील आरोंदापर्यंत जाणाऱ्या ५७० किलोमीटर लांबीच्या सागरी महामार्गाचे काम अद्यापही रखडले आहे.

ठळक मुद्देरेवस-आरोंदा अंतर ५७० किलोमीटरचेसागरी मार्ग दुपदरीकरण आराखडाही रडतखडतरत्नागिरी जिल्ह्यात १८ पूल उभारले जाणारसिंधुदुर्ग जिल्ह्यात १० पूल उभारले जाणार

रत्नागिरी : रायगड जिल्ह्यातील रेवस येथून सुरू होऊन रत्नागिरीच्या सागरी किनाऱ्यावरून थेट सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील आरोंदापर्यंत जाणाऱ्या ५७० किलोमीटर लांबीच्या सागरी महामार्गाचे काम अद्यापही रखडले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून महामार्गाचे काम सुरू आहे. त्यानंतर नव्याने या मार्गाचे दुपदरीकरण करण्यासाठी महामार्ग विकास आराखडा बनविण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून सर्वेक्षण सुरू आहे. वर्षभराचा कालावधी उलटूनही याबाबतचा विकास आराखडा तयार झालेला नसल्याने हे काम रखडले आहे.सागरातून बंदराबंदरांमध्ये होणारी जलवाहतूक बंद झाल्यानंतर किनारपट्टी भागातील विकासाच्या प्रक्रियेला खीळ बसली आहे. त्यामुळे सागरी भागातून महामार्गाची संकल्पना पुढे आली. मात्र, गेल्या १५ वर्षांच्या काळातही हा सागरी महामार्ग पूर्ण होऊ शकला नाही.

राज्य शासनाकडे त्यासाठी निधी नसल्याने हे काम रखडले, असे सांगितले जात आहे. आता हा सागरी महामार्ग केंद्र शासनाकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी या महामार्गाच्या कामाला गती देण्याचा प्रयत्न केला.

या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देतानाच ५७० किलोमीटरच्या या रस्त्यासाठी दहा हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कोकणातील या मार्गाला महामार्गाचा दर्जा दिला आहे. तसेच १० हजार कोटी रुपयांची तरतूदही या कामासाठी करण्यात आली आहे.

या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्यामुळे रस्ता रुंदीकरण आवश्यक ठरले आहे. त्यामुळेच रस्त्याची नव्याने उभारणी व रुंदीकरणासाठी महामार्ग विभागातर्फे या रस्त्याचा विकास आराखडा (डीपीआर) बनविण्याचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे.

विकास आराखडा बनविण्यासाठी ५ कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे. रायगड, रत्नागिरी व सिंंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी सागरी महामार्ग हा किनारपट्टी भागासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. किनारपट्टी भागातील पर्यटन विस्तारही मोठ्या प्रमाणात होत असून, महामार्ग रुंदीकरणानंतर पर्यटनाला अधिक गती मिळण्याची शक्यता आहे.रत्नागिरी जिल्ह्यात १८ पूल उभारले जाणारकोकणच्या सागरी भागाच्या विकासासाठी वरदान ठरणाऱ्या ५७० किलोमीटर लांबीच्या महामार्गावर रायगड जिल्ह्यात सर्वाधिक ४१ पूल उभारले जाणार आहेत. या मार्गावर एकूण ८२ पूल उभारावे लागणार आहेत. त्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात १० पूल, तर रत्नागिरी जिल्ह्यात १८ पूल उभारले जाणार आहेत. ठाणे विभागातही १३ पूल उभारले जाणार आहेत. मुंबई-गोवा महामार्गाप्रमाणेच सागरी महामार्ग विकासाला हातभार लावणारा ठरणार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhighwayमहामार्ग