शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

रत्नागिरी : लहरी हवामानामुळे आंबा, काजू संकटात,  रानमेव्यालाही फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 17:17 IST

यावर्षीच्या हंगामात पाऊस चांगला पडला. परंतु, बदलत्या हवामानात निसर्गाची साथ न लाभल्यामुळे आंबा, काजू पिकाबरोबरच इतर रानमेव्यावर संकट आले असून, त्याच्या उत्पादनामध्ये कमालीची घट झाली आहे. लहरी हवामान, वादळी पाऊस यामुळे आलेल्या पिकाचेही नुकसान होण्याची भीती बागायतदारांनी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देगेल्या वर्षीच्या हंगामात उशिरापर्यंत दमदार पाऊस यावर्षी फलोत्पादनात वाढ होईल, अशी आशा लहरी हवामान व पर्यावरणात वरचेवर बदल - लहरी हवामानाचा रानमेव्यालाही फटका

सुभाष कदमचिपळूण : यावर्षीच्या हंगामात पाऊस चांगला पडला. परंतु, बदलत्या हवामानात निसर्गाची साथ न लाभल्यामुळे आंबा, काजू पिकाबरोबरच इतर रानमेव्यावर संकट आले असून, त्याच्या उत्पादनामध्ये कमालीची घट झाली आहे. लहरी हवामान, वादळी पाऊस यामुळे आलेल्या पिकाचेही नुकसान होण्याची भीती बागायतदारांनी व्यक्त केली आहे.गेल्या वर्षीच्या हंगामात उशिरापर्यंत दमदार पाऊस पडला. पाऊस चांगला पडल्याने यावर्षी फलोत्पादनात वाढ होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, सुरुवातीपासूनच लहरी हवामान व पर्यावरणात वरचेवर होणारे बदल जाणवल्यामुळे बागायतदार चिंतेत होता. पावसाळ्याचा हंगाम लांबल्यामुळे थंडीचे आगमन उशिरा झाले.

जमिनीवर ताण पडला नाही. उलट थंडीचा कालावधी वाढला. त्यामुळे आंबा, काजू मोहोरावर परिणाम झाला. मोहोर उशिरा आल्याने फळधारणाही अडथळ्यात सापडली होती. मोहोर आल्यानंतरही वातावरणात झालेल्या बदलाचा परिणाम मोहोरावर झाला. बदलत्या नैसर्गिक परिस्थितीमुळे आलेला मोहोरही काहीअंशी गळून पडला. यावर्षी काजू पिकात ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट झाली आहे.

यावर्षी थंडीचा कालावधी वाढला. त्यामुळे मोहोर येऊनही फळधारणेस वेळ लागला. या वातावरण बदलामुळे काजूपीक अडचणीत आले. मोहोर आल्यानंतर उष्णता वाढली असती तर फळधारणा झाली असती. परंतु, तसे न घडल्यामुळे काजूपीक घटले आहे.कोकणात हापूस आंबा वर्षाआड पीक देतो. वातावरण बदल व वाढलेल्या थंडीमुळे या पिकावर परिणाम झाला. उष्णता वाढली तर फळगळती होईल, अशी भीती होती आणि ती खरी ठरली. मुळात उशिरा आलेली फळेही गळू लागली आहेत. आंबा व काजू पिकात घट झाली असली तरी कोकम पीक चांगले येईल व उत्पादन देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.रानमेवाही नजरेआडआंबा, काजू, जांभूळ, रातांबा, फणस ही फळे हंगाम असताना वाढलेली उष्णता, वातावरणातील बदल व अवेळी पाऊस यामुळे उद्ध्वस्त होत आहेत. करवंद, तोरणं, अळू, जांभळं यांच्या उत्पन्नातही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे हा रानमेवाही नजरेआड होत चालला आहे. हा बदल असाच कायम राहिला तर फळांच्या जाती नामशेष होण्याची भीती व्यक्त होत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीfruitsफळेkonkanकोकण