शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

रत्नागिरी : लहरी हवामानामुळे आंबा, काजू संकटात,  रानमेव्यालाही फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 17:17 IST

यावर्षीच्या हंगामात पाऊस चांगला पडला. परंतु, बदलत्या हवामानात निसर्गाची साथ न लाभल्यामुळे आंबा, काजू पिकाबरोबरच इतर रानमेव्यावर संकट आले असून, त्याच्या उत्पादनामध्ये कमालीची घट झाली आहे. लहरी हवामान, वादळी पाऊस यामुळे आलेल्या पिकाचेही नुकसान होण्याची भीती बागायतदारांनी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देगेल्या वर्षीच्या हंगामात उशिरापर्यंत दमदार पाऊस यावर्षी फलोत्पादनात वाढ होईल, अशी आशा लहरी हवामान व पर्यावरणात वरचेवर बदल - लहरी हवामानाचा रानमेव्यालाही फटका

सुभाष कदमचिपळूण : यावर्षीच्या हंगामात पाऊस चांगला पडला. परंतु, बदलत्या हवामानात निसर्गाची साथ न लाभल्यामुळे आंबा, काजू पिकाबरोबरच इतर रानमेव्यावर संकट आले असून, त्याच्या उत्पादनामध्ये कमालीची घट झाली आहे. लहरी हवामान, वादळी पाऊस यामुळे आलेल्या पिकाचेही नुकसान होण्याची भीती बागायतदारांनी व्यक्त केली आहे.गेल्या वर्षीच्या हंगामात उशिरापर्यंत दमदार पाऊस पडला. पाऊस चांगला पडल्याने यावर्षी फलोत्पादनात वाढ होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, सुरुवातीपासूनच लहरी हवामान व पर्यावरणात वरचेवर होणारे बदल जाणवल्यामुळे बागायतदार चिंतेत होता. पावसाळ्याचा हंगाम लांबल्यामुळे थंडीचे आगमन उशिरा झाले.

जमिनीवर ताण पडला नाही. उलट थंडीचा कालावधी वाढला. त्यामुळे आंबा, काजू मोहोरावर परिणाम झाला. मोहोर उशिरा आल्याने फळधारणाही अडथळ्यात सापडली होती. मोहोर आल्यानंतरही वातावरणात झालेल्या बदलाचा परिणाम मोहोरावर झाला. बदलत्या नैसर्गिक परिस्थितीमुळे आलेला मोहोरही काहीअंशी गळून पडला. यावर्षी काजू पिकात ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट झाली आहे.

यावर्षी थंडीचा कालावधी वाढला. त्यामुळे मोहोर येऊनही फळधारणेस वेळ लागला. या वातावरण बदलामुळे काजूपीक अडचणीत आले. मोहोर आल्यानंतर उष्णता वाढली असती तर फळधारणा झाली असती. परंतु, तसे न घडल्यामुळे काजूपीक घटले आहे.कोकणात हापूस आंबा वर्षाआड पीक देतो. वातावरण बदल व वाढलेल्या थंडीमुळे या पिकावर परिणाम झाला. उष्णता वाढली तर फळगळती होईल, अशी भीती होती आणि ती खरी ठरली. मुळात उशिरा आलेली फळेही गळू लागली आहेत. आंबा व काजू पिकात घट झाली असली तरी कोकम पीक चांगले येईल व उत्पादन देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.रानमेवाही नजरेआडआंबा, काजू, जांभूळ, रातांबा, फणस ही फळे हंगाम असताना वाढलेली उष्णता, वातावरणातील बदल व अवेळी पाऊस यामुळे उद्ध्वस्त होत आहेत. करवंद, तोरणं, अळू, जांभळं यांच्या उत्पन्नातही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे हा रानमेवाही नजरेआड होत चालला आहे. हा बदल असाच कायम राहिला तर फळांच्या जाती नामशेष होण्याची भीती व्यक्त होत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीfruitsफळेkonkanकोकण