शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

रत्नागिरी : लहरी हवामानामुळे आंबा, काजू संकटात,  रानमेव्यालाही फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 17:17 IST

यावर्षीच्या हंगामात पाऊस चांगला पडला. परंतु, बदलत्या हवामानात निसर्गाची साथ न लाभल्यामुळे आंबा, काजू पिकाबरोबरच इतर रानमेव्यावर संकट आले असून, त्याच्या उत्पादनामध्ये कमालीची घट झाली आहे. लहरी हवामान, वादळी पाऊस यामुळे आलेल्या पिकाचेही नुकसान होण्याची भीती बागायतदारांनी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देगेल्या वर्षीच्या हंगामात उशिरापर्यंत दमदार पाऊस यावर्षी फलोत्पादनात वाढ होईल, अशी आशा लहरी हवामान व पर्यावरणात वरचेवर बदल - लहरी हवामानाचा रानमेव्यालाही फटका

सुभाष कदमचिपळूण : यावर्षीच्या हंगामात पाऊस चांगला पडला. परंतु, बदलत्या हवामानात निसर्गाची साथ न लाभल्यामुळे आंबा, काजू पिकाबरोबरच इतर रानमेव्यावर संकट आले असून, त्याच्या उत्पादनामध्ये कमालीची घट झाली आहे. लहरी हवामान, वादळी पाऊस यामुळे आलेल्या पिकाचेही नुकसान होण्याची भीती बागायतदारांनी व्यक्त केली आहे.गेल्या वर्षीच्या हंगामात उशिरापर्यंत दमदार पाऊस पडला. पाऊस चांगला पडल्याने यावर्षी फलोत्पादनात वाढ होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, सुरुवातीपासूनच लहरी हवामान व पर्यावरणात वरचेवर होणारे बदल जाणवल्यामुळे बागायतदार चिंतेत होता. पावसाळ्याचा हंगाम लांबल्यामुळे थंडीचे आगमन उशिरा झाले.

जमिनीवर ताण पडला नाही. उलट थंडीचा कालावधी वाढला. त्यामुळे आंबा, काजू मोहोरावर परिणाम झाला. मोहोर उशिरा आल्याने फळधारणाही अडथळ्यात सापडली होती. मोहोर आल्यानंतरही वातावरणात झालेल्या बदलाचा परिणाम मोहोरावर झाला. बदलत्या नैसर्गिक परिस्थितीमुळे आलेला मोहोरही काहीअंशी गळून पडला. यावर्षी काजू पिकात ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट झाली आहे.

यावर्षी थंडीचा कालावधी वाढला. त्यामुळे मोहोर येऊनही फळधारणेस वेळ लागला. या वातावरण बदलामुळे काजूपीक अडचणीत आले. मोहोर आल्यानंतर उष्णता वाढली असती तर फळधारणा झाली असती. परंतु, तसे न घडल्यामुळे काजूपीक घटले आहे.कोकणात हापूस आंबा वर्षाआड पीक देतो. वातावरण बदल व वाढलेल्या थंडीमुळे या पिकावर परिणाम झाला. उष्णता वाढली तर फळगळती होईल, अशी भीती होती आणि ती खरी ठरली. मुळात उशिरा आलेली फळेही गळू लागली आहेत. आंबा व काजू पिकात घट झाली असली तरी कोकम पीक चांगले येईल व उत्पादन देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.रानमेवाही नजरेआडआंबा, काजू, जांभूळ, रातांबा, फणस ही फळे हंगाम असताना वाढलेली उष्णता, वातावरणातील बदल व अवेळी पाऊस यामुळे उद्ध्वस्त होत आहेत. करवंद, तोरणं, अळू, जांभळं यांच्या उत्पन्नातही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे हा रानमेवाही नजरेआड होत चालला आहे. हा बदल असाच कायम राहिला तर फळांच्या जाती नामशेष होण्याची भीती व्यक्त होत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीfruitsफळेkonkanकोकण