शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

महाशिवरात्रीला रत्नागिरीत नारळाने २० वरून गाठला चाळीशीचा पल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 6:29 PM

महाशिवरात्रीला रत्नागिरीतील शिव मंदिरे गजबजली खरी; पण मनोभावे शिवशंकराला नमस्कार करायला जाणाऱ्या भक्तांची मात्र महाशिवरात्र ही मोठी परीक्षाच ठरली. कारण २० रुपयांना मिळणाऱ्या नारळाने मंगळवारी चाळीशी गाठली होती.

ठळक मुद्देश्रीफळाला एका दिवसात सोन्याचा भावसामान्य भक्तानी शिवपिंडीवर बेलपत्रच वाहणे केले पसंत

विहार तेंडुलकररत्नागिरी : महाशिवरात्रीला रत्नागिरीतील शिव मंदिरे गजबजली खरी; पण मनोभावे शिवशंकराला नमस्कार करायला जाणाऱ्या भक्तांची मात्र महाशिवरात्र ही मोठी परीक्षाच ठरली. कारण २० रुपयांना मिळणाऱ्या नारळाने मंगळवारी चाळीशी गाठली होती.महाशिवरात्रीनिमित्त रत्नागिरी शहरात शिव मंदिरात भक्तांनी गर्दी केली होती. प्रसिध्द काशिविश्वेश्वर मंदिरातही भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सकाळपासूनच मंदिरात भक्तांनी गर्दी केली होती. दुपारीही विश्वेश्वर मंदिरापासून सुमारे दीड किलोमीटर लांबीची रांग लागली होती.दरम्यान, भक्तांची वाढती संख्या पाहून नारळ विक्रेत्यांनी उखळ पांढरे करून घेतले. एरव्ही बाजारात २० रुपयांना मिळणारा नारळ मंदिराबाहेर चक्क ४० रुपयांना विकण्यात येत होता.मंदिरात जाताना भक्तगण घरातून सामान आणणे पसंत करत नाहीत, तर ते मंदिराबाहेरच्या स्टॉलवरूनच विकत घेतात. त्याचा फायदा आज या व्यावसायिकांनी उचलल्याचे दिसून आले. ४० रुपयांना मिळणारा नारळ पाहून सामान्य भक्तानी हात आखडता घेत बेलपत्रच शिवपिंडीवर वाहणे पसंत केले.अनेक रोगांन नारळ ग्रस्तरत्नागिरी जिल्हा हा पूर्वी आंबा, काजूसह अन्य पिकांबरोबर नारळ उत्पादनातही अग्रेसर होता. मात्र गेल्या काही वर्षात नारळाचे उत्पादन झपाट्याने घटले असून त्यामुळे अन्य जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात नारळ मागवला जातो. पूर्वी रत्नागिरीत पिकणारा नारळ हा आकाराने मोठा होता. आता विविध रोगांमुळे नारळाच्या आकारातही झपाट्याने घट झाली आहे.नारळाचे उत्पादन घटलेरत्नागिरी जिल्ह्यात नारळाचे उत्पादन झपाट्याने घटत असून नारळ विकास केंद्राच्या (कोकोनट डेव्हलपमेंट बोर्ड) रत्नागिरी जिल्ह्यात ४ हजार २५० हेक्टर क्षेत्र नारळ पिकाखाली आहे. सिंधुदूर्ग जिल्हा हा रत्नागिरी जिल्ह्यापेक्षा छोटा असूनही त्याठिकाणी १७ हजार ५५५ हेक्टर क्षेत्र नारळ पिकाखाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात बहुतांशी नारळाची झाडे ही दाटीवाटीने लावण्यात आल्याने नारळाच्या उत्पादनावर त्याचा परिणाम झाला आहे.व्यापाऱ्यांकडूनही पिळवणूकरत्नागिरी जिल्ह्यात सध्या उत्पादीत होणारा नारळ हा सण समारंभ यासाठीच विकला जातो. मात्र काही प्रमाणात नारळाची बाजारात व्यापाऱ्यांमार्फत विक्री केली जाते, तोही अत्यंत कमी दराने शेतकऱ्यांकडून खरेदी केला जातो. रत्नागिरीच्या बाजारपेठेत व्यापारी जो नारळ १६ ते २० रुपयांनी विकला जातो, तो शेतकऱ्यांकडून केवळ ८ रुपयांनी विकत घेतला जातो. यावरूनच व्यापाऱ्यांकडून होणारी पिळवणूक लक्षात येते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीTempleमंदिर