शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

रत्नागिरी : अल्पसंख्याक शाळांच्या दुरूस्ती योजनेकडेही पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 15:17 IST

रत्नागिरी जिल्ह्यातील धार्मिक अल्पसंख्याकबहुल शासनमान्य खासगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका शाळा व अपंग शाळा यांना दुरूस्तीसह पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागातर्फे योजना राबविण्यात येतात. मात्र, जिल्ह्यातून या योजनेकडे पाठ फिरवली जात असून, यावर्षीही यासाठी एकही प्रस्ताव दाखल झालेला नाही.

ठळक मुद्देअल्पसंख्याक शाळांच्या दुरूस्ती योजनेकडेही पाठएकही प्रस्ताव यावर्षी दाखल नाही

रत्नागिरी : जिल्ह्यातील धार्मिक अल्पसंख्याकबहुल शासनमान्य खासगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका शाळा व अपंग शाळा यांना दुरूस्तीसह पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागातर्फे योजना राबविण्यात येतात. मात्र, जिल्ह्यातून या योजनेकडे पाठ फिरवली जात असून, यावर्षीही यासाठी एकही प्रस्ताव दाखल झालेला नाही.जिल्ह्यातील धार्मिक अल्पसंख्याकबहुल शासनमान्य खासगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका - नगरपरिषद शाळा व अपंग शाळा यांना पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागातर्फे कमाल दोन लाख रुपये अनुदान रूपात देण्यात येते. अल्पसंख्याक समाजात बौध्द, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, शीख, पारशी व ज्यू या धर्मांचा समावेश आहे.लाभार्थी शाळा, संस्थेमध्ये या अल्पसंख्याक समाजाचे किमान ७० टक्के विद्यार्थी शिकत असणे आवश्यक आहे. कनिष्ठ महाविद्यालय व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या अभ्यासक्रमाच्या समकक्ष दर्जा देण्यात आलेले अभ्यासक्रम चालवणाऱ्या शाळा व व्यावसायिक शिक्षण संस्था तसेच स्वयंअर्थसहाय्यित शाळा तसेच नगरपालिका व जिल्हा परिषदा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिपत्याखाली चालवण्यात येत असलेल्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालये व अपंग शाळा या योजनेसाठी पात्र नाहीत. तसेच यापूर्वी या योजनेंतर्गत पाच वेळा अनुदान दिलेल्या शाळा, संस्थाही पात्र नाहीत.शासनाकडून विविध समाज घटकांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवल्या जातात. मात्र, त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थींकडूनच निरूत्साह दाखविला जात आहे. त्यामुळे दरवर्षीच या योजनांचा निधी पडून राहात आहे. अल्पसंख्याक विकास विभागाच्या डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठीही यावर्षी एकही प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आलेला नाही. योजनांचा लाभ घेण्याबाबत जनतेमध्येच उदासीनता दिसून येत आहे.अल्पसंख्याक समाजात बौध्द, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, शीख, पारशी व ज्यू या धर्मांचा समावेश आहे. मात्र, मुस्लिम धर्माव्यतिरिक्त इतर धर्मिय याबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या सर्वच धर्मियांमधील लोकप्रतिनिधींनी या योजना समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. कल्याणकारी योजना माहिती नसल्याने अनेक समाजातील गरजू व्यक्ती या योजनांपासून वंचित राहात आहेत.

टॅग्स :Studentविद्यार्थीRatnagiriरत्नागिरी