शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

रत्नागिरी : अल्पसंख्याक शाळांच्या दुरूस्ती योजनेकडेही पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 15:17 IST

रत्नागिरी जिल्ह्यातील धार्मिक अल्पसंख्याकबहुल शासनमान्य खासगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका शाळा व अपंग शाळा यांना दुरूस्तीसह पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागातर्फे योजना राबविण्यात येतात. मात्र, जिल्ह्यातून या योजनेकडे पाठ फिरवली जात असून, यावर्षीही यासाठी एकही प्रस्ताव दाखल झालेला नाही.

ठळक मुद्देअल्पसंख्याक शाळांच्या दुरूस्ती योजनेकडेही पाठएकही प्रस्ताव यावर्षी दाखल नाही

रत्नागिरी : जिल्ह्यातील धार्मिक अल्पसंख्याकबहुल शासनमान्य खासगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका शाळा व अपंग शाळा यांना दुरूस्तीसह पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागातर्फे योजना राबविण्यात येतात. मात्र, जिल्ह्यातून या योजनेकडे पाठ फिरवली जात असून, यावर्षीही यासाठी एकही प्रस्ताव दाखल झालेला नाही.जिल्ह्यातील धार्मिक अल्पसंख्याकबहुल शासनमान्य खासगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका - नगरपरिषद शाळा व अपंग शाळा यांना पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागातर्फे कमाल दोन लाख रुपये अनुदान रूपात देण्यात येते. अल्पसंख्याक समाजात बौध्द, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, शीख, पारशी व ज्यू या धर्मांचा समावेश आहे.लाभार्थी शाळा, संस्थेमध्ये या अल्पसंख्याक समाजाचे किमान ७० टक्के विद्यार्थी शिकत असणे आवश्यक आहे. कनिष्ठ महाविद्यालय व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या अभ्यासक्रमाच्या समकक्ष दर्जा देण्यात आलेले अभ्यासक्रम चालवणाऱ्या शाळा व व्यावसायिक शिक्षण संस्था तसेच स्वयंअर्थसहाय्यित शाळा तसेच नगरपालिका व जिल्हा परिषदा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिपत्याखाली चालवण्यात येत असलेल्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालये व अपंग शाळा या योजनेसाठी पात्र नाहीत. तसेच यापूर्वी या योजनेंतर्गत पाच वेळा अनुदान दिलेल्या शाळा, संस्थाही पात्र नाहीत.शासनाकडून विविध समाज घटकांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवल्या जातात. मात्र, त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थींकडूनच निरूत्साह दाखविला जात आहे. त्यामुळे दरवर्षीच या योजनांचा निधी पडून राहात आहे. अल्पसंख्याक विकास विभागाच्या डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठीही यावर्षी एकही प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आलेला नाही. योजनांचा लाभ घेण्याबाबत जनतेमध्येच उदासीनता दिसून येत आहे.अल्पसंख्याक समाजात बौध्द, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, शीख, पारशी व ज्यू या धर्मांचा समावेश आहे. मात्र, मुस्लिम धर्माव्यतिरिक्त इतर धर्मिय याबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या सर्वच धर्मियांमधील लोकप्रतिनिधींनी या योजना समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. कल्याणकारी योजना माहिती नसल्याने अनेक समाजातील गरजू व्यक्ती या योजनांपासून वंचित राहात आहेत.

टॅग्स :Studentविद्यार्थीRatnagiriरत्नागिरी