शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

रत्नागिरी : पालवीमुळे आंबा हंगाम लांबणीवर, जिल्ह्याच्या अर्थकारणावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 6:40 PM

गेली काही वर्षे आंबा पिकाला नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागत आहे. हवामानाचा परिणाम आंबा पिकावर होत आहे. यावर्षी तर प्रखर उष्णता व अधूनमधून बरसलेला पाऊस यामुळे जिल्ह्यात पालवीचे प्रमाण ९८ टक्के इतके आहे. पालवी जून होण्यास अडीच ते तीन महिन्याचा कालावधी लागत असल्यामुळे यावर्षी आंब्याचा हंगाम लांबणार हे निश्चित आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या अर्थकारणावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देपालवीमुळे आंबा हंगाम लांबणीवररत्नागिरी जिल्ह्याच्या अर्थकारणावर परिणाम होण्याची शक्यता

रत्नागिरी : गेली काही वर्षे आंबा पिकाला नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागत आहे. हवामानाचा परिणाम आंबा पिकावर होत आहे. यावर्षी तर प्रखर उष्णता व अधूनमधून बरसलेला पाऊस यामुळे जिल्ह्यात पालवीचे प्रमाण ९८ टक्के इतके आहे. पालवी जून होण्यास अडीच ते तीन महिन्याचा कालावधी लागत असल्यामुळे यावर्षी आंब्याचा हंगाम लांबणार हे निश्चित आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या अर्थकारणावर परिणाम होण्याची शक्यता आहे.यावर्षी ३३७३ सेंटीमीटर इतका पाऊस झाला आहे.पावसाचे प्रमाण बऱ्यापैकी राहिले आहे. मात्र सप्टेंबरपासूनच पाऊस गायब असून पावसाळ्यात तीव्र ऊन्हाच्या झळा सोसाव्या लागल्या. आॅक्टोबरमध्ये अधूनमधून पडलेला पाऊस यामुळे आंबा कलमांना पालवी मोठ्या प्रमाणात आली आहे. हंगामापूर्वी उत्पन्न मिळविण्यासाठी कल्टार सारखी संजीवके वापरली जातात. कल्टार वापरूनसुध्दा झाडांना पालवीच आली आहे.साधारणत: ज्यावेळी कलमांची जूनी पाने पानगळ होते, त्याचवेळी नवीन पालवी येण्यास प्रारंभ होतो. वास्तविक सप्टेंबर मध्ये पालवी येणे अपेक्षित होते. परंतु आॅक्टोंबरमध्येच पालवीचे प्रमाण वाढले आहे. पालवी आलेल्या कलमांना मोहोर येण्यासाठी पालवी जून होणे गरजेचे आहे. त्यासाठी अडीच ते तीन महिन्याचा कालावधी लागतो. जर थंडी चांगली असेल तर मात्र मोहोर लवकर येण्याची शक्यता आहे. परंतु आॅक्टोबर निम्मा झाला तरी थंडी गायब आहे. धुके मात्र पडू लागले आहे.

शेतकरी थंडी वाढावी अशी अपेक्षा करीत आहेत. आॅक्टोबरमध्ये जर मोहोर आला तर फळधारणा होवून आंबा मार्चमध्ये बाजारात दाखल होतो. समुद्र किनारपट्टी लगतच्या मोजक्याच झाडांना मोहोर आला आहे. मोहोराचे प्रमाण तर अवघे दोन टक्के आहे. थंडी वाढली तरी पालवी जून होवून मोहोर डिसेंबर उजाडणार आहे.

डिसेंबरमध्ये आलेल्या मोहोराचा आंबा तयार होवून बाजारात येण्यासाठी एप्रिल उजाडणार आहे. एकूणच सध्या तरी पालवी जून होण्यासाठीच प्रतिक्षा करावी लागणार आहे. आंबा एकाचवेळी तयार होवून बाजारात आला तर तर घसरण्याची भिती आहे. पालवीमुळे यावर्षीसुध्दा आंब्याचा हंगाम लांबणार हे निश्चित आहे. एकूणच जिल्ह्याच्या अर्थकारणावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कमी झालेला पाऊस व अधिकत्तम उष्णता यामुळे झाडांना पालवी येण्याचे प्रमाण अधिक आहे. पालवी जून होण्यासाठी नैसर्गिकत: अडीच ते तीन महिने लागतात. आॅक्टोबर निम्मा झाला असून सर्वत्र पालवीच पालवी आहे. एकूण ९८ टक्के पालवीचे प्रमाण आहे. दरवर्षी मार्चमध्ये आंबा बाजारात विक्रीस येतो परंतु यावर्षी आंबा बाजारात येण्यास एप्रिल उजाडण्याची शक्यता आहे. दरवर्षी हवामानातील बदलामुळे उत्पादनामध्ये घट होत असून शेतकऱ्यांना त्याची आर्थिक झळ मोठ्या प्रमाणावर सोसावी लागत आहे. यावर्षीसुध्दा पिक लांबण्याची शक्यता आहे.एम.एस.गुरव, शेतकरी.

शेतकऱ्यांकडून आंब्याला लवकर मोहोर व फळे येण्यासाठी वापरली जाणारी विविध कंपनीची पिक संवर्धन संजिवके वापरण्यात येतात. रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यात ४० हजार लिटर कृषी संजीवकांची विक्री होते. विविध कंपन्याची पिक संवर्धन संजिवके वापरली जातात.

कृषी संजीवकांच्या किमंती भरमसाठ असल्या तरी शेतकरी ती संजीवके वापरतात. यावर्षी संजीवके वापरलेल्या झाडांबरोबर न वापरलेल्या झाडांनासुध्दा मोहोर आला असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे संजीवकांसाठी केलेला खर्च शेतकऱ्यांचा वाया गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

टॅग्स :MangoआंबाRatnagiriरत्नागिरी