शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
4
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
7
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
8
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
9
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
10
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
11
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
12
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
13
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

रत्नागिरी : पाणीबाणीमुळे उद्योगांमधील उत्पादन थांबण्याची भीती; ८ नळयोजना ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2018 2:03 PM

लांजा तालुक्यातील आंजणारी पुलावर रासायनिक द्रवपदार्थाचा टॅँकर अपघातग्रस्त झाल्यानंतर त्यातील रसायन काजळी नदीच्या पाण्यात मिसळले आहे. त्यामुळे सतर्कता म्हणून रत्नागिरी एमआयडिसीने ग्रामपंचायतीना होणारा पाणी पुरवठा थांबविला आहे.

ठळक मुद्देपाणीबाणीमुळे उद्योगांमधील उत्पादन थांबण्याची भीती ८ नळयोजना ठप्प ; उद्योगांमधील उत्पादन ठप्प

रत्नागिरी : लांजा तालुक्यातील आंजणारी पुलावर रासायनिक द्रवपदार्थाचा टॅँकर अपघातग्रस्त झाल्यानंतर त्यातील रसायन काजळी नदीच्या पाण्यात मिसळले आहे. त्यामुळे सतर्कता म्हणून रत्नागिरी एमआयडिसीने ग्रामपंचायतीना होणारा पाणी पुरवठा थांबविला आहे.

एमआयडिसीमधील पुरवठाही बंद आहे. त्यामुळे अनेक औद्योगिक वसाहतीतील अनेक उद्योगांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणीच नसल्याने काही उद्योगांमधील उत्पादन थांबल्याचेही सांगण्यात आले. तर ८ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात पाणीबाणी निर्माण झाली असून नळपाणी योजना ठप्प झाल्या आहेत.रत्नागिरीतील मिरजोळे एमआयडिसी ही जिल्ह्यातील मोठी औद्योगिक वसाहत म्हणून ओळखली जाते. येथे काही मोठे कारखाने आहेत. त्यामध्ये अनेकांना रोजगारही मिळाला आहे. मात्र दोन दिवसांपूर्वी झालेल्या टॅँकरच्या अपघातानंतर येथील उद्योगांमधील काम ठप्प होण्याची भीती निर्माण झाली आहे. प्रकल्पांमधील उत्पादन प्रक्रीयेत पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र पाणी पुरठाच बंद झाल्याने उद्योजकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.मिरजोळे औद्योगिक वसाहतीमध्ये गेल्या दोन दिवसांपासून व्यावसायिकही खासगी टॅँकरचे पाणी मोठ्या प्रमाणात विकत घेत आहेत. मात्र त्यातून अनेक व्यवसायांची पाण्याची गरज काही प्रमाणात भागवली जात आहे.

काही उद्योगांच्या परिसरात बोअरवेलचे पाणी मिळत आहे. येत्या चार दिवसात औद्योगिक वसाहतीमधील पाणी पुरवठा सुरू न झाल्यास पाण्याच्या वापरातून उत्पादन होत असलेल्या अनेक उद्योगांमधील उत्पादन प्रक्रीया ठप्प होण्याची भीती व्यक्त होत आहे.औद्योगिक वसाहतीची पाणी समस्या गंभीर बनलेली असतानाच एमआयडिसी पाणी पुरवठा करीत असलेल्या कुवारबाव, मिरजोळे, नाचणे, कर्ला, शिरगाव, मिऱ्यासह आठ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातही अभूतपूर्व पाणी टंचाई स्थिती निर्माण झाली आहे. ज्यांच्या विहिरी आहेत त्यांना टंचाईची झळ कमी बसत असली तरी असंख्य कुटुंब केवळ नळपाणी योजनेवरच अवलंबून आहेत. त्यामुळे त्यांचे खुपच हाल होत आहेत.खासगी टॅँकरकडून पुरवठापाणी टंचाईमुळे खासगी टॅँकरचे पाणी विकत घेणे हाच अनेकांसमोरील एकमेव पर्याय ठरत आहे. त्यामुळे खासगी वाहनातून टॅँकरने पाणी पुरवठा करणाऱ्यांकडे पाणी मागणी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. परिणामी टॅँकरचे पाणीही वेळेत मिळत नसल्याची स्थिती आहे. समस्या लक्षात घेऊन खासगी टॅँकरने पाणी पुरवठा करणारेही जनतेला सहकार्य करीत आहेत.टॅँकरने पाणी पुरवाएमआयडिसीने पाणी पुरवठा अनिश्चित काळासाठी बंद होणार असल्याची दवंडी रीक्षातून देण्यात आली. मात्र आपत्कालिन स्थितीत गावातील नागरिकांना पर्यायी पाणीपुरवठा व्यवस्था करण्याबाबत कोणत्याही हालचाली नाहीत. अजून किती काळ पाणी मिळणार नाही, याबाबत निश्चिती नसल्याने ग्रामपंचायतीने प्रभागांमध्ये टॅँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

टॅग्स :WaterपाणीRatnagiriरत्नागिरीMuncipal Corporationनगर पालिका