शहरं
Join us  
Trending Stories
1
इंग्लंडचा Super 8 चा दावा कायम, पण ऑस्ट्रेलिया अन् पाऊस ठरवणार गतविजेत्यांचं भविष्य! 
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

रत्नागिरी जिल्ह्यात १२०० लोकांमागे फक्त एकच पोलीस, कामाचा ताण, डबलड्युटीच्या त्रासाने कर्मचारी हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 4:16 PM

रत्नागिरी जिल्ह्याची लोकसंख्या १८ लाख आहे़ त्यावर नियत्रंण ठेण्यासाठी ४ हजार पोलिसांची आवश्यकता आहे़ मात्र, सध्या रत्नागिरी जिल्ह्यात पंधराशेच पोलिसांची कुमक तैनात असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण अधिक वाढल्याचे चित्र दिसत आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यात १२०० लोकांमागे फक्त एकच पोलीसकामाचा ताण, डबलड्युटीच्या त्रासाने कर्मचारी हैराण

रत्नागिरी : जिल्ह्याची लोकसंख्या १८ लाख आहे़ त्यावर नियत्रंण ठेण्यासाठी ४ हजार पोलिसांची आवश्यकता आहे़ मात्र, सध्या रत्नागिरी जिल्ह्यात पंधराशेच पोलिसांची कुमक तैनात असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण अधिक वाढला असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना डबलड्युटीचा त्रास सहन करावा लागत आहे.

सध्या जिल्ह्यात ४ हजार पोलिसांची गरज आहे. परंतु, जिल्ह्यात सध्या १२०० नागरिकांमागे एक पोलीस असे समीकरण आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस शहरीकरण वाढत आहे़. वाढत्या शहरीकरणाबरोबरच गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे़ त्यामुळे पोलिसांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे़.

रत्नागिरी जिल्ह्याची लोकसंख्या १८ लाखांच्या आसपास आहे़ परंतु, त्यावर नियत्रंण ठेवणारे पोलीस बळ मात्र फारच कमी असल्याचे दिसत आहे़ सध्या १२०० लोकांमागे एक पोलीस काम करत आहे़ त्यामुळे हे चित्र बदलण्यासाठी पोलिसांचे मनुष्यबळ वाढणे गरजेचे आहे़.

सद्रक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीदवाक्य डोळ्यासमोर ठेऊन जनतेचे सदैव रक्षण करणाऱ्या पोलिसांना मात्र या अपुऱ्या मनुष्यबळामुळे डबलड्युटीचा त्रास सहन करावा लागत आहे़.१८ लाख लोकसंख्या असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात पोलिसांची संख्या मात्र १५०० इतकीच आहे़ त्यामुळे जिल्ह्यात घडणाऱ्या गुन्ह्यांवर नियत्रंण ठेवणे कठीण बनले आहे़ त्याचाच परिणाम म्हणून जिल्ह्यात घरफोडीचे प्रमाण अधिक वाढले आहे. त्यामुळे पोलिसांची कुमक वाढवणे गरजेचे आहे.रत्नागिरी जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या दृष्टीने जिल्ह्यासाठी ४००० हजार पोलिसांची आवश्यकता आहे़ परंतु, सद्यस्थितीत केवळ १५०० पोलीस कर्मचारी ४ हजार पोलिसांची कामगिरी पार पाडत आहेत.

जिल्हा पोलिसांच्या ताफ्यात आणखी अडीच हजार पोलिसांची कमतरता आहे़ त्यामुळे पोलिसांचे संख्याबळ वाढविणे ही काळाची गरज आहे़. जेणेकरून लोकांचे रक्षण करणाऱ्या पोलिसांवरचा थोडासा तरी भार हलका होईल़ तसेच डबलड्युटीच्या त्रासातूनही त्यांची सुटका होईल. या गोष्टीची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेणे गरजेचे आहे़सध्या जिल्ह्यामध्ये १२०० नागरिकांमागे १ पोलीस काम करत असल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांची पळापळ होताना दिसते. जिल्ह्यातील सर्वच पोलीस स्थानकांमध्ये कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच गुन्ह्यांवर अंकुश ठेण्यासाठी जिल्ह्यात कमीतकमी ४ हजार पोलिसांची तैनात असणे गरजेचे आहे.

त्यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यात व गुन्ह्यांवर नियत्रंण मिळविण्यात यश येणार आहे. जिल्ह्यातील पोलिसांची संख्या ४ हजारावर गेल्यास ४५० नागरिकांमागे एक पोलीस असे प्रमाण राहणार आहे. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांवर पडणारा ताणही कमी होईल. यासाठी जिल्ह्यात पोलीस कर्मचाऱ्यांची भरती होणे ही काळाची गरज बनली आहे.रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यालाही पोलीस कर्मचाऱ्यांची कमतरता भासत आहे. शहर पोलीस ठाण्यात सध्या ८८ कर्मचारी कार्यरत आहेत.

सर्व शहराचा भार हा त्यांच्याच डोक्यावर आहे. त्यामुळे शहरातील गुन्ह्यांवर नियत्रंण ठेवण्यासाठी १२० पोलिसांचा ताफा शहर पोलीस स्थानकात असणे गरजेचे आहे. यामुळे पोलिसांवर असलेला कामाचा ताणही कमी होईल.रत्नागिरी शहरात विनयभंगांचे प्रमाणही वाढले आहे. परंतु, अनेक पीडित तरुणी पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी पुढे येत नाहीत. यासाठी महाविद्यालय व शाळांमध्ये तक्रार पेट्या ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुली आता तक्रारी देण्यासाठी पुढे येऊ लागल्या आहेत. पण त्यासाठी अधिक पोलिसांची गरज आहे.

टॅग्स :PoliceपोलिसRatnagiriरत्नागिरी