शहरं
Join us  
Trending Stories
1
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
2
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
4
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
5
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
6
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
7
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
8
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
9
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
10
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
11
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
12
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
13
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
14
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
15
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
16
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
17
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
18
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
20
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष

रत्नागिरी : सर्वाधिक साठा असूनही पाणीटंचाई तीव्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 20:03 IST

उन्हाळी हंगामात राज्यातील अन्य विभागांपेक्षा सर्वाधिक पाणीसाठा असलेला विभाग अशी कोकणची ओळख यावर्षीही कायम आहे. याच कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील जलप्रकल्पांमध्ये ५३ टक्के जलसाठा असूनही जिल्ह्यातील पाणीटंचाईची समस्या सध्या गंभीर आहे.

ठळक मुद्देराज्यातील सर्वाधिक पाणीसाठा रत्नागिरी विभागात५० टक्केपेक्षा अधिक जलसाठ्याचा वापर टंचाई दूर करा

रत्नागिरी : उन्हाळी हंगामात राज्यातील अन्य विभागांपेक्षा सर्वाधिक पाणीसाठा असलेला विभाग अशी कोकणची ओळख यावर्षीही कायम आहे. याच कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील जलप्रकल्पांमध्ये ५३ टक्के जलसाठा असूनही जिल्ह्यातील पाणीटंचाईची समस्या सध्या गंभीर आहे.

दरवर्षी जिल्ह्यातील जलप्रकल्पांमधील ५० टक्केपर्यंत साठाच सिंचनासाठी वापरला जातो. उर्वरित जलसाठा जिल्ह्यातील उन्हाळी हंगामातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी वापरावा, ही जनतेची मागणी अद्यापही दुर्लक्षित आहे. टंचाई तीव्र असतानाही खेड तालुक्यातील ८ वाड्यांना २ खासगी टॅँकर्सनी पाणीपुरवठा केला जात आहे.जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने ५ कोटी ४९ लाख ८० हजार रुपयांचा संभाव्या पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला आहे. जिल्ह्यातील २६१ गावांमधील ४८६ वाड्यांचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्यात समावेश आहे. मात्र, टंचाई भीषण असतानाही खेड तालुक्याशिवाय अन्यत्र टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू झालेला नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील खासगी व सार्वजनिक विहिरी तसेच अन्य जलसाठ्यांतील पातळी बाष्पीभवनाने खालावली असून्, विहिरी, जलसाठे कोरडे पडले आहेत. जलसाठा असलेले जलसाठे उशाशी आहेत. मात्र, टंचाईग्रस्त भागातील जनतेच्या घशाला कोरड पडली आहे.जिल्हा टंचाई कृती आराखड्यानुसार या उन्हाळी हंगामात ९८ गावांमधील २९३ वाड्यांना पाणी टंचाई भेडसावण्याची शक्यता लक्षात घेऊन ३३ टॅँकरने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन झाले आहे. त्यासाठी ३५ लाख ८५ हजार रुपये खर्च येणार आहे. यंदाच्या टंचाई आराखड्यानुसार लांजा तालुक्यातील ८ गावांमधील ८ वाड्यांमध्ये टंचाईग्रस्तांना पाणी पुरवठा करण्यासाठी खासगी विहिरींच्या अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, या हंगामात विंधन विहिरींची दुरुस्ती किवा विहिरींमधील गाळ काढण्याबाबत कोणतीही आर्थिक तरतूद करण्यात आलेली नाही.पाणीटंचाईवर मात करण्यासाठी यंदा जिल्हा नियोजनमधून ११० गावांमधील १६२ वाड्यांमध्ये विंधन विहिरी मंजूर केल्या आहेत. त्यासाठी ९७ लाख २० हजार रुपयांची तरतूद आराखड्यात केली आहे. यातील काही विंधन विहिरींचे काम सुरू आहे. दरवर्षी जिल्हा परिषदेकडून टंचाई आराखडा तयार केला जातो. मोठ्या संख्येने त्यात संभाव्य टंचाईग्रस्त गाव वाड्यांचा समावेश होतो. प्रत्यक्षात कार्यवाही किती होते, हा संशोधनाचा विषय ठरतो आहे.कोकणातील प्रकल्पांमध्ये पावसाळा येईपर्यंत मुबलक जलसाठा उपलब्ध असतो. मध्यम प्रकल्पांमध्येही पाणीसाठा असतो. या प्रकल्पांमधून साडेआठ हजार हेक्टर शेतीसाठी पाणी उपलब्ध होते. प्रत्यक्षात साडेतीन ते चार हजार हेक्टर क्षेत्रच ओलिताखाली आणले जाते. त्यामुळे ५० टक्केपेक्षा अधिक जलसाठा हा पावसाळा येईपर्यंत विनावापर धरणांमध्येच पडून राहतो. पावसाने पुन्हा ही धरणे भरून जातात. या उर्वरित धरणसाठ्याचा टंचाई दूर करण्यासाठी वापर होऊ शकतो. त्यासाठी टंचाईग्रस्त गावे आणि ही धरणे यांची ह्यकनेक्टिव्हिटीह्ण असणे आवश्यक आहे.सर्वाधिक साठा कोकणात२३ एप्रिल २०१८च्या नोंदीप्रमाणे राज्यातील ३२४६ जलप्रकल्पांमध्ये ३३.६० टक्के पाणीसाठा होता. त्यामध्ये सर्वाधिक जलसाठा हा कोकण विभागातील १७५ प्रकल्पांमध्ये ५०.७१ टक्के एवढा आहे. अमरावती व नागपूर विभागांमध्ये सरासरी केवळ १८ टक्के एवढाच जलसाठा शिल्लक असून, तेथील जलसंकट तीव्र आहे.रत्नागिरी शहरात टॅँकरने पाणीपुरवठा सुरूरत्नागिरी शहराची नळपाणी योजना जुनी झाल्याने जागोजागी या योजनेच्या जलवाहिन्या बाद झाल्या आहेत. ६३ कोटी खर्चाच्या या सुधारित नळपाणी योजनेचे काम आता सुरू झाले आहे. मात्र, शहरात कमीदाबाने अपुरा पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे नगर परिषदेतर्फे दररोज टॅँकरने ३० ते ४० फेऱ्यांद्वारे शहरात पाणीपुरवठा केला जात आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीkonkanकोकणWaterपाणी