शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

रत्नागिरी : सर्वाधिक साठा असूनही पाणीटंचाई तीव्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 20:03 IST

उन्हाळी हंगामात राज्यातील अन्य विभागांपेक्षा सर्वाधिक पाणीसाठा असलेला विभाग अशी कोकणची ओळख यावर्षीही कायम आहे. याच कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील जलप्रकल्पांमध्ये ५३ टक्के जलसाठा असूनही जिल्ह्यातील पाणीटंचाईची समस्या सध्या गंभीर आहे.

ठळक मुद्देराज्यातील सर्वाधिक पाणीसाठा रत्नागिरी विभागात५० टक्केपेक्षा अधिक जलसाठ्याचा वापर टंचाई दूर करा

रत्नागिरी : उन्हाळी हंगामात राज्यातील अन्य विभागांपेक्षा सर्वाधिक पाणीसाठा असलेला विभाग अशी कोकणची ओळख यावर्षीही कायम आहे. याच कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील जलप्रकल्पांमध्ये ५३ टक्के जलसाठा असूनही जिल्ह्यातील पाणीटंचाईची समस्या सध्या गंभीर आहे.

दरवर्षी जिल्ह्यातील जलप्रकल्पांमधील ५० टक्केपर्यंत साठाच सिंचनासाठी वापरला जातो. उर्वरित जलसाठा जिल्ह्यातील उन्हाळी हंगामातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी वापरावा, ही जनतेची मागणी अद्यापही दुर्लक्षित आहे. टंचाई तीव्र असतानाही खेड तालुक्यातील ८ वाड्यांना २ खासगी टॅँकर्सनी पाणीपुरवठा केला जात आहे.जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने ५ कोटी ४९ लाख ८० हजार रुपयांचा संभाव्या पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला आहे. जिल्ह्यातील २६१ गावांमधील ४८६ वाड्यांचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्यात समावेश आहे. मात्र, टंचाई भीषण असतानाही खेड तालुक्याशिवाय अन्यत्र टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू झालेला नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील खासगी व सार्वजनिक विहिरी तसेच अन्य जलसाठ्यांतील पातळी बाष्पीभवनाने खालावली असून्, विहिरी, जलसाठे कोरडे पडले आहेत. जलसाठा असलेले जलसाठे उशाशी आहेत. मात्र, टंचाईग्रस्त भागातील जनतेच्या घशाला कोरड पडली आहे.जिल्हा टंचाई कृती आराखड्यानुसार या उन्हाळी हंगामात ९८ गावांमधील २९३ वाड्यांना पाणी टंचाई भेडसावण्याची शक्यता लक्षात घेऊन ३३ टॅँकरने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन झाले आहे. त्यासाठी ३५ लाख ८५ हजार रुपये खर्च येणार आहे. यंदाच्या टंचाई आराखड्यानुसार लांजा तालुक्यातील ८ गावांमधील ८ वाड्यांमध्ये टंचाईग्रस्तांना पाणी पुरवठा करण्यासाठी खासगी विहिरींच्या अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, या हंगामात विंधन विहिरींची दुरुस्ती किवा विहिरींमधील गाळ काढण्याबाबत कोणतीही आर्थिक तरतूद करण्यात आलेली नाही.पाणीटंचाईवर मात करण्यासाठी यंदा जिल्हा नियोजनमधून ११० गावांमधील १६२ वाड्यांमध्ये विंधन विहिरी मंजूर केल्या आहेत. त्यासाठी ९७ लाख २० हजार रुपयांची तरतूद आराखड्यात केली आहे. यातील काही विंधन विहिरींचे काम सुरू आहे. दरवर्षी जिल्हा परिषदेकडून टंचाई आराखडा तयार केला जातो. मोठ्या संख्येने त्यात संभाव्य टंचाईग्रस्त गाव वाड्यांचा समावेश होतो. प्रत्यक्षात कार्यवाही किती होते, हा संशोधनाचा विषय ठरतो आहे.कोकणातील प्रकल्पांमध्ये पावसाळा येईपर्यंत मुबलक जलसाठा उपलब्ध असतो. मध्यम प्रकल्पांमध्येही पाणीसाठा असतो. या प्रकल्पांमधून साडेआठ हजार हेक्टर शेतीसाठी पाणी उपलब्ध होते. प्रत्यक्षात साडेतीन ते चार हजार हेक्टर क्षेत्रच ओलिताखाली आणले जाते. त्यामुळे ५० टक्केपेक्षा अधिक जलसाठा हा पावसाळा येईपर्यंत विनावापर धरणांमध्येच पडून राहतो. पावसाने पुन्हा ही धरणे भरून जातात. या उर्वरित धरणसाठ्याचा टंचाई दूर करण्यासाठी वापर होऊ शकतो. त्यासाठी टंचाईग्रस्त गावे आणि ही धरणे यांची ह्यकनेक्टिव्हिटीह्ण असणे आवश्यक आहे.सर्वाधिक साठा कोकणात२३ एप्रिल २०१८च्या नोंदीप्रमाणे राज्यातील ३२४६ जलप्रकल्पांमध्ये ३३.६० टक्के पाणीसाठा होता. त्यामध्ये सर्वाधिक जलसाठा हा कोकण विभागातील १७५ प्रकल्पांमध्ये ५०.७१ टक्के एवढा आहे. अमरावती व नागपूर विभागांमध्ये सरासरी केवळ १८ टक्के एवढाच जलसाठा शिल्लक असून, तेथील जलसंकट तीव्र आहे.रत्नागिरी शहरात टॅँकरने पाणीपुरवठा सुरूरत्नागिरी शहराची नळपाणी योजना जुनी झाल्याने जागोजागी या योजनेच्या जलवाहिन्या बाद झाल्या आहेत. ६३ कोटी खर्चाच्या या सुधारित नळपाणी योजनेचे काम आता सुरू झाले आहे. मात्र, शहरात कमीदाबाने अपुरा पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे नगर परिषदेतर्फे दररोज टॅँकरने ३० ते ४० फेऱ्यांद्वारे शहरात पाणीपुरवठा केला जात आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीkonkanकोकणWaterपाणी