शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

रत्नागिरी : सीईटी घेण्याचा निर्णय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास मर्यादा, कृषी महाविद्यालये ओस पडण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 16:06 IST

बारावीनंतर वैद्यकीय, अभियांत्रिकीबरोबरच आता कृषी पदवी अभ्यासक्रमासाठीही सीईटी घेण्याचा निर्णय झाला असून, या परीक्षेसाठी आॅनलाईन अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. शैक्षणिक वर्षाच्या अखेरीस झालेल्या या निर्णयाची माहिती इच्छुक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास आता मर्यादा येणार आहेत. त्यामुळे ही महाविद्यालये यंदा ओस पडण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देकृषी महाविद्यालये यंदा ओस पडण्याची शक्यतासीईटी घेण्याचा निर्णय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास मर्यादा

दापोली : बारावीनंतर वैद्यकीय, अभियांत्रिकीबरोबरच आता कृषी पदवी अभ्यासक्रमासाठीही सीईटी घेण्याचा निर्णय झाला असून, या परीक्षेसाठी आॅनलाईन अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. शैक्षणिक वर्षाच्या अखेरीस झालेल्या या निर्णयाची माहिती इच्छुक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास आता मर्यादा येणार आहेत. त्यामुळे ही महाविद्यालये यंदा ओस पडण्याची शक्यता आहे.आजतागायत बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्रावर हा प्रवेश मिळत होता. त्यात स्थानिक शेतजमिनीचा कौटुंबीक सातबारा, बारावीपर्यंतच्या कृषी विषयाचे गुण वाढीव म्हणून ग्राह्य धरण्यात येत होते. यंदा मात्र या गुणांपेक्षा सर्वाधिक महत्त्व सीईटीच्या गुणांना देण्यात येणार आहे, किंबहुना ही परीक्षा उत्तीर्ण नसल्यास इच्छुक उमेदवारांना कृषी प्रवेशासाठी अपात्र ठरविण्यात येणार आहे.मुळात कृषी पदवी अभ्यासक्रमाला व्यावसायिक म्हणून दर्जा देण्याचा निर्णय गेल्या वर्षीच भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने घेतला होता. त्यानंतर राज्यातील एमसीएईआर अर्थात महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेनेही त्यावर तातडीने शिक्कामोर्तब केले होते. मात्र, इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांप्रमाणे कृषी शिक्षणाचाही प्रवेश सीईटीद्वारे होईल, असे कोणतेच संकेत त्यावेळी देण्यात आले नव्हते. मात्र, दरम्यानच्या काळात राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांचे कुलगुरू आणि संबंधित पदाधिकाऱ्यांची बैठक एमसीएईआरने आयोजित केली.यावेळी कृषी विद्यापीठाच्या स्तरावर अशी सीईटी घेणे शक्य आहे का, याबाबत चाचपणी करण्यात आली. तेव्हा ही जबाबदारी वैद्यकीय, अभियांत्रिकी अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी सामायिक प्रवेश परीक्षा घेणाऱ्या राज्य सीईटी सेलकडे देणे योग्य ठरेल, असे मत व्यक्त करण्यात आले होते. विशेष म्हणजे या निर्णयाची प्रक्रिया गेले चार महिने एमसीएईआरमध्ये सुरू होती. मात्र, याची माहिती १७ जानेवारीला सीईटी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतरच कृषी विद्यापीठांना याची माहिती मिळाली आहे. या परीक्षेसाठी आॅनलाईन अर्ज करण्यास १८ जानेवारीपासून सुरूवातही झाली आहे.मुळात इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी इच्छुक उमेदवार आधीपासूनच तयारी करतात. या वेळापत्रकाची विद्यार्थ्यांकडून वाट पाहिली जाते. मात्र, कृषी पदवी अभ्यासक्रमासाठी इच्छुक उमेदवारांनी सीईटीचा आतापर्यंत कधीच विचार केलेला नाही. त्यामुळे सीईटीनुसार होणाऱ्या या नव्या प्रवेश प्रकियेची माहिती ग्रामीण भागातील इच्छुक उमेदवारांपर्यंत पोचेपर्यंत खूप विलंब होणार आहे.या सीईटीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च अशी असून, १० मे रोजी परीक्षा होणार आहे. कृषी अभ्यासक्रमासाठी सीईटी उत्तीर्ण होणे गरजेचे आहे, ही माहिती ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्याचे नवे आव्हान कृषी विद्यापीठ यंत्रणेवर आलेले आहे. त्यातून अनेक कृषी महाविद्यालयांतील विद्यार्थी संख्या अपूर्ण राहण्याची शक्यता आहे.१५६ खासगी, ३५ शासकीयराज्यातील चार कृषी विद्यापीठांच्या कार्यक्षेत्रात एकूण १५६ खासगी आणि ३५ शासकीय कृषी महाविद्यालये आहेत. यामध्ये १५ हजार २२७ जागांचा समावेश असून, गेल्या वर्षी ५५ हजार अर्ज आले होते. त्यावेळी ही प्रवेश प्रक्रिया बीएस्सीच्या धर्तीवर खुल्या स्वरूपाची होती. यंदा त्यामध्ये बदल करण्यात आला आहे. नव्या प्रवेश प्रक्रियेच्या माहिती प्रसाराचे आव्हान कृषी विद्यापीठांसमोर असून, यंदा कृषी महाविद्यालये ओस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रStudentविद्यार्थी