शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
2
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
3
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
4
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
5
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
6
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
7
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
8
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
9
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
10
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
11
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
12
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अंबानी-अदानी-मस्क-झुकरबर्ग यांनाही मागे टाकलं...
13
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
14
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
15
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
16
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
17
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
18
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
19
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
20
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट

रत्नागिरी :  अंत्योदय, प्राधान्य कार्डधारकांची दिवाळी गोड, आता चणाडाळ, उडीदडाळ बरोबरच साखर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 5:06 PM

दिवाळीच्या सणाच्या आधीच राज्याच्या पुरवठामंत्र्यांनी रास्त दर धान्य दुकानांवर आता चणाडाळ, उडीदडाळ याबरोबरच साखर देण्याची घोषणा केल्याने आता अंत्योदयबरोबरच प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारकांचीही दिवाळी ह्यगोडह्ण होणार आहे. जिल्ह्यासाठी साखर उपलब्ध झाली असून चणाडाळ तसेच उडीदडाळीची मागणीही प् करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांनी मंगळवारी दिली.

ठळक मुद्देअंत्योदय, प्राधान्य कार्डधारकांची दिवाळी गोडधान्य दुकानांवर आता चणाडाळ, उडीदडाळ याबरोबरच साखर देण्याची घोषणा

रत्नागिरी : दिवाळीच्या सणाच्या आधीच राज्याच्या पुरवठामंत्र्यांनी रास्त दर धान्य दुकानांवर आता चणाडाळ, उडीदडाळ याबरोबरच साखर देण्याची घोषणा केल्याने आता अंत्योदयबरोबरच प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारकांचीही दिवाळी गोड होणार आहे. जिल्ह्यासाठी साखर उपलब्ध झाली असून चणाडाळ तसेच उडीदडाळीची मागणीही प् करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांनी मंगळवारी दिली.गेल्या सोमवारी अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी ही घोषणा केली असून तसा शासन अध्यादेशही काढण्यात आला आहे. आत्तापर्यंत अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना प्रति कुटुंब एक किलो साखर मिळत होती. त्यानंतर काही दिवसांपुर्वीच रास्त दर धान्य दुकानांवर ३५ रूपये किलो दराने तूरडाळही उपलब्ध करून देण्यात आली आहे.त्यातच आता दिवाळी जवळ आल्याने राज्याच्या पुरवठा विभागाने पुन्हा प्रति कुटुंब एक किलो चणाडाळ तसेच उडीद डाळ ३५ रूपये किलो दराने देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर दिवाळीसाठी आॅक्टोबर महिन्यात अंत्योदय शिधापत्रिकाधारकांबरोबरच प्राधान्य गटालाही साखर मिळणार आहे. दिवाळीपुर्वीच जिल्हा पुरवठा विभागाकडे या महिन्यातच साखर उपलब्ध झाली आहे. त्यामुळे दिवाळीसाठी का होईना पण प्राधान्य कुटुंबाला साखर मिळणार असल्याने दिवाळी गोड होणार आहे.तसेच पुरवठा मंत्री बापट यांनी जाहीर केल्याप्रमाणे आता चणाडाळ आणि उडीदडाळही या महिन्याच्या अखेरीस उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यात अंत्योदय शिधापत्रिकाधारकांची संख्या ४२,२९७ तसेच प्राधान्य शिधापत्रिकाधारक कुटुंबे २,३७,२४७ इतकी आहेत. शासनाने जाहीर केल्याप्रमाणे दिवाळीपुवी चणाडाळ आणि उडीद डाळ रेशनदुकानांवर उपलब्ध होण्यासाठी प्रत्येकी २७९५ क्विंटलची मागणी जिल्हा पुरवठा विभागाकडून करण्यात आली आहे. आॅक्टोबरच्या अखेरपर्यंत धान्य जिल्ह्याला उपलब्ध होणार असल्याचे डॉ. फड यांनी सांगितले.जिल्ह्यात अंत्योदय शिधापत्रिकाधारक ४२,२९७ इतके आहेत. आत्तापर्यंत या शिधापत्रिकावरील कुटुंबासाठी प्रति किलो साखर रेशनदुकानावर दिली जाते. मात्र, केवळ दिवाळीसाठी एक महिन्याकरिता प्राधान्य कुटुंबाला एक किलो साखर दिली जाणार आहे. मात्र, यापुढे या दोन्ही शिधापत्रिकाधारकांना तूरडाळ, चणाडाळ तसेच उडीदडाळ प्रतिकिलो ३५ रूपये दराने एक किलो डाळ मिळणार आहे.

टॅग्स :GovernmentसरकारRatnagiriरत्नागिरी