शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

रत्नागिरी : आंब्याची ७५ टक्के आवक घटली,  गुढीपाडव्याला शेतकऱ्यांनी केली आंबातोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 4:33 PM

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांनी आंबातोडीचा मुहूर्त केला आहे. यावर्षी आंबा उत्पादन घटले असल्यामुळे हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच शेतकऱ्यांनी आंबा तोडणीचा हा मुहूर्त साधला. वाशीतील एपीएमसी मार्केटमध्ये पाच हजार पेट्या विक्रीला आल्या होत्या. मात्र, रविवार असल्याने मार्केटला सुटी होती, त्यामुळे विक्री झालीच नाही. मात्र, सोमवारी दहा हजार पेट्या विक्रीला आल्या.

ठळक मुद्देगतवर्षी याचदिवशी वाशी मार्केटला ६० हजार पेट्या विक्रीलाशेतकऱ्यांकडील आंबा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात तयार होण्याची शक्यता

रत्नागिरी : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांनी आंबातोडीचा मुहूर्त केला आहे. यावर्षी आंबा उत्पादन घटले असल्यामुळे हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच शेतकऱ्यांनी आंबा तोडणीचा हा मुहूर्त साधला.

वाशीतील एपीएमसी मार्केटमध्ये पाच हजार पेट्या विक्रीला आल्या होत्या. मात्र, रविवार असल्याने मार्केटला सुटी होती, त्यामुळे विक्री झालीच नाही. मात्र, सोमवारी दहा हजार पेट्या विक्रीला आल्या. दोन्ही दिवसांच्या मिळून १५ हजार पेट्या विक्रीसाठी आल्या होत्या. गतवर्षी याच दिवशी ६० हजार पेट्या विक्रीला आल्या होत्या. गतवर्षीच्या तुलनेत आंबा उत्पादन यंदा ७५ टक्क्यांनी आवक घटली आहे.मे महिन्याप्रमाणे उष्म्याच्या झळा मार्चपासून सोसाव्या लागत आहेत. रत्नागिरीत ३३ अंश सेल्सिअस कमाल, तर २६ अंश किमान तापमान असल्यामुळे ह्यफळांचा राजाह्ण तयार होऊ लागला आहे. उष्म्यामुळे काही ठिकाणी आंब्यावर काळे डाग पडत आहेत. त्यामुळे या भाजलेल्या आंब्याला मागणी नाही.

शिवाय कैरीदेखील गळत असल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. उष्णतेमुळे आंबा गळून पडण्याचा धोका वाढला आहे. कातळावरील बागांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. कातळ तापत असल्यामुळे आंब्याचा दर्जा घसरण्याचा धोका आहे. त्यामुळे काही शेतकरी झाडांना पाणी देत आहेत.उष्णतेमुळे आंबा भाजण्याचे, गळ होण्याचे प्रमाण वाढले, त्याचप्रमाणे आंबा लवकर तयार होऊ लागला आहे. वास्तविक यावर्षी पीक उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. गतवर्षी गुढीपाडव्याला ६० हजार पेट्या विक्रीला उपलब्ध होत्या. मात्र, यावर्षी दोन दिवसात १५ हजार पेट्या विक्रीसाठी आल्या.

सध्या १५०० ते ४००० रूपये दराने आंबा पेटीची विक्री सुरू आहे. यावर्षी आंबा उत्पादनच कमी असल्यामुळे शेतकऱ्यां नी आंबा उत्पादनासाठी केलेला खर्च भरून निघणेही अवघड झाले आहे. काही शेतकऱ्यांनी पाडव्याच्या मुहूर्तावर आंबाकाढणी केली असली तरी बहुतांश शेतकऱ्यांकडील आंबा हा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात तयार होण्याची शक्यता अधिक आहे.कोकणाबरोबर परराज्यातूनही आंबा तितक्याच प्रमाणात विक्रीला येत आहे. कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश या राज्यांमधून दररोज आंब्याची आवक होत आहे. हापूस, लालबाग, तोतापुरी, बदामी, गुहा आदी विविध प्रकारचा आंबा विक्रीसाठी येत आहे. मात्र, हा आंबा किलोवर विकण्यात येत असून, हापूस ५० ते १०० रूपये किलो, लालबाग २० ते ३५ रूपये किलो, तोतापुरी २० ते ३० रूपये किलो, गुहा २० रूपये किलो दराने विकण्यात येत आहे. तर कोकणातील हापूस आंबा डझनावर विकण्यात येत आहे.शासनाने दलालांची हमाली बंद केल्याने त्याचा परिणाम गतवर्षीपासून आंबा विक्रीवर झाला आहे. वाशी मार्केटमध्ये शेतकऱ्यांच्या आंब्याला फारसा दर मिळत नाही. मात्र, उपनगरांमध्ये होच आंबा अधिक किंमतीने विकण्यात येत आहे. कर्नाटक हापूसची कोकणचा हापूस म्हणून विक्री करून ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. चौथ्या टप्प्यातील आंबा झाडावर आहे. मात्र, त्याचे प्रमाणही अल्पच आहे. तसेच उष्म्यामुळे तो कितपत टिकेल, अशी भीती शेतकऱ्यांना आहे.अत्यल्प प्रमाणयावर्षी ओखी वादळ, अवकाळी पाऊस, पुनर्मोहोर, वाढता उष्मा यामुळे आंबा पिकावर परिणाम झाला. बहुतांश शेतकऱ्यांनी आंबा अधिक प्रमाणात नसल्यामुळे आपल्याकडील नेपाळी कामगारांना परत पाठवले आहे. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील आंबा तयार होऊन बाजारात येऊ लागला असला तरी त्याचे प्रमाण अत्यल्प आहे.

टॅग्स :fruitsफळेRatnagiriरत्नागिरी