शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
3
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
4
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
5
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
6
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
7
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
8
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
9
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
10
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
11
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
12
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
13
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
14
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
15
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
16
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
17
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
18
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
20
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात

रत्नागिरी :  शेताच्या बांधावर योजनेंतर्गत रत्नागिरीला २ लाख ७०० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 2:11 PM

सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार ग्रामीण योजनेंतर्गत जिल्ह्यात शेताच्या बांधावर वृक्ष लागवड करण्याचा निर्धार शासनाने केला आहे. या योजनेंतर्गत जॉबकार्डधारक शेतकऱ्यांच्याच बांधावर वृक्ष लागवड केली जाणार असून, प्रत्येक तालुक्यासाठी २२ हजार ३०० वृक्षलागवडीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यामुळे नऊ तालुक्यांतर्गत एकूण दोन लाख ७०० वृक्ष लागवड शेताच्या बांधावर होणार आहे.

ठळक मुद्देजॉबकार्डधारक शेतकऱ्यांच्या बांधावर वृक्ष लागवडप्रत्येक तालुक्यासाठी २२ हजार ३०० वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ग्रामपंचायतीकडे अर्ज करणे आवश्यक, योजनेची प्रक्रिया सुरू

मेहरून नाकाडेरत्नागिरी : सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार ग्रामीण योजनेंतर्गत जिल्ह्यात शेताच्या बांधावर वृक्ष लागवड करण्याचा निर्धार शासनाने केला आहे. या योजनेंतर्गत जॉबकार्डधारक शेतकऱ्यांच्याच बांधावर वृक्ष लागवड केली जाणार असून, प्रत्येक तालुक्यासाठी २२ हजार ३०० वृक्षलागवडीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यामुळे नऊ तालुक्यांतर्गत एकूण दोन लाख ७०० वृक्ष लागवड शेताच्या बांधावर होणार आहे.एमजी नरेगा योजनेंतर्गत जॉबकार्डधारक अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, विमुक्त जाती, दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी, कर्ता पुरूष नसलेली कुटुंब, जमीन सुधारणांचे लाभार्थी, इंदिरा आवास, वननिवासी लाभार्थी यांना प्राधान्य दिल्यानंतर कृषी कर्जमाफी व कर्जसहाय्य योजनेतील लहान व सीमांत भूधारक शेतकऱ्यांच्या जमिनींवरही हा कार्यक्रम राबविला जाणार आहे. या उपक्रमासाठी काही निकष ठरवण्यात आले आहेत. यामध्ये लाभार्थ्यांच्या नावावर जमीन असणे आवश्यक आहे. तसेच पाच एकरपेक्षा कमी क्षेत्र अपेक्षित आहे.इच्छुकांनी या योजनेसाठी आपले अर्ज ग्रामपंचायतीकडे दाखल करायचे आहेत. त्यानंतर तो अर्ज ग्रामपंचायतीने आपल्या शिफारशींसह सामाजिक वनीकरणाच्या संबंधित शाखेत हस्तांतरित करायचा आहे.

यानंतर वनपाल प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करून अंदाजपत्रक तयार करून तांत्रिक मंजुरीसह प्रस्ताव सामाजिक वनीकरणाकडे सादर करणार आहेत. जिल्ह्यातील सर्व प्रस्ताव करून सामाजिक वनीकरण विभागातर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहेत.

पावसाळ्यात या योजनेंतर्गत बांधावर वृक्षलागवड करण्यात येणार आहे. एमजी नरेगांतर्गत जॉब कार्डधारक शेतकऱ्यांच्या बांधावर वृक्षलागवड कार्यक्रम सामाजिक वनीकरण विभागाने हाती घेतला आहे. त्यानुसार ग्रामपंचायत स्तरावर संपर्क साधण्यात आला असून, शेतकऱ्यांकडून याबाबत विचारणा होत आहे.

राजापूर, खेड, लांजा तालुक्यातून शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. साग, बांबू लागवडीला शेतकऱ्यांची पसंती होत आहे. याशिवाय चंदन व काजू लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांनी तयारी दर्शविली आहे. राजापूर तालुक्यातील पाचल, हातदे, कारवली, सौंदळ, तळवडे येथे एकूण १९ हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड केली जाणार आहे. पाचल येथील १३ शेतकरी बांबू लागवडीसाठी तयार झाले आहेत.

ग्रामपंचायतीमार्फत वृक्ष लागवडीसाठी प्राधान्य देण्यात आले आहे. उत्तम व सुक्ष्म नियोजनाव्दारे गाव हिरवेगार, पर्यावरण समृध्द, स्वच्छ, सुंदर करण्याचा मानस आहे. त्यामुळे लागवडीसाठी प्रत्येक ग्रामपंचायतीच्या सरंपचांना पत्र पाठविण्यात आले आहे.ग्रामपंचायतस्तरावर वृक्ष लागवडीबाबत सभा घेण्यात येणार असून, त्यांना या योजनेची माहिती देण्यात येत असून, ग्रामपंचायतीशी किंवा तालुका वनक्षेत्रपालाशी संपर्क साधावा. शेतकऱ्यांनी पाठवलेले अर्ज ग्रामपंचायतीकडून सामाजिक वनीकरण विभागाकडे व तेथून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविले जाणार आहेत.

बांधावरील वृक्ष लागवडीसाठी जिल्हा परिषद अध्यक्ष, सदस्यांना पत्रव्यवहार करण्यात आले आहेत. लाभार्थी शेतकऱ्यांचा ओढा बांबू, साग, काजू, चंदनासाठी आहे. चिखलगाव येथील शेतऱ्यांनी साग लागवड करण्याचे ठरविले आहे.

 

बांबू, सागाची रोपे रोपवाटिकेत, तर काजूची रोपे कृषी विभागाच्या रोपवाटिकेत उपलब्ध आहेत. प्रतिकूल परिस्थितही बांबू, साग लागवड चांगली असल्यामुळे सर्वाधिक मागणी आहे. शेतकऱ्यांना खात्यात रोपांची रक्कम मागणीप्रमाणे जमा केली जाणार आहे. पावसाळ्यात दोन लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण केले जाणार आहे. 

- सी. एल. धुमाळ, 

विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण रत्नागिरी.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीforestजंगल