शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

राजापुरात गंगामाई दर्शनासाठी भाविकांनी घेतली गंगाक्षेत्रावर धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 16:59 IST

राजापूरपासून जवळच असलेल्या उन्हाळे येथील गंगामाईचे आगमन झाले. ही वार्ता सर्वत्र पसरली व भाविकांनी गंगाक्षेत्रावर धाव घेतली.  अनेकांनी स्नानाची पर्वणी साधली. गंगेच्या मागील गमनानंतर सुमारे १६० दिवसांनी ती अवतरली असून यापूर्वी दर तीन वर्षांनी नियमित येणाऱ्या गंगामाईच्या आगमन व गमन या कालखंडाला छेद गेल्याचे अधोरेखीत झाले आहे. गंगाक्षेत्रावरील सर्व कुंडे तुडुंब पाण्याने भरली आहेत.

ठळक मुद्देराजापुरात गंगामाई दर्शनासाठी भाविकांनी घेतली गंगाक्षेत्रावर धाव कुंडे पाण्याने भरली : १६० दिवसांनी गंगामाईचे पुन्हा दर्शन

राजापूर : राजापूरपासून जवळच असलेल्या उन्हाळे येथील गंगामाईचे आगमन झाले. ही वार्ता सर्वत्र पसरली व भाविकांनी गंगाक्षेत्रावर धाव घेतली.  अनेकांनी स्नानाची पर्वणी साधली. गंगेच्या मागील गमनानंतर सुमारे १६० दिवसांनी ती अवतरली असून यापूर्वी दर तीन वर्षांनी नियमित येणाऱ्या गंगामाईच्या आगमन व गमन या कालखंडाला छेद गेल्याचे अधोरेखीत झाले आहे. गंगाक्षेत्रावरील सर्व कुंडे तुडुंब पाण्याने भरली आहेत.मागील वेळी ७ जुलै २०१८ ला गंगेचे आगमन झाले होते व १५ नोव्हेंबर २०१८ ला ती अंतर्धान पावली होती. जवळपास शंभराहून अधिक दिवस तिचे वास्तव होते. यापूर्वी दर तीन वर्षांनी प्रकट होणारी गंगा त्यानंतर काही काळ वास्तव्याला असायची व नंतर ती अंतर्धान पावत असे. मात्र, गेल्या काही वर्षांत गंगेच्या आगमन व गमन या कालखंडात बदल झाला असल्याचे पहावयास मिळाले. या कालावधीत तिच्या वास्तव्याचा कालावधी वाढला होता. शिवाय तिचे सलग आगमन झाल्याचेही पहावयास मिळाले होते.गतवेळी १५ नोव्हेंबरला गंगा अंतर्धान पावल्यानंतर सुमारे १६० दिवसांनंतर ती गुरुवारी सकाळी सातच्या दरम्यान पुन्हा अवतीर्ण झाली. गंगेच्या पुजेसाठी दररोज जाणारे राहुल काळे हे पुजारी गुरुवारी तेथे गेले असता गंगा आल्याचे त्यांच्या निदर्शनाला आले. त्यानंतर काळे यांनी गंगापुत्रांसहीत इतरत्र याची माहिती दिली.

राजापुरात गंगामाई दर्शनासाठी भाविकांनी घेतली गंगाक्षेत्रावर धाव

गंगा आल्याचे वृत्त क्षेत्राच्या आजूबाजूला पसरताच अनेकांनी गंगाक्षेत्रावर धाव घेतली. त्यावेळी मुख्य असलेल्या काशीकुंडासहीत अन्य कुंडे तुडुंब पाण्याने भरली होती तर काशीकुंडाच्याच बाजूला असलेल्या गोमुखातून पाणी वाहत होते. गंगेचे आगमन झाल्यानंतर गुरुवारी दिवसभर भाविकांची गंगाक्षेत्रावर रिघ सुरू होती.राजापूर शहराच्या पुरातन ओळख सांगणाऱ्या ठळक बाबींमध्ये गंगेचा उल्लेख कायम केला जातो. दर तीन वर्षांनी अवतीर्ण होणारी गंगा इतिहास काळापासून प्रचलित आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, काशीचे सुप्रसिद्ध गागाभट्ट, कवी मोरोपंत यांनी राजापूरच्या गंगाक्षेत्राला भेट दिल्याची माहिती इतिहासातून मिळते.

या गंगेचा संबंध काशी या क्षेत्राशी पूर्वापार जोडला जातो. या गंगेच्या आगमनाबाबत पूर्वापार कथा प्रचलित आहे. मागील काही वर्षांमध्ये तिच्या आगमन व गमन या नियमिततेमध्ये बदल झाला असून त्यामुळे दर तीन वर्षांनी या तिच्या आगमन काळाला छेद गेला आहे. यापूर्वी सन २००४ साली गंगेचा धुतपापेश्वरशी विवाह सोहळा पार पडला होता. 

टॅग्स :Rajapurchi Gangaराजापूरची गंगाRatnagiriरत्नागिरी