शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
2
"तुमच्या मर्यादेत राहा..." ODI मालिका जिंकताच गंभीरनं काढला मनातला राग! तो नेमकं कुणाला अन् काय म्हणाला?
3
एकनाथ शिंदेंनी मुलाचे भरसभेत केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, “श्रीकांत हे व्हिजन असलेले खासदार”
4
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
5
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
6
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
7
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिका गाजवणारा 'किंग' ठरला कोहली! तेंडुलकरचा 'महारेकॉर्ड' मोडला
8
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
9
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
10
“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
11
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
12
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
13
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
14
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
15
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
16
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
17
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
18
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
19
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
20
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी, सिधुदुर्ग जिल्ह्यांत पावसाचा कहर; चिपळूण, राजापुरात पूरस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 12:38 IST

नद्यांनी ओलांडली इशारा पातळी

रत्नागिरी/सिधुदुर्ग : रत्नागिरी आणि सिधुदुर्ग जिल्ह्यांत गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने मंगळवारी कहर केला. मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील सहा मुख्य नद्यांनी इशारा पातळी ओलांडली होती. पुराचे पाणी चिपळूण आणि राजापूर शहरात शिरल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गडनदी, वाघोटन नदी, शुकनदी, भंगसाळ नदी या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अनेक ठिकाणी पुराचे, पावसाचे पाणी रस्त्यावर आल्याने वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.पावसाने सोमवारी दिवसभर संततधार धरल्याने खेडमधील जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली हाेती. तर चिपळूणमधील वाशिष्ठी संगमेश्वरमधील शास्त्री आणि बावनदी, लांजातील काजळी आणि मुखकुंदी, राजापूरमधील कोदवली या मुख्य नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते येथे पाणी घुसल्याने पाच कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. जुवाड बेटावरील नागरिकांनाही सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.लांजा, राजापूरमध्ये पाणी भरल्याने जनजीवन विस्कळीत झाले. राजापुरातील अर्जुना आणि काेदवली नद्यांचे पाणी वाढल्याने पुराचे पाणी शहरातील जवाहर चाैकापर्यंत आले हाेते. तसेच अणुस्कुरा घाटात सकाळी दरड काेसळून वाहतूक ठप्प झाली हाेती. ही दरड बाजूला केल्यानंतर तासाभरातच वाहतूक सुरू झाली. लांजा तालुक्यातील कडूगाव येथील दत्तमंदिराला पाण्याचा वेढा पडला हाेता.दापोली तालुक्यातही पावसाचा जोर होता. दरम्यान, खेड-दापोली रस्त्यावर पाणी आल्याने पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू करण्यात आली. संगमेश्वर तालुक्यातील दख्खन येथे कोसळलेली दरड बाजूला करण्याचे काम मंगळवारीही सुरू होते. मात्र, एका बाजूने वाहतूक सुरू होती.रत्नागिरी तालुक्यात चांदेराई पुलाजवळील काजळी नदीचे पाणी ओसरले आहे; परंतु चांदेराई व हरचिरीमध्ये रस्त्यावर पाणी आल्याने या गावातील वाहतूक बंद करून पुलावरील वाहतूक कुरतडे मार्गे सुरू करण्यात आली आहे.