शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

बारसू, जैतापूरसारखे प्रकल्प सरकारी कागदावरूनही पुसेन; उद्धव ठाकरेंनी दिलं आश्वासन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2024 12:11 IST

'विनाशकारी प्रकल्प कोकणात येणार नाहीतच'

रत्नागिरी : प्रकल्पाला विरोध करणाऱ्या कोकणातील महिलांना या सरकारने मारहाण केली. त्याआधी जैतापूरमध्ये गोळीबारही झाला आहे. मात्र, आम्ही बारसू, जैतापूरसारखे प्रकल्प होऊ देणार नाही. असे विनाशकारी प्रकल्प कोकणात येणार नाहीतच; पण ते सरकारी कागदावरूनही पुसून टाकू, असे आश्वासन उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीतील जाहीर सभेत दिले. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांसारख्या यंत्रणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरगडी झाल्या आहेत, अशी टीका करत त्यांनी भाजपला लक्ष्य केले.महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपलाच प्रमुख लक्ष्य केले. प्रत्येक सभेत राम राम म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे लोकांचा निरोप घेत आहेत, असा टोलाही त्यांनी हाणला.कोकण हे शिवसेनेचे हृदय आहे; पण येथून धनुष्यबाण गायब केला गेला; पण खोक्यात बसलेल्या लोकांना कळलेच नाही की गद्दारांचे बाप शिवसेनेचे कोकणाशी असलेले नाते तोडण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप त्यांनी केला. सध्या आयपीएलचे दिवस सुरू आहेत. इकडचा खेळाडू तिकडे आणि तिकडचा खेळाडू इकडे. तशीच अवस्था आता राजकारणाची झाली आहे. त्यामुळे २०१४ आणि २०१९ मध्ये नरेंद्र मोदी यांच्याकडे जो आत्मविश्वास होता, तो आता दिसत नाही. आता ५६ इंचांच्या छातीमधील हवा गेली आहे, असा टोला त्यांनी हाणला.कांदा निर्यातीवरील बंदीबाबत बोलताना त्यांनी आता भाजपवरील निर्यातबंदी उठवून त्यांनाच बाहेर पाठवण्याची वेळ आली असल्याचे सांगितले आणि ‘अब की बार भाजप तडीपार’ असा नारा दिला. विनायक राऊत यांनी काजू निर्यातबंदीची समस्या मांडली. याचा उल्लेख करून ठाकरे म्हणाले, कोकणातील अशा प्रश्नांकडे भाजपने कधीही लक्ष दिलेले नाही; कारण त्यांचा काेकणावर आकस आहे. आपण मुख्यमंत्री असताना कोरोना आणि दोन वादळे आली. या समस्या आल्या नसत्या तर आंबा, काजूबाबतच्या समस्याही आपण सोडवल्या असत्या.यावेळी व्यासपीठावर विनायक राऊत, मिलिंद नार्वेकर, आमदार भास्कर जाधव, आमदार राजन साळवी, आमदार वैभव नाईक यांच्यासह उद्धवसेना, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस, तसेच ‘आप’चे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार साळवी, ‘आप’चे जिल्हाध्यक्ष परेश साळवी, राष्ट्रवादीचे सुरेश बने, उद्धवसेनेच्या जान्हवी सावंत, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बशीर मुर्तूझा, काँग्रेसचे अविनाश लाड, आमदार भास्कर जाधव आणि विनायक राऊत यांचीही भाषणे झाली.

डॉ. आंबेडकर महाराष्ट्राचे म्हणून राज्यघटना बदलत आहेतभाजपचा महाराष्ट्रावर एवढा आकस आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत, म्हणून राज्यघटना बदलण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, असा दावाही उद्धव ठाकरे यांनी केला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्गlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Uddhav Thackerayउद्धव ठाकरे