शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
3
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
4
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
5
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
6
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
7
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
8
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
9
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
10
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
11
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
12
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
13
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
14
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
15
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
16
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
17
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
18
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
19
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
20
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या

मान्सूनपूर्व 'जोर'धारेने जूनच्या पूर्वार्धातच रत्नागिरी जिल्ह्यातील ९ धरणे तुडुंब

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 17:30 IST

२३ धरणांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षाही अधिक पाणीसाठा

रत्नागिरी : मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात सलग पडलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील धरणांच्यापाणी पातळीत वाढ झाली आहे. जिल्ह्यातील ६७ धरणांपैकी ९ धरणे आताच १०० टक्के भरली असून, १४ धरणांमध्ये ७५ टक्के तर १३ धरणांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा झाला आहे. सध्या अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. मात्र, पाऊस थांबल्यानंतर उष्णतेत वाढ होत असल्याने पाऊस लांबला तर पुन्हा धरणांच्या पाणी पातळीत घट होण्याची शक्यता आहे.यंदा मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने जोरदार सुरूवात केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मे महिन्यातील पावसाने गेल्या २० वर्षांतील पहिलाच उच्चांक केला आहे. या मे महिन्यात सर्वाधिक १३ दिवस संगमेश्वरमध्ये पाऊस पडला. त्यामुळे मे महिन्यात जाणवणारी पाणीटंचाई काहीअंशी कमी होण्यास मदत झाली.रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ६८ धरणे आहेत. त्यापैकी नातूवाडी (ता. खेड), गडनदी (ता. संगमेश्वर) आणि अर्जुना (ता. राजापूर) हे तीन मध्यम प्रकल्प आहेत. तर उर्वरित ६५ लघु प्रकल्प आहेत. यापैकी २०१९ साली झालेल्या अतिवृष्टीत चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण कोसळल्याने यात पाणीसाठा होत नाही. तसेच राजवाडी आणि काेंडवाडी या दोन नादुरुस्त धरणांमध्ये पाणीसाठा केला जात नाही. तर सात धरणांमध्ये १० टक्क्यांपेक्षाही कमी साठा ठेवला जातो.मे महिन्याच्या उत्तरार्धात सलग पडलेल्या मुसळधार पावसामुळे पाणीटंचाईपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे आटलेल्या धरणांमध्येही पाणीसाठा वाढण्यास मदत झाली आहे. मे महिन्याच्या २९ तारखेपर्यंत पडलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील एकूण ६८ धरणांपैकी ३६ धरणांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा आहे.

नद्यांच्या पाणी पातळीतही झाली वाढरत्नागिरी जिल्ह्यातून वाहणाऱ्या जगबुडी, वाशिष्ठी, स्त्री, सोनवी, काजळी, कोदवली, मुचकुंदी आणि बावनदी अशा आठ नद्या आहेत. उन्हाळ्यात या नद्यांची पात्रे कोरडी होऊ लागली होती. मात्र, ते महिन्यात पडलेल्या पावसामुळे या नद्यांची पात्रेही भरलेली आहेत. पाऊस लांबल्यास धरणाप्रमाणे नद्यांच्या पात्रातही घट होण्याची शक्यता आहे.