शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

रत्नागिरी जिल्ह्यातील २६१ गावातील ४८६ वाड्यांत संभाव्य पाणी टंचाई,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 3:16 PM

रत्नागिरी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून जिल्ह्याचा एकूण ५ कोटी ४९ लाख ८० हजार रुपयांचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला असून, तो मंजुरीसाठी जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील २६१ गावातील ४८६ वाड्यांचा संभाव्य पाणी टंचाईग्रस्तांमध्ये समावेश करण्यात आला आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाने अजूनही या कृती आराखड्याला मंजुरी दिलेली नाही.

ठळक मुद्दे२६१ गावातील ४८६ वाड्यांमध्ये संभाव्य पाणीटंचाई, ८ गावांमध्ये खासगी विहिरींचे करणार अधिग्रहण.९८ गावांतील २३९ वाड्यांना देणार ३३ टँकरने पाणी, पाणी योजना दुरुस्तीसाठी ४ कोटी १२ लाखांची तरतूद.यावर्षी पाण्याची झळ मार्चपासून, काही ठिकाणी आतापासूनच एकदिवसा आड पाणी

रत्नागिरी : जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून जिल्ह्याचा एकूण ५ कोटी ४९ लाख ८० हजार रुपयांचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला असून, तो मंजुरीसाठी जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील २६१ गावातील ४८६ वाड्यांचा संभाव्य पाणी टंचाईग्रस्तांमध्ये समावेश करण्यात आला आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाने अजूनही या कृती आराखड्याला मंजुरी दिलेली नाही.पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी जिल्हा परिषदेकडून संभाव्य टंचाई कृती आराखडा तयार करण्यात येतो. त्याप्रमाणे यंदाही ५ कोटी ४९ लाख ८० हजार रुपयांचा हा आराखडा जिल्हा परिषदेने केला आहे.

आराखड्यानुसार येत्या उन्हाळ्यात ९८ गावातील २९३ वाड्यांना पाणीटंचाई भेडसावण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यासाठी ३३ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. या आराखड्यामध्ये केवळ टंचाईग्रस्त गावांना टँकरने पुरवठा करण्यासाठी ३५ लाख ८५ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहे.या आराखड्यानुसार विंधन विहिरी दुरुस्ती, विहिरीतील गाळ काढण्याचे यंदाच्या उन्हाळ्यामध्ये एकही पैसा खर्च करण्याची तरतूद करण्यात आलेली नाही. यंदाच्या आराखड्यानुसार लांजा तालुक्यात ८ गावातील ८ वाड्यांमध्ये टंचाईग्रस्तांना पाणीपुरवठा करण्यासाठी खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. त्यासाठी टंचाई कृती आराखड्यामध्ये ४ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.गतवर्षीच्या टंचाई कृती आराखड्यामध्ये एकही नवीन विंधन विहीर घेण्यात आलेली नव्हती. कारण विंधन विहिरींची कामे जिल्हा नियोजनमधून घेण्यात आली होती. मात्र, यंदा ११० गावातील १६२ वाड्यांमध्ये विंधन विहिरी घेण्यात येणार आहेत. त्यासाठी ९७ लाख २० हजार रुपयांची तरतूद आराखड्यामध्ये केली आहे. मात्र, याला जिल्हा प्रशासनाकडून मंजुरी मिळणे आवश्यक आहे.

या आराखड्यामध्ये नळपाणी पुरवठा योजना दुरुस्तीसाठी ४ कोटी १२ लाख ७५ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ६४ नादुरुस्त योजनांची दुरुस्ती केली जाणार आहे.जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे यंदाचा टंचाईकृती आराखडा मंजुरीसाठी सादर केला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही संपूर्ण कृती आराखडा मंजूर करण्याची अपेक्षा जिल्हा परिषदेकडून व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, मागील इतिहास पाहता जिल्हा प्रशासनाकडून टंचाई कृती आराखड्यामध्ये मोठ्या प्रमाणात काटछाट करुन तो मंजूर करण्यात येतो.गावे, वाड्यांची संख्या कमीयंदा पाणीटंचाई उद्भवण्याची शक्यताही कमी असल्याने गावे व वाड्यांची संख्याही कमी करण्यात आली आहे. गेल्या तीन महिन्यात सुमारे ४५००पेक्षा जास्त वनराई, कच्चे बंधारे उभारण्यात आले आहेत. त्याद्वारे ग्रामीण भागात पाणी अडवण्यात आल्याने तेथील विहिरी व बंधाऱ्यांच्या आजूबाजूची पाण्याची पातळी वाढल्याने यंदा पाणीटंचाई कमी उद्भवणार हे निश्चित आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीWaterपाणी