शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावरील धाेकादायक १३ ठिकाणी पाेलिसांची करडी नजर, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2022 19:39 IST

महामार्गाचे रखडलेले काम, माेठ्या प्रमाणात पडलेले खड्डे यामुळे गणेशाेत्सवासाठी गावी येणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास खडतर

तन्मय दाते

रत्नागिरी : महामार्गाचे रखडलेले काम, माेठ्या प्रमाणात पडलेले खड्डे यामुळे गणेशाेत्सवासाठी गावी येणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास खडतर हाेणार आहे. मात्र, मुंबईकरांचा प्रवास सुरक्षित हाेण्यासाठी पाेलीस प्रशासन सज्ज झाले असून, कशेडीपासून ते खारेपाटणच्या सीमा हद्दीपर्यंत महामार्गावरील धाेकादायक १३ ठिकाणी पाेलिसांची करडी नजर राहणार आहे. विशेषत: परशुराम घाटात (ता. चिपळूण) विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.

दोन वर्षांच्या कोरोना काळानंतर या वर्षी गणेशोत्सवावरील निर्बंध हटविण्यात आले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मुंबईकर गावी दाखल हाेणार असून, महामार्गावर वाहतूक वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी पोलीस, उपप्रादेशिक परिवहन विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग, तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी सज्ज झाले आहेत. पाेलिसांनी महामार्गावरील १३ ठिकाणे धाेकादायक म्हणून निश्चित केली आहेत. त्या ठिकाणी पाेलिसांची करडी नजर राहणार आहे.

तीन तपासणी नाके

जिल्हा वाहतूक पाेलिसांकडून महामार्गावर १८ छावण्या उभारण्यात येणार आहेत. तर भरणे, बहाद्दूरशेख नाका आणि पाली या ठिकाणी तीन तपासणी नाके ठेवण्यात येणार आहेत.

परशुराम घाट दक्ष

परशुराम घाट परिसरात आपत्कालीन यंत्रणा आणि २४ तास मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्याशिवाय कशेडी घाट, चिपळूण शहरातून जाणारा महामार्ग, निवळी घाट, वेरळ घाटी या ठिकाणी विशेष लक्ष देण्यात येणार आहे.

वाहतूक मदत केंद्र

महामार्गावर वाहतूक मदत केंद्र उभारण्यात येणार असून, गणेशोत्सव कालावधीत दिवस रात्री फिक्स पॉइंट आणि पेट्रोलिंग बंदोबस्त नेमण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी वाहतूककोंडी होण्याची शक्यता आहे, अशी ठिकाणे ओळखून विशेष लक्ष दिले जाणार आहे.

ही धोकादायक ठिकाण  महामार्गावरील १३ धोकादायक ठिकाणे निश्चित केली आहेत. यामध्ये उधळे, भोस्ते, कशेडी, आवाशी, निवळी घाट, हातखंबा, वाकेड घाटवेरळ घाट, नावडी, गोळवली, दाभोळे, दख्खन वाटूळ घाट या ठिकाणांचा समावेश आहे.

सणासाठी येताना वाहतुकीचे नियम पाळा, रात्रीचा प्रवास टाळा, प्रवासात विश्रांती घ्या, लवकर निघा, सावकाश जा, सुरक्षित पोहोचा या मूलमंत्राचे पालन करावे. तसेच चालकाला पूर्ण विश्रांती द्या आणि वाहन सुरक्षित आहे का हे तपासूनच प्रवासाला निघाले पाहिजे. - शिरीष सासने, वाहतूक पोलीस निरीक्षक

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhighwayमहामार्गGanesh Mahotsavगणेशोत्सवPoliceपोलिस