शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

महामार्गावरील धाेकादायक १३ ठिकाणी पाेलिसांची करडी नजर, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2022 19:39 IST

महामार्गाचे रखडलेले काम, माेठ्या प्रमाणात पडलेले खड्डे यामुळे गणेशाेत्सवासाठी गावी येणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास खडतर

तन्मय दाते

रत्नागिरी : महामार्गाचे रखडलेले काम, माेठ्या प्रमाणात पडलेले खड्डे यामुळे गणेशाेत्सवासाठी गावी येणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास खडतर हाेणार आहे. मात्र, मुंबईकरांचा प्रवास सुरक्षित हाेण्यासाठी पाेलीस प्रशासन सज्ज झाले असून, कशेडीपासून ते खारेपाटणच्या सीमा हद्दीपर्यंत महामार्गावरील धाेकादायक १३ ठिकाणी पाेलिसांची करडी नजर राहणार आहे. विशेषत: परशुराम घाटात (ता. चिपळूण) विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.

दोन वर्षांच्या कोरोना काळानंतर या वर्षी गणेशोत्सवावरील निर्बंध हटविण्यात आले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मुंबईकर गावी दाखल हाेणार असून, महामार्गावर वाहतूक वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी पोलीस, उपप्रादेशिक परिवहन विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग, तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी सज्ज झाले आहेत. पाेलिसांनी महामार्गावरील १३ ठिकाणे धाेकादायक म्हणून निश्चित केली आहेत. त्या ठिकाणी पाेलिसांची करडी नजर राहणार आहे.

तीन तपासणी नाके

जिल्हा वाहतूक पाेलिसांकडून महामार्गावर १८ छावण्या उभारण्यात येणार आहेत. तर भरणे, बहाद्दूरशेख नाका आणि पाली या ठिकाणी तीन तपासणी नाके ठेवण्यात येणार आहेत.

परशुराम घाट दक्ष

परशुराम घाट परिसरात आपत्कालीन यंत्रणा आणि २४ तास मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्याशिवाय कशेडी घाट, चिपळूण शहरातून जाणारा महामार्ग, निवळी घाट, वेरळ घाटी या ठिकाणी विशेष लक्ष देण्यात येणार आहे.

वाहतूक मदत केंद्र

महामार्गावर वाहतूक मदत केंद्र उभारण्यात येणार असून, गणेशोत्सव कालावधीत दिवस रात्री फिक्स पॉइंट आणि पेट्रोलिंग बंदोबस्त नेमण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी वाहतूककोंडी होण्याची शक्यता आहे, अशी ठिकाणे ओळखून विशेष लक्ष दिले जाणार आहे.

ही धोकादायक ठिकाण  महामार्गावरील १३ धोकादायक ठिकाणे निश्चित केली आहेत. यामध्ये उधळे, भोस्ते, कशेडी, आवाशी, निवळी घाट, हातखंबा, वाकेड घाटवेरळ घाट, नावडी, गोळवली, दाभोळे, दख्खन वाटूळ घाट या ठिकाणांचा समावेश आहे.

सणासाठी येताना वाहतुकीचे नियम पाळा, रात्रीचा प्रवास टाळा, प्रवासात विश्रांती घ्या, लवकर निघा, सावकाश जा, सुरक्षित पोहोचा या मूलमंत्राचे पालन करावे. तसेच चालकाला पूर्ण विश्रांती द्या आणि वाहन सुरक्षित आहे का हे तपासूनच प्रवासाला निघाले पाहिजे. - शिरीष सासने, वाहतूक पोलीस निरीक्षक

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhighwayमहामार्गGanesh Mahotsavगणेशोत्सवPoliceपोलिस