शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

महामार्गावरील धाेकादायक १३ ठिकाणी पाेलिसांची करडी नजर, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2022 19:39 IST

महामार्गाचे रखडलेले काम, माेठ्या प्रमाणात पडलेले खड्डे यामुळे गणेशाेत्सवासाठी गावी येणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास खडतर

तन्मय दाते

रत्नागिरी : महामार्गाचे रखडलेले काम, माेठ्या प्रमाणात पडलेले खड्डे यामुळे गणेशाेत्सवासाठी गावी येणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास खडतर हाेणार आहे. मात्र, मुंबईकरांचा प्रवास सुरक्षित हाेण्यासाठी पाेलीस प्रशासन सज्ज झाले असून, कशेडीपासून ते खारेपाटणच्या सीमा हद्दीपर्यंत महामार्गावरील धाेकादायक १३ ठिकाणी पाेलिसांची करडी नजर राहणार आहे. विशेषत: परशुराम घाटात (ता. चिपळूण) विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.

दोन वर्षांच्या कोरोना काळानंतर या वर्षी गणेशोत्सवावरील निर्बंध हटविण्यात आले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मुंबईकर गावी दाखल हाेणार असून, महामार्गावर वाहतूक वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी पोलीस, उपप्रादेशिक परिवहन विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग, तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी सज्ज झाले आहेत. पाेलिसांनी महामार्गावरील १३ ठिकाणे धाेकादायक म्हणून निश्चित केली आहेत. त्या ठिकाणी पाेलिसांची करडी नजर राहणार आहे.

तीन तपासणी नाके

जिल्हा वाहतूक पाेलिसांकडून महामार्गावर १८ छावण्या उभारण्यात येणार आहेत. तर भरणे, बहाद्दूरशेख नाका आणि पाली या ठिकाणी तीन तपासणी नाके ठेवण्यात येणार आहेत.

परशुराम घाट दक्ष

परशुराम घाट परिसरात आपत्कालीन यंत्रणा आणि २४ तास मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्याशिवाय कशेडी घाट, चिपळूण शहरातून जाणारा महामार्ग, निवळी घाट, वेरळ घाटी या ठिकाणी विशेष लक्ष देण्यात येणार आहे.

वाहतूक मदत केंद्र

महामार्गावर वाहतूक मदत केंद्र उभारण्यात येणार असून, गणेशोत्सव कालावधीत दिवस रात्री फिक्स पॉइंट आणि पेट्रोलिंग बंदोबस्त नेमण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी वाहतूककोंडी होण्याची शक्यता आहे, अशी ठिकाणे ओळखून विशेष लक्ष दिले जाणार आहे.

ही धोकादायक ठिकाण  महामार्गावरील १३ धोकादायक ठिकाणे निश्चित केली आहेत. यामध्ये उधळे, भोस्ते, कशेडी, आवाशी, निवळी घाट, हातखंबा, वाकेड घाटवेरळ घाट, नावडी, गोळवली, दाभोळे, दख्खन वाटूळ घाट या ठिकाणांचा समावेश आहे.

सणासाठी येताना वाहतुकीचे नियम पाळा, रात्रीचा प्रवास टाळा, प्रवासात विश्रांती घ्या, लवकर निघा, सावकाश जा, सुरक्षित पोहोचा या मूलमंत्राचे पालन करावे. तसेच चालकाला पूर्ण विश्रांती द्या आणि वाहन सुरक्षित आहे का हे तपासूनच प्रवासाला निघाले पाहिजे. - शिरीष सासने, वाहतूक पोलीस निरीक्षक

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhighwayमहामार्गGanesh Mahotsavगणेशोत्सवPoliceपोलिस