शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
3
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
4
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
5
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
6
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
7
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
8
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
9
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
10
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
11
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
12
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
13
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
14
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
15
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
16
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
17
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
18
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
19
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
20
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला

महामार्गावरील धाेकादायक १३ ठिकाणी पाेलिसांची करडी नजर, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2022 19:39 IST

महामार्गाचे रखडलेले काम, माेठ्या प्रमाणात पडलेले खड्डे यामुळे गणेशाेत्सवासाठी गावी येणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास खडतर

तन्मय दाते

रत्नागिरी : महामार्गाचे रखडलेले काम, माेठ्या प्रमाणात पडलेले खड्डे यामुळे गणेशाेत्सवासाठी गावी येणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास खडतर हाेणार आहे. मात्र, मुंबईकरांचा प्रवास सुरक्षित हाेण्यासाठी पाेलीस प्रशासन सज्ज झाले असून, कशेडीपासून ते खारेपाटणच्या सीमा हद्दीपर्यंत महामार्गावरील धाेकादायक १३ ठिकाणी पाेलिसांची करडी नजर राहणार आहे. विशेषत: परशुराम घाटात (ता. चिपळूण) विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.

दोन वर्षांच्या कोरोना काळानंतर या वर्षी गणेशोत्सवावरील निर्बंध हटविण्यात आले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मुंबईकर गावी दाखल हाेणार असून, महामार्गावर वाहतूक वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी पोलीस, उपप्रादेशिक परिवहन विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग, तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी सज्ज झाले आहेत. पाेलिसांनी महामार्गावरील १३ ठिकाणे धाेकादायक म्हणून निश्चित केली आहेत. त्या ठिकाणी पाेलिसांची करडी नजर राहणार आहे.

तीन तपासणी नाके

जिल्हा वाहतूक पाेलिसांकडून महामार्गावर १८ छावण्या उभारण्यात येणार आहेत. तर भरणे, बहाद्दूरशेख नाका आणि पाली या ठिकाणी तीन तपासणी नाके ठेवण्यात येणार आहेत.

परशुराम घाट दक्ष

परशुराम घाट परिसरात आपत्कालीन यंत्रणा आणि २४ तास मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्याशिवाय कशेडी घाट, चिपळूण शहरातून जाणारा महामार्ग, निवळी घाट, वेरळ घाटी या ठिकाणी विशेष लक्ष देण्यात येणार आहे.

वाहतूक मदत केंद्र

महामार्गावर वाहतूक मदत केंद्र उभारण्यात येणार असून, गणेशोत्सव कालावधीत दिवस रात्री फिक्स पॉइंट आणि पेट्रोलिंग बंदोबस्त नेमण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी वाहतूककोंडी होण्याची शक्यता आहे, अशी ठिकाणे ओळखून विशेष लक्ष दिले जाणार आहे.

ही धोकादायक ठिकाण  महामार्गावरील १३ धोकादायक ठिकाणे निश्चित केली आहेत. यामध्ये उधळे, भोस्ते, कशेडी, आवाशी, निवळी घाट, हातखंबा, वाकेड घाटवेरळ घाट, नावडी, गोळवली, दाभोळे, दख्खन वाटूळ घाट या ठिकाणांचा समावेश आहे.

सणासाठी येताना वाहतुकीचे नियम पाळा, रात्रीचा प्रवास टाळा, प्रवासात विश्रांती घ्या, लवकर निघा, सावकाश जा, सुरक्षित पोहोचा या मूलमंत्राचे पालन करावे. तसेच चालकाला पूर्ण विश्रांती द्या आणि वाहन सुरक्षित आहे का हे तपासूनच प्रवासाला निघाले पाहिजे. - शिरीष सासने, वाहतूक पोलीस निरीक्षक

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhighwayमहामार्गGanesh Mahotsavगणेशोत्सवPoliceपोलिस