शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कवी केशवसुत स्मारक भेटीत स्फुरल्या कविता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 18:17 IST

मराठी राजभाषा दिनानिमित्त २५ फेब्रुवारी रोजी रत्नागिरीच्या शिर्के प्रशालेतील गुरूकुलच्या विद्यार्थ्यांनी सायकल सफर करत मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारकाला भेट दिली. या भेटीत विद्यार्थ्यांनी कवी केशवसुत यांच्या जीवनप्रवासाची माहिती करून घेतली. सुमारे अडीच तास कवी केशवसुत स्मारकात घालवताना विद्यार्थ्यांनाही कविता स्फुरल्या आणि त्या कवितांचे त्यांनी लिखाणही केले. या कवितांचे वाचन गुरूवार, २७ रोजी प्रशालेत करण्यात आले.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांनी केलेल्या कवितांचे मराठी भाषा दिनी वाचन शिर्के गुरूकुलच्या विद्यार्थ्यांची सायकल सफर

अरुण आडिवरेकर रत्नागिरी : मराठी राजभाषा दिनानिमित्त २५ फेब्रुवारी रोजी रत्नागिरीच्या शिर्के प्रशालेतील गुरूकुलच्या विद्यार्थ्यांनी सायकल सफर करत मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारकाला भेट दिली. या भेटीत विद्यार्थ्यांनी कवी केशवसुत यांच्या जीवनप्रवासाची माहिती करून घेतली. सुमारे अडीच तास कवी केशवसुत स्मारकात घालवताना विद्यार्थ्यांनाही कविता स्फुरल्या आणि त्या कवितांचे त्यांनी लिखाणही केले. या कवितांचे वाचन गुरूवार, २७ रोजी प्रशालेत करण्यात आले.आजच्या विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी शिक्षण पुरेसे नाही तर प्रत्यक्ष अनुभवातून त्यांचे शिक्षण झाले पाहिजे. यासाठीच विविध शिबिरे, व्यक्तिपरिचय, क्षेत्रभेट यासारखे उपक्रम गुरुकुलकडून सातत्याने राबविले जातात. याच संकल्पनेमधून गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषा दिनानिमित्त रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील कवी केशवसुत यांच्या स्मारकाला भेट दिली.

यावेळी अतिशय निसर्गरम्य वातावरणातील केशवसुतांचे जन्मघर, त्यांच्या कविता मुलांनी वाचल्या व समजून घेतल्या. आपली मराठी भाषा किती समृद्ध आहे, याचा अनुभव यानिमित्ताने मुलांना घेता आला. विशेष म्हणजे रत्नागिरीपासून मालगुंडपर्यंत व पुन्हा रत्नागिरीपर्यंत हा संपूर्ण प्रवास मुलांनी सायकलने पूर्ण केला.गुरूकुलचे किरण सनगरे, गौरव पिलणकर, विनिता मयेकर आणि प्रियांका सुर्वे या शिक्षकांसमवेत सातवी आणि आठवीतील २६ विद्यार्थ्यांचा चमू रत्नागिरीतून सकाळी ७.३० वाजता निघाला. मालगुंड येथे ११ वाजत्या पोहोचल्यानंतर या विद्यार्थ्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रश्नावली दिली होती. त्या प्रश्नावलीतून विद्यार्थ्यांना निरीक्षण करण्यास सांगण्यात आले.

या प्रश्नावलीच्या अनुषंगाने त्यांचे घर, त्यांचा जीवनप्रवास, त्यांनी लिहिलेल्या कविता, त्यातून तुम्हाला आवडलेली कविता, कवितेतून काय सांगायचा प्रयत्न केला आहे हे विद्यार्थ्यांनी समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सर्वजण सायंकाळी ५ वाजता पुन्हा रत्नागिरीत आले. यावेळी मुलांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत होता. काहीतरी नवीन शिकायला मिळाल्याचे समाधान विद्यार्थ्यांना होते. 

रत्नागिरीजवळ मालगुंड येथे कवी केशवसुत स्मारक आहे. त्याची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी, विद्यार्थ्यांनी कवी केशवसुतांच्या कविता वाचाव्यात, त्यांचा अभ्यास करावा, या हेतूने ही भेट आयोजित करण्यात आली होती. पुस्तकाबाहेर जाऊन मुलांनी वेगळा विचार करावा, हा यामागचा उद्देश होता.- किरण सनगरे, शिक्षक

टॅग्स :Marathi Bhasha Dinमराठी भाषा दिनRatnagiriरत्नागिरी