शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकानी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
2
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
3
"प्रत्येक काश्मीरी दहशतवादी नाही", दिल्ली स्फोटावर मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया
4
जगात सर्वात शक्तिशाली सैन्य असणाऱ्या देशांची यादी जारी; अमेरिका टॉपवर, भारताचा कितवा नंबर?
5
Delhi Blast: दिल्लीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना धडा शिकवला जाणार, अमित शहांची गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत बैठक
6
रस्त्यावर फक्त माणसाचा पायच दिसला, पण तो व्यक्ती कोण?; इंदापूरला हादरवून टाकणारी घटना
7
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
8
रुपाली ठोंबरेंना दुसरा धक्का, स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान नाही; पक्षाने साइडलाइन केले?
9
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
10
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या घरी हलला पाळणा, छोट्या परीला घेतलं दत्तक, फोटो शेअर करून दिली खुशखबर
11
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
12
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
13
कोणत्या देवाची उपासना ठरते शीघ्र फलदायी? प्रेमानंद महाराजांनी दिले चपखल उत्तर!
14
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
15
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
16
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
17
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती
18
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
19
'आयुष्मान कार्ड' आणि 'आभा कार्ड'मध्ये तुमचाही होतो गोंधळ? यातील फरक आणि फायदे माहितीये का?
20
हृदयद्रावक! वाढदिवसाला प्रेमाने लेकाला बुलेट दिली, पण नंतर वडिलांवरच खांदा देण्याची वेळ आली

आंब्यावर थ्रीप्सचा प्रादुर्भाव, दुष्टचक्र संपता संपेना, हवामानातील बदलाचा पुन्हा तोटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 13:41 IST

यावर्षी नैसर्गिक बदलामुळे आंबा हंगाम नियमित हंगामापेक्षा उशिरा असतानाच आता थ्रीप्सचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहेत. मजगाव, शीळ परिसरात थ्रीप्सचा प्रादुर्भाव आढळल्याने शेतकरी धास्तावले आहेत.

ठळक मुद्देआंब्यावर थ्रीप्सचा प्रादुर्भाव, दुष्टचक्र संपता संपेना, हवामानातील बदलाचा पुन्हा तोटातुडतुडा, उंटअळी, बुरशीपाठोपाठ हापूसच्या वाट्याला आता नवे संकट

रत्नागिरी : यावर्षी नैसर्गिक बदलामुळे आंबा हंगाम नियमित हंगामापेक्षा उशिरा असतानाच आता थ्रीप्सचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहेत. मजगाव, शीळ परिसरात थ्रीप्सचा प्रादुर्भाव आढळल्याने शेतकरी धास्तावले आहेत.यावर्षी पावसाळा लांबल्याने जमिनीत ओलावा टिकून राहिल्याने पालवीचे प्रमाण सर्वाधिक राहिले. त्यामुळे पालवी जून होऊन मोहोर प्रक्रिया जानेवारीपासून सुरू झाली. थंडी उशिरा सुरू झाल्याने मोहोरच उशिरा आला. शिवाय फळधारणाही कमी आहे.

सध्या कणी ते सुपारी एवढ्या आकाराचा आंबा झाडावर आहे. त्यातच थ्रीप्सचे संकट उद्भवले आहे. हवामानातील बदलामुळे पालवीवर तुडतुडा, उंटअळी, बुरशीचा प्रादुर्भाव झाला होता. हवामानाचा अंदाज घेत कीडरोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना फवारणी करावी लागत आहे.

मोहोरावरील उंटअळीच्या प्रादुर्भावामुळे मोहोराचा फुलोरा खाऊन काड्या शिल्लक राहात होत्या. शेतकऱ्यांनी कृषिशास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उंटअळीवर नियंत्रण मिळविले असतानाच आता थ्रीप्सला सामोरे जावे लागत आहे.ऑगस्टमध्ये आलेल्या मोहोराचे शेतकऱ्यांनी संरक्षण केल्याने तयार झालेला आंबा बाजारात येऊ लागला असला तरी त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. मात्र, यावर्षीच्या हंगामातील आंबा उशिरा बाजारात येणार आहे.

एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात अथवा मे मध्येच हा आंबा बाजारात येण्याची शक्यता आहे. नवीन मोहोराला फळधारणा होत असतानाच थ्रीप्समुळे उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. थ्रीप्सच्या प्रादुर्भावामुळे फळ चिकूप्रमाणे होते. थ्रीप्सपासून पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची गरज आहे.

नैसर्गिक स्थित्यंतराचा परिणाम दरवर्षी आंबा पिकावर होऊन आंबापीक धोक्यात येत आहे. कीडरोगाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणतानाच थ्रीप्सचे संकट उद्भवले आहे. कृषी विभागाने याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून कीटकनाशक फवारणीसाठी सूचना करणे आवश्यक आहे.- राजन कदम,बागायतदार, मजगाव,रत्नागिरी 

टॅग्स :MangoआंबाRatnagiriरत्नागिरीTemperatureतापमान