शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं? 
2
भाईंदरमध्ये आचार संहितेचा भंग, आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट!
3
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
4
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
5
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
6
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
7
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
8
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
9
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
10
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
11
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
12
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
13
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
14
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
15
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
16
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
17
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
18
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
19
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
20
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

आंब्यावर थ्रीप्सचा प्रादुर्भाव, दुष्टचक्र संपता संपेना, हवामानातील बदलाचा पुन्हा तोटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 13:41 IST

यावर्षी नैसर्गिक बदलामुळे आंबा हंगाम नियमित हंगामापेक्षा उशिरा असतानाच आता थ्रीप्सचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहेत. मजगाव, शीळ परिसरात थ्रीप्सचा प्रादुर्भाव आढळल्याने शेतकरी धास्तावले आहेत.

ठळक मुद्देआंब्यावर थ्रीप्सचा प्रादुर्भाव, दुष्टचक्र संपता संपेना, हवामानातील बदलाचा पुन्हा तोटातुडतुडा, उंटअळी, बुरशीपाठोपाठ हापूसच्या वाट्याला आता नवे संकट

रत्नागिरी : यावर्षी नैसर्गिक बदलामुळे आंबा हंगाम नियमित हंगामापेक्षा उशिरा असतानाच आता थ्रीप्सचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहेत. मजगाव, शीळ परिसरात थ्रीप्सचा प्रादुर्भाव आढळल्याने शेतकरी धास्तावले आहेत.यावर्षी पावसाळा लांबल्याने जमिनीत ओलावा टिकून राहिल्याने पालवीचे प्रमाण सर्वाधिक राहिले. त्यामुळे पालवी जून होऊन मोहोर प्रक्रिया जानेवारीपासून सुरू झाली. थंडी उशिरा सुरू झाल्याने मोहोरच उशिरा आला. शिवाय फळधारणाही कमी आहे.

सध्या कणी ते सुपारी एवढ्या आकाराचा आंबा झाडावर आहे. त्यातच थ्रीप्सचे संकट उद्भवले आहे. हवामानातील बदलामुळे पालवीवर तुडतुडा, उंटअळी, बुरशीचा प्रादुर्भाव झाला होता. हवामानाचा अंदाज घेत कीडरोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना फवारणी करावी लागत आहे.

मोहोरावरील उंटअळीच्या प्रादुर्भावामुळे मोहोराचा फुलोरा खाऊन काड्या शिल्लक राहात होत्या. शेतकऱ्यांनी कृषिशास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उंटअळीवर नियंत्रण मिळविले असतानाच आता थ्रीप्सला सामोरे जावे लागत आहे.ऑगस्टमध्ये आलेल्या मोहोराचे शेतकऱ्यांनी संरक्षण केल्याने तयार झालेला आंबा बाजारात येऊ लागला असला तरी त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. मात्र, यावर्षीच्या हंगामातील आंबा उशिरा बाजारात येणार आहे.

एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात अथवा मे मध्येच हा आंबा बाजारात येण्याची शक्यता आहे. नवीन मोहोराला फळधारणा होत असतानाच थ्रीप्समुळे उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. थ्रीप्सच्या प्रादुर्भावामुळे फळ चिकूप्रमाणे होते. थ्रीप्सपासून पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची गरज आहे.

नैसर्गिक स्थित्यंतराचा परिणाम दरवर्षी आंबा पिकावर होऊन आंबापीक धोक्यात येत आहे. कीडरोगाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणतानाच थ्रीप्सचे संकट उद्भवले आहे. कृषी विभागाने याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून कीटकनाशक फवारणीसाठी सूचना करणे आवश्यक आहे.- राजन कदम,बागायतदार, मजगाव,रत्नागिरी 

टॅग्स :MangoआंबाRatnagiriरत्नागिरीTemperatureतापमान