शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
2
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
3
'घोटाळ्याच्या चौकशीसाठी भुजबळांनी...';राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट मोदींना लिहीलं पत्र
4
पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला; घाटकोपर दुर्घटनेत युवकाचा दुर्दैवी अंत
5
EPFO ची कोट्यवधी लोकांसाठी गूड न्यूज! घर, लग्न, आजार, शिक्षणासाठी ऑटो क्लेम सोल्युशन लाँच; पाहा
6
पीओकेमधील गोंधळामुळे पाकिस्तान सरकारने गुडघे टेकले! २३ अब्ज रुपयांचा निधी जाहीर
7
LICची लखपती स्कीम! केवळ रोज ₹४५ रुपये जमा करून मिळवू शकता ₹२५ लाख; पाहा संपूर्ण डिटेल
8
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
9
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
10
ईशा गुप्ताने केले आहेत Eggs Freeze, म्हणाली- "मी आज ३ मुलांची आई असते, पण..."
11
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
12
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
13
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
14
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
15
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
16
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
17
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
18
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
19
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
20
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...

खेडमध्ये पंधरा वाड्यात केवळ एकच टँकर-लांजा तालुका : पाणीपुरवठा होत नसल्याने आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 2:34 PM

खेड : तालुक्यात पाणीटंचाईची झळ जाणवू लागली आहे. सध्या तालुक्यातील आठ गावातील पंधरा वाड्यांमध्ये एकाच टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. ...

ठळक मुद्देपाणीटंचाईची झळ : प्रशासनाची दमछाकलांजा तालुका : पाणीपुरवठा होत नसल्याने आक्रमक  पालू ग्रामस्थांनी टँकर अडवला

खेड : तालुक्यात पाणीटंचाईची झळ जाणवू लागली आहे. सध्या तालुक्यातील आठ गावातील पंधरा वाड्यांमध्ये एकाच टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. साडेपाच हजार लीटर क्षमतेचा एकच टँकर उपलब्ध असल्याने प्रशासनाची टँचाईग्रस्त गावातील जनतेला पाणीपुरवठा करताना दमछाक होत आहे. त्यामुळे दोन खासगी टँकरची मागणी महसूल विभागाकडे करण्यात आल्याचे पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

दरवर्षी जिल्ह्यातील पहिला टँकर खेड तालुक्यात धावतो. मात्र, यावर्षी यामध्ये खंड पडला आहे. सध्या उन्हाळा वाढला असल्याने ग्रामीण भागातील जलस्रोतांवर परिणाम झाला आहे. उन्हाच्या तीव्रतेने ग्रामीण भागातील जलस्रोत झपाट्याने आटत आहेत. परिणामी तालुक्यात सध्या आठ गावे व १५ वाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला आहे. मात्र, प्रशासनाकडे साडेपाच हजार लीटरचा एकच टँकर पाणीपुरवठा करण्यासाठी उपलब्ध आहे. त्यामुळे टँचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करताना प्रशासनाची दमछाक होत आहे. टँचाईग्रस्त गावांना चोरद नदीपात्रातून एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे.

दिवसागणिक टंचाईग्रस्त गावे व त्यांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे टँकरद्वारे तालुक्यातील सर्व गावांना पाणी पुरवठा कसा करावा, हा प्रश्न पंचायत समिती प्रशासनासमोर उभा राहिला आहे. सध्या प्रांताधिकारी अविशकुमार सोनोने व तहसीलदार शिवाजी जाधव लोकसभा निवडणूक प्रक्रियेत गुंतले असल्याने खासगी टँकरच्या उपलब्धतेसाठी विलंब होत असल्याचे समजते. तालुक्यातील जनतेसाठी दोन खासगी टँकर उपलब्ध झाल्यास टँचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करणे सुलभ होणार आहे.

 

लांजा तालुका : पाणीपुरवठा होत नसल्याने आक्रमक  पालू ग्रामस्थांनी टँकर अडवला

लोकमत न्यूज नेटवर्क

लांजा : तालुक्यातील पालू गावामध्ये पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. मात्र, ग्रामस्थांनी मागणी करुनही प्रशासन टँकरद्वारे पाणीपुरवठा करत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे बुधवारी हुंबरवणे येथे पाणीपुरवठा करण्यासाठी आलेल्या शासकीय टँकरला ग्रामस्थांनी दिवसभर घेराओ घालत अडवून धरले होते. जोपर्यंत प्रशासन पालू गावाला पाणी देत नाही, तोपर्यंत टँकर न सोडण्याचा पवित्रा पालू ग्रामस्थांनी घेतला होता.

तालुक्यातील हुंबरवणे गावामध्येही भीषण पाणीटंचाई जाणवत असल्याने ग्रामस्थांची  मागणी लक्षात घेत प्रशासनाने एक दिवस आड करून गावाला पाणीपुरवठा सुरू केला आहे. प्रथम चिंचुर्टी व त्यानंतर हुंबरवणे गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. मात्र, त्या शेजारीच असणाºया पालू येथील ग्रामस्थांवर पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. पाणी नसल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत.

पालू गावातील सात वाड्यांवर दोन ते तीन दिवस आड करुन पाणी पिण्याची वेळ आली आहे. पालू गावामध्ये चार विहिरी असून, या विहिरी पूर्णत: कोरड्या पडल्या आहेत. याच विहिरींवर ग्रामपंचायतीची नळपाणी योजना अवलंबून आहे. 

पालू गावातील गावकारवाडी, दंडावरचीवाडी, बौद्धवाडी, गाडेवाडी, रामवाडी, पानंदी खालचीवाडी, नामेवाडी अशा सात वाड्यांतील ग्रामस्थांच्या घशाला पाण्याविना कोरड पडली आहे. काही दिवसांपूर्वी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी केली होती. मात्र, प्रशासनाकडून त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

दरम्यान, हुंबरवणे येथे बुधवारी सकाळी शासकीय टँकर पाणी घेऊन गेला होता. यावेळी संतप्त झालेल्या पालू येथील ग्रामस्थांनी या  टँकरला अडवले. जोपर्यंत प्रशासन पालू गावात पाण्याचा टँकर पाठवत नाही, तोपर्यंत आम्ही हा टँकर सोडणार नाही, असा पवित्रा पालू ग्रामस्थांनी घेतला होता. त्यामुळे टँकर दिवसभर जाग्यावरच उभा होता. याबाबतची माहिती लांजा पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाला दिल्याची माहिती सरपंच सुहास नामे यांनी दिली.

पालू गावातील विहिरींमध्ये पुरेसा पाणीसाठा असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने प्रशासनाला कळवल्यामुळेच तालुका प्रशासनाने पालू गावामध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु केलेला नाही. मात्र, प्रत्यक्षात ग्रामस्थ पाणी नसल्याने पाणी पाणी करत आहेत.पालू गावात भीषण पाणीटंचाई जाणवत असून, आतापर्यंत अनेकवेळा मागणी करूनही प्रशासनाने या गावासाठी टँकर पुरवलेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांचे हाल होत आहेत. त्याविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीwater shortageपाणीटंचाई