शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

एक किलो मटारच्या पैशांत मिळते पावणे दोन लिटर पेट्रोल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2021 14:21 IST

मेहरुन नाकाडे रत्नागिरी : परतीचा पाऊस राज्यात सर्वत्र झाल्याने भाजीपाला पिकांचे झालेले नुकसान, शिवाय इंधन दरवाढीमुळे भाज्यांच्या दरात कमालीची ...

मेहरुन नाकाडेरत्नागिरी : परतीचा पाऊस राज्यात सर्वत्र झाल्याने भाजीपाला पिकांचे झालेले नुकसान, शिवाय इंधन दरवाढीमुळे भाज्यांच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. ८० ते २०० रुपये किलो दराने भाज्यांची विक्री सुरू आहे. बाजारात मटारची आवक सुरू झाली असून, प्रमाण अल्प आहे. मात्र, दर गगनाला भिडले आहे. दोनशे रुपये किलो दराने मटार विक्री सुरू असून, एक किलो मटारच्या पैशात तब्बल पावणे दोन लिटर पेट्रोल येत आहे.

दिवाळीपूर्वीपासूनच भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. ८० ते १०० रुपये किलो दराने विकण्यात येणाऱ्या टोमॅटोच्या दरात काही अंशी घसरण झाली असून, ४० ते ५० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. बहुतांश भाज्या १५ ते २० रुपये पाव किलो दराने विकण्यात येत आहेत. कोथिंबिरीचे दरही गडगडले असून २५ रुपये जुडी दराने विक्री सुरू आहे.

नवा कांदा, बटाटा बाजारात आला असून कांदा ३५ ते ४५ रुपये, तर बटाटा ३० ते ३५ रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. लसणाचे दर कडाडले असून १६० ते १८० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच भाज्यांचे दर वाढीव असल्याने किरकोळ विक्रीवर त्याचा परिणाम होत आहे. भाज्यांच्या वाढत्या दरामुळे गृहिणींचे बजेट मात्र कोलमडून लागले आहे.

स्थानिक शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या पालेभाज्या बाजारात विक्रीसाठी येऊ लागल्या आहेत. १५ ते २० रुपये जुडी दराने विक्री सुरू आहे. मेथी, मूळा, पालक, माठ, मोहरीची भाजी विक्रीसाठी येत आहे. आंबा घाट अवजड वाहनांसाठी बंद होता, अणुस्कूरामार्गे वाहतूक सुरू असल्याने अंतरवाढीचा परिणाम दरावर झाला असल्याचे सांगण्यात येते.

पेट्रोल ११२, तर डिझेल १०५ रुपये लिटर

दिवाळीत इंधनाचे दर पाच ते दहा रुपयांनी कमी झाले असले, तरी गेल्या वर्षभर वाढत्या इंधन दराचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंवर झाला आहे. ११७ रुपये लिटर दराने विक्री करण्यात येणारे पेट्रोल ११२ रुपये लिटर तर डिझेल ११५ ऐवजी १०५ रुपये दराने विक्री सुरू आहे.

कोरोनामुळे आधीच आर्थिक स्थिती कोलमडलेली असतानाच महागाईने कंबरडे मोडले आहे. इंधन दरवाढ, पावसाचे कारण देण्यात येत असले, तरी भाजीपाला दरात कायमच उतार कमी, चढच अधिक आहे. - शमिका रामाणी, रत्नागिरी

भाज्यांचे दर आधीच कमी नव्हते त्यात पावसाचे व इंधन दरवाढीचे कारण देत पुन्हा भाववाढ करण्यात आली आहे. वास्तविक दरावर नियंत्रण नसल्याने शेतकरी, ग्राहक भरडला जात आहे. दरवाढीमुळे भाज्या खरेदी करताना प्रश्न पडतो. - स्वराली करंदीकर, रत्नागिरी

स्थानिक भाज्यांचे दर कडाडलेले..

- पालेभाज्यांची आवक सुरू असली, तरी १५ ते २० रुपये जुडी दराने विक्री सुरू आहे.

- स्थानिक भाज्यांमध्ये कुयरी, वांगी विक्रीसाठी येत असले तरी दर मात्र कडाडलेलेच आहेत.

भाजीपाला दर

मटार २००

वांगी ४०

फरसबी ८०

घेवडा ६०

भेंडी ६०

कोबी ३०

फ्लाॅवर ६०

सिमला मिरची ४०

टोमॅटो ४०/५०

बटाटा ३०/३५

कांदा ३५/४५

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPetrolपेट्रोल