शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

एक किलो मटारच्या पैशांत मिळते पावणे दोन लिटर पेट्रोल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2021 14:21 IST

मेहरुन नाकाडे रत्नागिरी : परतीचा पाऊस राज्यात सर्वत्र झाल्याने भाजीपाला पिकांचे झालेले नुकसान, शिवाय इंधन दरवाढीमुळे भाज्यांच्या दरात कमालीची ...

मेहरुन नाकाडेरत्नागिरी : परतीचा पाऊस राज्यात सर्वत्र झाल्याने भाजीपाला पिकांचे झालेले नुकसान, शिवाय इंधन दरवाढीमुळे भाज्यांच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. ८० ते २०० रुपये किलो दराने भाज्यांची विक्री सुरू आहे. बाजारात मटारची आवक सुरू झाली असून, प्रमाण अल्प आहे. मात्र, दर गगनाला भिडले आहे. दोनशे रुपये किलो दराने मटार विक्री सुरू असून, एक किलो मटारच्या पैशात तब्बल पावणे दोन लिटर पेट्रोल येत आहे.

दिवाळीपूर्वीपासूनच भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. ८० ते १०० रुपये किलो दराने विकण्यात येणाऱ्या टोमॅटोच्या दरात काही अंशी घसरण झाली असून, ४० ते ५० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. बहुतांश भाज्या १५ ते २० रुपये पाव किलो दराने विकण्यात येत आहेत. कोथिंबिरीचे दरही गडगडले असून २५ रुपये जुडी दराने विक्री सुरू आहे.

नवा कांदा, बटाटा बाजारात आला असून कांदा ३५ ते ४५ रुपये, तर बटाटा ३० ते ३५ रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. लसणाचे दर कडाडले असून १६० ते १८० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच भाज्यांचे दर वाढीव असल्याने किरकोळ विक्रीवर त्याचा परिणाम होत आहे. भाज्यांच्या वाढत्या दरामुळे गृहिणींचे बजेट मात्र कोलमडून लागले आहे.

स्थानिक शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या पालेभाज्या बाजारात विक्रीसाठी येऊ लागल्या आहेत. १५ ते २० रुपये जुडी दराने विक्री सुरू आहे. मेथी, मूळा, पालक, माठ, मोहरीची भाजी विक्रीसाठी येत आहे. आंबा घाट अवजड वाहनांसाठी बंद होता, अणुस्कूरामार्गे वाहतूक सुरू असल्याने अंतरवाढीचा परिणाम दरावर झाला असल्याचे सांगण्यात येते.

पेट्रोल ११२, तर डिझेल १०५ रुपये लिटर

दिवाळीत इंधनाचे दर पाच ते दहा रुपयांनी कमी झाले असले, तरी गेल्या वर्षभर वाढत्या इंधन दराचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंवर झाला आहे. ११७ रुपये लिटर दराने विक्री करण्यात येणारे पेट्रोल ११२ रुपये लिटर तर डिझेल ११५ ऐवजी १०५ रुपये दराने विक्री सुरू आहे.

कोरोनामुळे आधीच आर्थिक स्थिती कोलमडलेली असतानाच महागाईने कंबरडे मोडले आहे. इंधन दरवाढ, पावसाचे कारण देण्यात येत असले, तरी भाजीपाला दरात कायमच उतार कमी, चढच अधिक आहे. - शमिका रामाणी, रत्नागिरी

भाज्यांचे दर आधीच कमी नव्हते त्यात पावसाचे व इंधन दरवाढीचे कारण देत पुन्हा भाववाढ करण्यात आली आहे. वास्तविक दरावर नियंत्रण नसल्याने शेतकरी, ग्राहक भरडला जात आहे. दरवाढीमुळे भाज्या खरेदी करताना प्रश्न पडतो. - स्वराली करंदीकर, रत्नागिरी

स्थानिक भाज्यांचे दर कडाडलेले..

- पालेभाज्यांची आवक सुरू असली, तरी १५ ते २० रुपये जुडी दराने विक्री सुरू आहे.

- स्थानिक भाज्यांमध्ये कुयरी, वांगी विक्रीसाठी येत असले तरी दर मात्र कडाडलेलेच आहेत.

भाजीपाला दर

मटार २००

वांगी ४०

फरसबी ८०

घेवडा ६०

भेंडी ६०

कोबी ३०

फ्लाॅवर ६०

सिमला मिरची ४०

टोमॅटो ४०/५०

बटाटा ३०/३५

कांदा ३५/४५

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPetrolपेट्रोल