शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

रत्नागिरीत बस-कारची समोरासमोर धडक; अपघातात तरुण ठार, चौघे जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 15:21 IST

रत्नागिरी : शहरानजीकच्या कारवांचीवाडी येथे बस आणि कार यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. तर कारमधील अन्य चाैघे ...

रत्नागिरी : शहरानजीकच्या कारवांचीवाडी येथे बस आणि कार यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. तर कारमधील अन्य चाैघे किरकोळ जखमी झाले आहेत. विकास कोंडिबा नवसरे (३४, रा. ठाणे, मुंबई), असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून, हा अपघात गुरुवारी सकाळी झाला.या अपघात कारमधील रविकुमार नागारम (४४), नमन अगरवाल, किशोर तांदळे, सागर भादवे हे चाैघे किरकोळ जखमी झाले आहेत. याबाबत बसचालक रविकांत नानासाहेब मिसाळ (३७, मूळ रा. बीड, सध्या रा. खेडशी, रत्नागिरी) यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, गुरुवारी सकाळी ते बस (एमएच १४ बीटी २४८१) घेऊन रत्नागिरी ते जयगड असे जात होते. ते कारवांचीवाडी फाट्याच्या पुढे एका ढाब्याच्या समोर आले असता रत्नागिरीकडे येणाऱ्या कार (एमएच ०४ एलएच १६७८)ने बसला समोरून जोराची धडक दिली.या अपघातात विकास नवसरे हा गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवून अपघाताचा पंचनामा केला. सायंकाळी उशिरापर्यंत या अपघाताची नोंद ग्रामीण पोलिस स्थानकात करण्याची कार्यवाही सुरू होती.

बैठकीसाठी येताना अपघातअपघातग्रस्त कार ही एका मायक्राे फायनान्स कंपनीची असल्याची माहिती मिळाली आहे. हे सर्वजण मुंबईतून रत्नागिरीत एका बैठकीसाठी येत हाेते, असेही सांगण्यात येत आहे. मात्र, रस्त्यावरील डायव्हर्जनचा अंदाज न आल्याने गाडी बसवर जाऊन आदळली आणि अपघात झाला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघातDeathमृत्यू