शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
4
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
5
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
6
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
7
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
8
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
9
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
10
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
11
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
12
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
13
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
14
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
15
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
16
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
17
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
18
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
19
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
20
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...

आता ऑक्टोबरही होतोय पावसाचा महिना, शेतकऱ्यांचे आणि मच्छिमारांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2020 11:21 IST

rain, ratnagirinews, farmar गेल्या काही वर्षांपासून परतीच्या पावसाचा मुक्काम लांबत असून, ऑक्टोबर महिन्यातही पाऊस पडू लागला आहे. त्यामुळे उर्वरित चार महिन्यांप्रमाणेच ऑक्टोबर महिनाही पावसाचा महिना ठरू लागला आहे. अलिकडच्या काळात पावसाचे वेळापत्रक बदलले आहे. ऑक्टोबर महिन्यात काही दिवस मुसळधार पाऊस झाला असला तरी अतिवृष्टी झालेली नाही.

ठळक मुद्देआता ऑक्टोबरही होतोय पावसाचा महिनायंदा पावसाळ्याच्या सुरूवातीला आणि शेवटीही नुकसान

रत्नागिरी : गेल्या काही वर्षांपासून परतीच्या पावसाचा मुक्काम लांबत असून, ऑक्टोबर महिन्यातही पाऊस पडू लागला आहे. त्यामुळे उर्वरित चार महिन्यांप्रमाणेच ऑक्टोबर महिनाही पावसाचा महिना ठरू लागला आहे. अलिकडच्या काळात पावसाचे वेळापत्रक बदलले आहे. ऑक्टोबर महिन्यात काही दिवस मुसळधार पाऊस झाला असला तरी अतिवृष्टी झालेली नाही.कोकणात जून ते सप्टेंबर हे चार महिने पावसाचे आहेत. जून आणि जुलैमध्ये मुसळधार, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये हलक्या सरी, असे कोकणातील पावसाचे वेळापत्रक असते. जून महिन्यात सरासरी ८१८ मिलिमीटर पाऊस पडतो. जुलैमध्ये १२८६ मिलिमीटर सरासरी पाऊस पडतो. मात्र, यावर्षी केवळ ७०७ मिलिमीटर पाऊस झाला. म्हणजेच जुुलैमध्ये केवळ ५५ टक्केच पाऊस झाला. २०१९ आणि २०२० सालच्या या दोन्ही महिन्यांनी निराशाच केली.

ऑगस्ट महिन्यापासून पावसाचे प्रमाण कमी कमी होत जाते. सप्टेंबर महिन्यात पावसाची परती सुरू होते. मात्र, गेल्या दोन वर्षात ऑगस्ट महिन्यात मुसळधार पाऊस होत असून पावसाचा मुक्काम ऑक्टोबर अखेरपर्यंत लांबत आहे.जानेवारी २०१९ पासून वर्षभरच समुद्रात विविध वादळे येत होती. ऑगस्ट महिन्यात आलेल्या क्यार वादळाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आणि मच्छिमारांचे अतोनात नुकसान केले होते. यावर्षीही ऑक्टोबर महिन्यात पावसाचा मुक्काम वाढला आहे.

बंगालच्या उपसागरात वारंवार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हा पाऊस पडत असल्याचे हवामान खात्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. १३ ते १६ ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत होता. मात्र, अजूनही जिल्ह्यात अतिवृष्टी वा ढगफुटीसारखा पाऊस झालेला नाही. जिल्ह्यात १ ते २१ ऑक्टोबर या कालावधीत १२५१ मिलिमीटर (सरासरी १३९ मिलिमीटर) पाऊस झाल्याची नोंद झाली आहे.यावर्षी केवळ ७८.५६ टक्केयावर्षी जून आणि जुलै महिन्यात पावसाने निराशा केली. ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात सातत्य दाखवले असले तरी पावसाच्या चार महिन्यांच्या कालावधीत होणारा सरासरी पाऊस यावर्षी केवळ ७८.५६ टक्के (सरासरी २६४२.८४ टक्के) इतकाच झाला आहे. सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यापासून सातत्याने बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे. त्यामुळे आता ऑक्टोबर महिन्यातही पावसाचा मुक्काम वाढू लागला आहे.

टॅग्स :RainपाऊसRatnagiriरत्नागिरीFarmerशेतकरी