शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
2
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
3
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
4
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
5
"ये तो होना ही था..." अरविंदर सिंग लवलींच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
6
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
7
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
8
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
9
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
10
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
11
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
14
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
15
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
16
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
17
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
18
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
19
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
20
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा

शिवसेनेच्या वर्चस्वाला राष्ट्रवादी चे आव्हान ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 12:01 AM

प्रकाश वराडकर ।लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : शिवसेना नेते, केंद्रीय मंत्री अनंत गीते व सेनेचे राज्यातील पर्यावरणमंत्री रामदास कदम आपल्यामधील दुरावा संपल्याचे सांगत भाजपला येत्या विधानसभा निवडणुकीत धक्का देण्यास सज्ज झाले आहेत, तर चिपळूण विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडून हिसकावून घेण्याची जोरदार तयारी राष्टÑवादीचे शेखर निकम यांनी केली असून, त्यासाठी त्यांनी जिल्हाध्यक्षपदावर पाणी ...

प्रकाश वराडकर ।लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : शिवसेना नेते, केंद्रीय मंत्री अनंत गीते व सेनेचे राज्यातील पर्यावरणमंत्री रामदास कदम आपल्यामधील दुरावा संपल्याचे सांगत भाजपला येत्या विधानसभा निवडणुकीत धक्का देण्यास सज्ज झाले आहेत, तर चिपळूण विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडून हिसकावून घेण्याची जोरदार तयारी राष्टÑवादीचे शेखर निकम यांनी केली असून, त्यासाठी त्यांनी जिल्हाध्यक्षपदावर पाणी सोडले आहे. सन २०१९च्या विधानसभा निवडणुकीचे पडघम जिल्ह्यात आतापासूनच घुमू लागले आहेत. जिल्ह्यावरील सेनेच्या वर्चस्वाला आव्हान देण्याची तयारी राष्टÑवादीने सुरू केल्याची चर्चा आहे.जिल्ह्यात गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला रत्नागिरी, लांजा-राजापूर व चिपळूण अशा तीन जागांवर विजय मिळाला होता. दापोली व गुहागर या दोन्ही मतदारसंघांवर राष्टÑवादी कॉँग्रेसने कब्जा केला होता. दापोलीची जागा सेनानेते अनंत गीते व रामदास कदम यांच्यातील राजकीय हेवे-दाव्यांमुळे सेनेच्या हातून गेल्यावेळी निसटली. तेथे राष्टÑवादीचे संजय कदम यांनी बाजी मारली. रत्नागिरीत सेनेचे उदय सामंत , चिपळूणमध्ये सदानंद चव्हाण व राजापूरमध्ये राजन साळवी यांनी सेनेचे गड त्यावेळी राखले.विधानसभा निवडणुकीला एक वर्ष उरले असून, सर्वच पक्षांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. दापोली विधानसभा मतदारसंघात पुन्हा सेनेच्या विजयासाठी एकमेकांचे विरोधक असलेले गीते-रामदास कदम एकत्र आले आहेत. उत्तर रत्नागिरीत त्यांच्या सभा सुरू झाल्या आहेत. दक्षिण रत्नागिरीतील चार तालुक्यांमध्येही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. रत्नागिरी व लांजा - राजापूर हे मतदारसंघ राखण्यासाठी शिवसेनेने व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. नाणार रिफायनरी प्रकल्पाचे आधी समर्थन करणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांनी राजापूरची विधानसभा जागा धोक्यात येईल, हे लक्षात आल्याने यु टर्न घेतला आहे. नाणारमध्ये रिफायनरी प्रकल्प लादल्यास उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरणमंत्री रामदास कदम, केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे. मात्र, हा यु टर्न केवळ निवडणुकीपुरता मर्यादित कालावधीसाठी असल्याची चर्चाही सुरू झाली आहे.दुसरीकडे गुहागर व दापोली हे मतदारसंघ राखण्याबरोबरच चिपळूण मतदारसंघही ताब्यात घेण्याचा चंग राष्टÑवादी कॉँग्रेसने बांधला आहे. रत्नागिरीत आमदार उदय सामंत यांनी मतदारसंघात सेनेची वीण घट्ट बांधली आहे. तरीही येथे भाजपकडून प्रसाद लाड किंवा अन्य तगडा उमेदवार दिला जाण्याची चर्चा आहे. त्यामुळे एकूणच निवडणुकीचे राजकारण रंगले आहे.भाजपच्या रणनीतीवर लक्षजिल्ह्यात भाजप कमकुवत असला तरी राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत भाजप नेमकी कोणती रणनीती आखणार, याकडे सर्व पक्षांच्या नेत्यांचे लक्ष लागले आहे. एकूणच २०१९ची निवडणूक चुरशीची होणार असल्याचे चित्र आहे.