शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

समाजप्रबोधनासाठी ‘नमना’चे माध्यम (संडे स्पेशल)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:29 IST

नमनामध्ये ३० ते ४० लोकांचा सहभाग असतो. नमनामध्ये सहभागी होणाऱ्या मंडळींची एक विशिष्ट वेशभूषा असते. एका विशिष्ट झगेदार पोशाखात ...

नमनामध्ये ३० ते ४० लोकांचा सहभाग असतो. नमनामध्ये सहभागी होणाऱ्या मंडळींची एक विशिष्ट वेशभूषा असते. एका विशिष्ट झगेदार पोशाखात हे कलाकार दोन रांगेत आडवे उभे राहतात. प्रत्येकाच्या हातात टाळ, डोक्यावर रंगीबेरंगी पगडी, गळ्यात रंगीत ओढण्या असतात. रांगेच्या मध्यभागी असलेला सूत्रधार मात्र संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करीत असतो. देवाच्या नावाने नमनाला प्रारंभ होतो. सुरुवातीला बारा किंवा सोळा नमने सादर केली जातात.

बारा नमनांनंतर संकासुर प्रवेश करतो. त्याचा पोशाख दशावतारातील संकासुरासारखा असतो. त्याने उंच काळी टोपी घातलेली असते. तिने त्याचा संपूर्ण चेहरा झाकला जातो. दिसण्याकरिता दोन छिद्रे ठेवलेली असतात. तो मूकपणे नृत्य करीत असतो. कधीकधी त्याच्याबरोबर स्त्री वेशातील पुरुषही नाचत असतो. एक सोंग गेल्यावर दुसरे सोंग येईपर्यंतचा काळ हा संकासुर, मृदुंगवादक यांच्या, गाण्याचा व मृदुंगाच्या तालावर नाचण्याचा असतो. गुहागरच्या पट्ट्यात संकासुर हा प्रकार अधिक आहे.

नमन गाणाऱ्या मंडळीच्या कडेला दोन मृदुंग वाजविणारे असतात. या लोककलेत ‘गणगौळण’प्रमाणेच आणखीही महत्त्वपूर्ण काही सोंगे असतात. सोंगात सर्वप्रथम गणपतीबाप्पांना अग्रक्रम आहे. गणेशाचे पूजन सादर करतानाच गणेशाची आख्यायिका गाण्यातून सादर केली जाते. लाकडापासून बनविलेले मुखवटे सुरुवातीला वापरले जात असत. मात्र, आता त्यामध्ये बदल झाला असून, हलक्या व प्लास्टिक, फायबरपासून बनविलेल्या मुखवट्यांचा वापर वाढला आहे. गणपतीच्या आगमनावेळी काही अन्य सोंगेही सादर केली जातात. त्यामध्ये नटवा, शंखासुर, वाघ, हरिण यांचा समावेश असतो.

गण सादर झाल्यानंतर ‘गवळण’ सादर केली जाते. गवळण हा प्रकार मजेदार व श्रवणीय असतो. दही, दूध, लोणी विक्रीसाठी गवळणी मथुरेच्या बाजाराला निघालेल्या असतात. मात्र, त्यांची वाट गोकुळातील पेंद्या, सुदामा (श्रीकृष्णाचे सवंगडी) रोखतात. त्यावेळी गवळणी, पेंद्या व सुदामा यांच्यातील संवादाबरोबर गाणी व मिश्किल प्रकार सादर केले जातात. कृष्णाचे सवंगडी गवळणींची वाट अडवीत त्यांच्या बाजारात विक्रीसाठी जाणाऱ्या मालाची लूट करतात. माठही फोडतात. यावेळी मावशी (ज्येष्ठ महिला) अनेक कला सादर करते, त्यावेळी प्रेक्षकांमधून हास्याचे फवारे उडतात. गवळणी आपल्या गाण्यातून वाट सोडण्यासाठी श्रीकृृष्णाची विनवणी करतात. गवळणीनंतर कौटुंबिक जीवनावर आधारित मात्र एक चांगला संदेश देणारी नाटुकली सादर केली जाते. या नाटुकलीचा विषय सामाजिक जनजागृतीचा संदेश देणारा असतो. नमनामध्ये शिपाई हे हल्लीच्या पोलीस दलातील हवालदाराप्रमाणे असतात. गंभीर विषय विनोदी करून सांगताना विविध संदेश देत असतात. एकूणच त्यांच्या अभिनयातून सामाजिक परिस्थितीचा आढावा घेण्यात येतो.

नमनाच्या शेवटी वगनाट्य सादर करण्यात येते. उत्तररंगात पौराणिक, ऐतिहासिक किंवा सामाजिक कथानकाचा समावेश असलेले एखादे आख्यान असते. रामायण-महाभारतातील कथांचा समावेश असतो. एकूणच सूत्रधार गाण्यातून कथाभाग जोडला जातो व कथानक पुढे नेत असतो. देवादिकांची व प्राण्यांची सोंगेही मुखवटे घालून आणली जातात. शेवटी रावणाचे सोंग येते. दहा तोंडांचा मुखवटा घालून रावण प्रेक्षकांतून ढोल-ताशांच्या तालावर नाचत, आरोळ्या ठोकत प्रवेश करतो. राम-रावण युद्ध होते व रावण मारला जातो. रावण वधानंतर खेळ्याचा मुख्य सूत्रधार यजमानाकडून आरती घेतो. खेळे देवाची आरती म्हणतात व रात्रभर चाललेला हा खेळ उजाडता उजाडता समाप्त होतो. कथा सादर होताना त्यातील नाट्य पुरेपूर फुलविण्यासाठी गद्य-पद्यमिश्रित निवेदन शैलीचा वापर केला जातो. वगनाट्यात पौराणिक विषयावरील एखादी कथा किंवा एखादा सद्य:स्थितीचा विचार करून कथेचा भाग सादर करण्यात येतो. परमेश्वराने धारण केलेल्या दहा अवतारांवर आधारित सोंग आणणे, त्यांच्या जीवनावरील काही घटना-प्रसंगांचे खेळातून दर्शन घडविणे, हा या नाटकाचा उद्देश असतो.

राजापूर तालुक्यात कापडखेळे हा प्रकार अधिक दिसतो. त्यालाच काही ठिकाणी टिपरी खेळे असेही म्हणतात. विशिष्ट पद्धतीचे कपडे परिधान करून हातात टिपऱ्या घेऊन पारंपरिक गीते ही मंडळी सादर करतात. राजापूर तालुक्याच्या काही भागात गोमूचा नाचही घरोघरी जाऊन सादर केला जातो. शिधा, आर्थिक मोबदला कलाकारांच्या पदरात पडावा, यासाठीची ही प्राचीन काळापासूनची तरतूूद.

शिमगोत्सवात घरोघरी खेळे सादर होतात. याशिवाय काही गावांतून गोमूचा नाच अथवा संकासुराचा नाच हा देखील कार्यक्रम होत असतो. वास्तविक दोन्ही पात्रे नमनातीलच आहेत. पूर्वीपासून जोपासलेली ही लोककला आजच्या पिढीलाही आवडणारी आहे. लाइव्ह शोच्या जमान्यात पौराणिक विषयावरील कथानकाबरोबर सामाजिक संदेश देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य नमनातून होत आहे. कोरोनामुळे केवळ ५० माणसांच्या उपस्थितीची मर्यादा ठेवण्यात आली आहे. शिमगोत्सवात मानाची नमने बाहेर पडतात. कोरोनामुळे ठराविक मंडळी नमनात सहभागी होत असून, मास्कही सक्तीने वापरत आहेत. नमनातूनही मास्क, सॅनिटायझर वापराबरोबर सोशल डिस्टन्सिंग राखण्याचा संदेश देण्यात येत आहे.