शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
3
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
4
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
7
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
8
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
9
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
10
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
11
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
12
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
13
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
14
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
15
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
16
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
17
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
18
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
19
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
20
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?

समाजप्रबोधनासाठी ‘नमना’चे माध्यम (संडे स्पेशल)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:29 IST

नमनामध्ये ३० ते ४० लोकांचा सहभाग असतो. नमनामध्ये सहभागी होणाऱ्या मंडळींची एक विशिष्ट वेशभूषा असते. एका विशिष्ट झगेदार पोशाखात ...

नमनामध्ये ३० ते ४० लोकांचा सहभाग असतो. नमनामध्ये सहभागी होणाऱ्या मंडळींची एक विशिष्ट वेशभूषा असते. एका विशिष्ट झगेदार पोशाखात हे कलाकार दोन रांगेत आडवे उभे राहतात. प्रत्येकाच्या हातात टाळ, डोक्यावर रंगीबेरंगी पगडी, गळ्यात रंगीत ओढण्या असतात. रांगेच्या मध्यभागी असलेला सूत्रधार मात्र संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करीत असतो. देवाच्या नावाने नमनाला प्रारंभ होतो. सुरुवातीला बारा किंवा सोळा नमने सादर केली जातात.

बारा नमनांनंतर संकासुर प्रवेश करतो. त्याचा पोशाख दशावतारातील संकासुरासारखा असतो. त्याने उंच काळी टोपी घातलेली असते. तिने त्याचा संपूर्ण चेहरा झाकला जातो. दिसण्याकरिता दोन छिद्रे ठेवलेली असतात. तो मूकपणे नृत्य करीत असतो. कधीकधी त्याच्याबरोबर स्त्री वेशातील पुरुषही नाचत असतो. एक सोंग गेल्यावर दुसरे सोंग येईपर्यंतचा काळ हा संकासुर, मृदुंगवादक यांच्या, गाण्याचा व मृदुंगाच्या तालावर नाचण्याचा असतो. गुहागरच्या पट्ट्यात संकासुर हा प्रकार अधिक आहे.

नमन गाणाऱ्या मंडळीच्या कडेला दोन मृदुंग वाजविणारे असतात. या लोककलेत ‘गणगौळण’प्रमाणेच आणखीही महत्त्वपूर्ण काही सोंगे असतात. सोंगात सर्वप्रथम गणपतीबाप्पांना अग्रक्रम आहे. गणेशाचे पूजन सादर करतानाच गणेशाची आख्यायिका गाण्यातून सादर केली जाते. लाकडापासून बनविलेले मुखवटे सुरुवातीला वापरले जात असत. मात्र, आता त्यामध्ये बदल झाला असून, हलक्या व प्लास्टिक, फायबरपासून बनविलेल्या मुखवट्यांचा वापर वाढला आहे. गणपतीच्या आगमनावेळी काही अन्य सोंगेही सादर केली जातात. त्यामध्ये नटवा, शंखासुर, वाघ, हरिण यांचा समावेश असतो.

गण सादर झाल्यानंतर ‘गवळण’ सादर केली जाते. गवळण हा प्रकार मजेदार व श्रवणीय असतो. दही, दूध, लोणी विक्रीसाठी गवळणी मथुरेच्या बाजाराला निघालेल्या असतात. मात्र, त्यांची वाट गोकुळातील पेंद्या, सुदामा (श्रीकृष्णाचे सवंगडी) रोखतात. त्यावेळी गवळणी, पेंद्या व सुदामा यांच्यातील संवादाबरोबर गाणी व मिश्किल प्रकार सादर केले जातात. कृष्णाचे सवंगडी गवळणींची वाट अडवीत त्यांच्या बाजारात विक्रीसाठी जाणाऱ्या मालाची लूट करतात. माठही फोडतात. यावेळी मावशी (ज्येष्ठ महिला) अनेक कला सादर करते, त्यावेळी प्रेक्षकांमधून हास्याचे फवारे उडतात. गवळणी आपल्या गाण्यातून वाट सोडण्यासाठी श्रीकृृष्णाची विनवणी करतात. गवळणीनंतर कौटुंबिक जीवनावर आधारित मात्र एक चांगला संदेश देणारी नाटुकली सादर केली जाते. या नाटुकलीचा विषय सामाजिक जनजागृतीचा संदेश देणारा असतो. नमनामध्ये शिपाई हे हल्लीच्या पोलीस दलातील हवालदाराप्रमाणे असतात. गंभीर विषय विनोदी करून सांगताना विविध संदेश देत असतात. एकूणच त्यांच्या अभिनयातून सामाजिक परिस्थितीचा आढावा घेण्यात येतो.

नमनाच्या शेवटी वगनाट्य सादर करण्यात येते. उत्तररंगात पौराणिक, ऐतिहासिक किंवा सामाजिक कथानकाचा समावेश असलेले एखादे आख्यान असते. रामायण-महाभारतातील कथांचा समावेश असतो. एकूणच सूत्रधार गाण्यातून कथाभाग जोडला जातो व कथानक पुढे नेत असतो. देवादिकांची व प्राण्यांची सोंगेही मुखवटे घालून आणली जातात. शेवटी रावणाचे सोंग येते. दहा तोंडांचा मुखवटा घालून रावण प्रेक्षकांतून ढोल-ताशांच्या तालावर नाचत, आरोळ्या ठोकत प्रवेश करतो. राम-रावण युद्ध होते व रावण मारला जातो. रावण वधानंतर खेळ्याचा मुख्य सूत्रधार यजमानाकडून आरती घेतो. खेळे देवाची आरती म्हणतात व रात्रभर चाललेला हा खेळ उजाडता उजाडता समाप्त होतो. कथा सादर होताना त्यातील नाट्य पुरेपूर फुलविण्यासाठी गद्य-पद्यमिश्रित निवेदन शैलीचा वापर केला जातो. वगनाट्यात पौराणिक विषयावरील एखादी कथा किंवा एखादा सद्य:स्थितीचा विचार करून कथेचा भाग सादर करण्यात येतो. परमेश्वराने धारण केलेल्या दहा अवतारांवर आधारित सोंग आणणे, त्यांच्या जीवनावरील काही घटना-प्रसंगांचे खेळातून दर्शन घडविणे, हा या नाटकाचा उद्देश असतो.

राजापूर तालुक्यात कापडखेळे हा प्रकार अधिक दिसतो. त्यालाच काही ठिकाणी टिपरी खेळे असेही म्हणतात. विशिष्ट पद्धतीचे कपडे परिधान करून हातात टिपऱ्या घेऊन पारंपरिक गीते ही मंडळी सादर करतात. राजापूर तालुक्याच्या काही भागात गोमूचा नाचही घरोघरी जाऊन सादर केला जातो. शिधा, आर्थिक मोबदला कलाकारांच्या पदरात पडावा, यासाठीची ही प्राचीन काळापासूनची तरतूूद.

शिमगोत्सवात घरोघरी खेळे सादर होतात. याशिवाय काही गावांतून गोमूचा नाच अथवा संकासुराचा नाच हा देखील कार्यक्रम होत असतो. वास्तविक दोन्ही पात्रे नमनातीलच आहेत. पूर्वीपासून जोपासलेली ही लोककला आजच्या पिढीलाही आवडणारी आहे. लाइव्ह शोच्या जमान्यात पौराणिक विषयावरील कथानकाबरोबर सामाजिक संदेश देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य नमनातून होत आहे. कोरोनामुळे केवळ ५० माणसांच्या उपस्थितीची मर्यादा ठेवण्यात आली आहे. शिमगोत्सवात मानाची नमने बाहेर पडतात. कोरोनामुळे ठराविक मंडळी नमनात सहभागी होत असून, मास्कही सक्तीने वापरत आहेत. नमनातूनही मास्क, सॅनिटायझर वापराबरोबर सोशल डिस्टन्सिंग राखण्याचा संदेश देण्यात येत आहे.