शहरं
Join us  
Trending Stories
1
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
2
एकनाथ शिंदेंनी मुलाचे भरसभेत केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, “श्रीकांत हे व्हिजन असलेले खासदार”
3
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
4
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
5
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिका गाजवणारा 'किंग' ठरला कोहली! तेंडुलकरचा 'महारेकॉर्ड' मोडला
6
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
7
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
8
“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
9
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
10
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
11
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
12
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
13
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
14
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
15
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
16
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
17
अरे बापरे! Grok वापरणाऱ्यांनो सावधान; लोकांच्या घराचे पत्ते, पर्सनल माहिती लीक, प्रायव्हसी धोक्यात
18
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
19
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
20
GenZमध्ये महाराष्ट्र सरकारची कार्यशैली लोकप्रिय; ६७% तरुणाईला देवेंद्र फडणवीसांवर 'विश्वास'
Daily Top 2Weekly Top 5

कोकणवासीयांनो स्वागताला तयार व्हा, गणेशोत्सवासाठी मुंबईकर उद्यापासून येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 16:01 IST

कोकणात यावर्षी येणार पाच हजार बसेस

रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी मुंबईकरांची पावले हळूहळू कोकणाकडे वळू लागली आहेत. कोकणात येणाऱ्या मुंबईकरांसाठी राज्य परिवहन महामंडळाने जादा गाड्यांचे नियाेजन केले आहे. शनिवार (२३ ऑगस्ट) पासून मुंबई व उपनगरातून गाड्या सुटणार असून, रविवारी मुंबईकर कोकणात दाखल होणार आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यांसाठी यावर्षी पाच हजार जादा बसेस सोडण्यात येणार असून, रत्नागिरी जिल्ह्यात २५०० पेक्षा जादा गाड्या येणार असल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.कोकणवासीयांचा आवडता गणेशाेत्सव अवघ्या चार दिवसांवर आला आहे. कोकणात घरोघरी गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येत असल्याने काेकणातील घरे मुंबईकरांच्या येण्याने गजबजून जातात. एसटी, रेल्वे किंवा खासगी वाहनाने मुंबईकर गणेशाेत्सवाला गावी दाखल हाेतात. गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या मुंबईकरांसाठी जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. दि. २३ ऑगस्टपासून २७ ऑगस्टपर्यंत जादा गाड्या काेकणात येणार आहेत.

जवळपास सात ते आठ तासांचा प्रवास करणाऱ्या मुंबईकरांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रत्येक आगारातील उपाहारगृहातून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पुरेसे खाद्यपदार्थ, प्रसाधनगृह स्वच्छतेबाबत प्रशासनाकडून सूचना करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात मंडणगड ते राजापूर या तालुक्यांत जादा गाड्या येणार असून, आलेल्या सर्व गाड्या त्या-त्या आगारात थांबवून ठेवण्यात येणार आहेत. या गाड्या परतीच्या प्रवासासाठी साेडण्यात येणार आहेत.

  • कशेडी ते चिपळूण, संगमेश्वर ते हातखंबा, हातखंबा ते राजापूर मार्गावर तीन गस्तीपथके.
  • खेड, चिपळूण, संगमेश्वर, हातखंबा या चार ठिकाणी दुरुस्ती पथके.
  • भरणे नाका, चिपळूण, हातखंबा तिठा येथे ब्रेकडाऊन व्हॅन असणार.
  • जादा गाड्या घेऊन येणारे चालक अन्य जिल्ह्यांतील असल्याने मार्ग दाखविण्यासाठी ठिकठिकाणी सूचना फलक लावण्यात आले आहेत.
  • एसटी कर्मचारी, अधिकाऱ्यांचे स्वतंत्र पथकही महामार्गावर कार्यरत राहणार आहे.

गणेशभक्तांचे आगमन लवकरच होणार असून, मंडणगड ते राजापूर आगारांत जादा गाड्या येणार आहेत. या गाड्या त्या-त्या आगारात थांबवून ठेवण्याची सूचना संबंधित आगार प्रमुखांना करण्यात आली आहे. परतीच्या प्रवासासाठी दि. २ सप्टेंबरपासून गाड्या सुटणार आहेत. त्यासाठी ऑनलाइन आरक्षण सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. - प्रज्ञेश बोरसे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी