शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत मल्टीमॉडेल लॉजीस्टिक पार्क उभारणार, मंत्री उदय सामंतांनी दिली माहिती

By अरुण आडिवरेकर | Updated: August 30, 2022 19:17 IST

या माध्यमातून उद्योग व्यवसायास चालना मिळणार

रत्नागिरी : रत्नागिरी, जालना, भिवंडी, अकोला, सांगली, जळगाव, सोलापूर, नाशिक या ठिकाणी मल्टीमॉडेल लॉजीस्टिक पार्क लवकरच सुरू होणार असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. या माध्यमातून उद्योग व्यवसायास चालना मिळणार आहे. वाहतूक खर्च कमी झाल्यामुळे पर्यायाने वस्तूंच्या किंमती कमी होण्यास मदत होणार आहे. याचा फायदा उद्योजकांना आणि ग्राहकांना होणार आहे, असे त्यांनी सांगितले.केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत दूरदृश्य प्रणालीद्वारे याबाबत बैठक पार पडली. यावेळी आमदार वसंत खंडेलवाल, प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन व संबंधित अधिकारी उपस्थित होते.यावेळी मंत्री गडकरी म्हणाले की, सध्याच्या काळामध्ये वाहतूक खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. भारतामध्ये हा खर्च १६ टक्क्यांपर्यंत आहे. या खर्चामध्ये मल्टीमॉडेल लॉजीस्टिक पार्कच्या माध्यमातून सुमारे ६ ते ७ टक्के बचत करता येणे शक्य आहे. महाराष्ट्र राज्य हे प्रगतशील राज्य असून, हे पार्क झाल्यानंतर राज्याची प्रगती अधिक गतिमान होण्यास मदत होणार आहे, असे सांगितले.मंत्री सामंत म्हणाले की, राज्यामध्ये या ठिकाणी मल्टीमॉडेल लॉजीस्टिक पार्क झाल्यामुळे रत्नागिरी येथून आंबा, काजू, नाशिक, सांगली, जळगाव इत्यादी भागातून द्राक्ष, नागपूर येथून संत्री, अकोला येथून डाळ तसेच पश्चिम महाराष्ट्रातून साखर यांची निर्यात करणे अधिकसोयीचे होणार आहे. या माध्यमातून निर्यात व्यवसायास गती मिळणार असून, या भागाच्या विकासामध्ये भर पडणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

सामंजस्य करारानुसार पार्कमहाराष्ट्र राज्याचा उद्योग विभाग, राष्ट्रीय महामार्ग लॉजीस्टिक मॅनेजमेंट आणि रेल्वे विकास निगम लि. या विभागाच्या सामंजस्य करारानुसार हे पार्क तयार होणार आहेत. या पार्कसाठी आवश्यक असणारी जागा राज्य शासन उपलब्ध करून देणार आहे. याबाबतचे प्रस्ताव उद्योग विभागातर्फे तातडीने पुढील कार्यवाहीसाठी संबंधित विभागाकडे पाठवले जाणार आहेत.

निवळी- जयगड रस्त्याचे चौपदरीकरण होणारकोकणाच्या विकासासाठी आणि बंदरांस जोडण्यासाठी आवश्यक असणाऱ्या निवळी-जयगड या चौपदरी रस्त्याची मागणी मंत्री उदय सामंत यांनी मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली. याबाबतचा प्रस्ताव तत्काळ पाठविण्यास सांगितले असून, निवळी-जयगड रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम लवकरच सुरू होईल, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSangliसांगलीJalgaonजळगावSolapurसोलापूरUday Samantउदय सामंत