शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

काँग्रेसला स्वबळाचे स्वप्न; अन् शिवसेना स्वत:मध्ये मग्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2021 7:43 PM

आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सद्यस्थितीत प्रत्येक पक्षच आपली ताकद आजमावण्याच्या तयारीत आहे. या निवडणुकांच्या निकालांनंतर पुढच्या विधानसभा, लोकसभेची भूमिका निश्चित करण्यासाठी ही निवडणूक स्वबळावर लढवली जाणार आहे.

मनोज मुळ्येरत्नागिरीकाँग्रेसला सध्या स्वबळाचे स्वप्न पडू लागले असून, राष्ट्रवादीला आघाडी हवी असली तरी अजून हे दोन पक्ष एकत्र येण्याची कोणतीच शक्यता दिसत नाही. मोठी ताकद असल्याने शिवसेना कोणाशी हातमिळवण्याची करण्याची शक्यता नाही तर भाजपला कोणीही सोबत घेतलेले नाही. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश आगामी निवडणुका चारही प्रमुख पक्ष स्वबळावर लढण्याचीच शक्यता अधिक आहे.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यात स्वबळावर पुढे जाण्याची घोषणा केली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनीही स्वबळाचीच री ओढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला सद्यस्थितीत आघाडी हवी असली तरी काँग्रेसच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादीतर्फे खासदार सुनील तटकरे यांनीही जिल्ह्यात एकटेच राहण्याची भूमिका घेतली आहे.जिल्ह्यात शिवसेना हा पहिल्या क्रमांकावर आणि ताकदवान पक्ष आहे. त्यामुळे कोणाशी हातमिळवणी करुन आपल्याच जागा कमी करण्याची शिवसेनेची तयारी नाही. भाजपला कोणीही सोबत घेतलेले नाही. त्यामुळे दापोली, मंडणगडमधील नगर पंचायत निवडणूक किंवा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत चारही प्रमुख पक्ष स्वबळावरच पुढे जाण्याची शक्यता अधिक आहे.आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सद्यस्थितीत प्रत्येक पक्षच आपली ताकद आजमावण्याच्या तयारीत आहे. या निवडणुकांच्या निकालांनंतर पुढच्या विधानसभा, लोकसभेची भूमिका निश्चित करण्यासाठी ही निवडणूक स्वबळावर लढवली जाणार आहे.काँग्रेसला एकही सत्तास्थान नाहीजिल्हा परिषद, पंचायत समिती अशा कोणत्याही ठिकाणी काँग्रेसला सत्ता मिळालेली नाही. सत्ता नाहीच, पण काँग्रेसचे सदस्यही नाहीत. राष्ट्रवादी स्वतंत्र झाल्यानंतर काँग्रेसची जी पीछेहाट झाली, ती अजूनही भरुन निघालेली नाही. सध्या केवळ राजापूरचे नगराध्यक्षपद काँग्रेसकडे आहे.विधानसभेत काँग्रेसचा अपयशाचाच आलेख- विधानसभा निवडणुकांमध्ये जिल्ह्यात काँग्रेसचा आलेख फक्त अपयशाचाच आहे.- २००९, २०१४ आणि २०१९ या तीनही विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा एकही आमदार नाही.- काँग्रेससारखीच अवस्था भाजपची झाली आहे. गेल्या तीनही विधानसभेत भाजपला जिल्ह्यात यश मिळालेले नाही.

शिवसेनेच्या यशाची कमान चढतीच

- गेली २५ वर्षे रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेचा वरचष्मा कायम आहे.- १९९५ साली विधानसभेच्या सर्व जागा जिंकलेल्या शिवसेनेने तेव्हापासून स्थानिक स्वराज्य संस्थांवरील आपली पकड कायम ठेवली आहे.- त्यामुळेच शिवसेना कोणाशी हातमिळवणी करणार नाही.

दुसऱ्या क्रमांकावरील राष्ट्रवादीची धडपड

- सद्यस्थितीत जिल्ह्यात राष्ट्रवादी हा दुसऱ्या क्रमांकावरील पक्ष आहे.- पाचपैकी चिपळूणचे शेखर निकम हे राष्ट्रवादीचे एकमदेव आमदार आहेत. त्यांनी आपला गड अजून राखून ठेवला आहे.- स्थानिक स्वराज्य संस्थेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सहकार्य मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे.

निवडणुका लवकरच

- दापोली आणि मंडणगड या दोन नगर पंचायतींची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहेे.- जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका फेब्रुवारीत होण्याची शक्यता आहे.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणतातकाँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी अलिकडेच हे पद स्वीकारले आहे. मात्र त्यानंतरच्या आपल्या दोन दौऱ्यात त्यांनी स्वबळाचाच नारा दिला आहे. महाविकास आघाडी लांब राहिली, पण राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करण्यालाही काँग्रेसची तयारी नाही, असे चित्र सध्या तयार करण्यात आल्याने राष्ट्रवादीचे पदाधिकारीही आश्चर्य व्यक्त करत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसElectionनिवडणूक