शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
4
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
5
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
6
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
7
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
8
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
9
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
10
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
11
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
12
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
13
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
14
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
15
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
16
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
17
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
19
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
20
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरातील रुग्णांपेक्षा एप्रिलमधील रुग्ण अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:25 IST

रत्नागिरी : गेल्या वर्षभरात काेराेनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असतानाच एप्रिल २०२१ महिना जिल्हावासियांच्या चिंतेत भर टाकणारा ठरला आहे. वर्षभरात ...

रत्नागिरी : गेल्या वर्षभरात काेराेनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असतानाच एप्रिल २०२१ महिना जिल्हावासियांच्या चिंतेत भर टाकणारा ठरला आहे. वर्षभरात आढळलेल्या पाॅझिटिव्ह रुग्णांपेक्षा अधिक रुग्ण एप्रिल महिन्यात आढळले आहेत. एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत ११,०२९ रुग्ण आढळले हाेते, तर एप्रिल २०२१ या केवळ एका महिन्यात ११,२५४ पाॅझिटिव्ह रुग्ण सापडले. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या २२,२८३ इतकी झाली झाली.

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असतानाच जनतेसाठी प्रशासनाकडून कडक निर्बंध घालण्यात आले. तरीही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनाकडून चिंता व्यक्त होत आहे. लॉकडाऊनमध्ये नागरिकांनी काळजी न घेतल्याने एप्रिल महिन्यात जास्त प्रमाणात कोरोनाची लागण झाली. जिल्ह्यात महिनाभरात ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढल्याने प्रशासनासह आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग राखत मास्कचा वापर करावा. लॉकडाऊनच्या कालावधीत विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली. तसेच कोराेनाची चाचणीही घेण्यात येत आहे. तरीही नागरिकांचे घराबाहेर पडण्याचे प्रमाण कमी झालेले नाही.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २२,२८३ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत, तर आतापर्यंत एकूण ६५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महिनाभरातील आकडेवारीकडे पाहिले असता, जिल्ह्यात ११,२५४ पाॅझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून, त्यापैकी २८० रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर १४,८६४ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी साेडण्यात आले आहे. त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण रत्नागिरी तालुक्यातील आहेत.

पोलीस यंत्रणेकडून गावे दत्तक

कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने आता पोलीस यंत्रणेकडून गावे दत्तक घेण्यात आली आहेत. ग्रामीण भागात कोरोनाचे प्रमाण वाढ असल्याने पोलिसांकडून या दत्तक घेण्यात आलेल्या गावांमध्ये कोरोनाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. त्यासाठी स्थानिकांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. या गावातील लाेकांचे ऑक्सिजन व तापमान तपासण्यात येणार आहे.

लसीकरण मोहीम जोरात

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच आरोग्य विभागाकडून लसीकरण मोहीम जोरात राबविण्यात येत आहे. लसीकरणामुळे कोरोनाचा मृत्यू दर कमी हाेण्यास मदत हाेणार आहे. लसीमुळे लोकांच्या प्रतिकार शक्तीमध्ये वाढ होऊन रुग्ण कोरोनावर मात करण्यात यशस्वी होतील.