शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

पूर्वी शिवाजी पार्कवर दणदणीत सभा; आता चावडीवर बैठका; उदय सामंतांचा ठाकरे गटावर जोरदार प्रहार 

By मनोज मुळ्ये | Updated: January 8, 2024 19:17 IST

'निवडणुकीपूर्वी पक्षप्रवेश करु, असे इकडे तिकडे सांगतात. अशा लोकांना कालमर्यादा द्यावी'

राजापूर : यापूर्वी शिवाजी पार्कवर ज्यांच्या दणदणीत सभा होत होत्या, त्यांच्यावर चावडीवर बैठका घेण्याची वेळ आली, अशा शब्दात राज्याचे उद्योगमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे शिवसेनेवर जोरदार प्रहार केला. आगामी निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात महायुतीचा खासदार दणदणीत मतांनी विजयी होईल व विरोधकांची अनामत रक्कमही जप्त होईल, असा दावा त्यांनी केला.राजापुरातील राजीव गांधी मैदानावर शिवसेनेच्या शिवसंकल्प अभियानांतर्गत सभेत ते बोलत होते. यापूर्वी १९९० साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची राजापूरला विशाल जाहीर सभा झाली होती. त्यानंतर कोकणातील राजकीय चित्र बदलले आणि शिवसेनेचे सर्वच आमदार विजयी झाले होते. शिवसेनेच्या विजयाची मुहूर्तमेढ राजापुरातून रोवली गेली होती, याची त्यांनी आठवण करुन दिली.मागील १५ महिन्यांच्या काळात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती शासनाने अनेक विकासात्मक निर्णय घेतले. कोकणाला खऱ्या अर्थाने न्याय देऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार केले. रत्नागिरीत सुमारे ५२२ कोटी रुपयांच्या वैद्यकीय महाविद्यालयाला मुख्यमंत्री शिंदे यांच्यामुळे गती मिळाली व ते सुरुही झाले. आगामी लोकसभा निवडणुकीत आपलाच खासदार निवडून येईल आणि विरोधकांची अनामत रक्कमही घालवली जाईल, असे त्यांनी ठामपणे सांगितले.पालकमंत्री सामंत यांनी यावेळी महायुती सरकारने केलेल्या कामांचा विस्तृत उल्लेख केला. आंबा, काजू बोर्डसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतलेली सकारात्मक भूमिका आणि त्यासाठी मंजूर केलेला निधी यावरही त्यांनी प्रकाश टाकला.

सामंत यांचा रोख कोणाकडेकाहीजण आपण मुख्यमंत्री शिंदे यांच्या जवळचे आहोत. निवडणुकीपूर्वी पक्षप्रवेश करु, असे इकडे तिकडे सांगतात. अशा लोकांना कालमर्यादा द्यावी, असे त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. त्यांचा रोख नेमका कोणावर होता, याची चर्चा आता राजापुरात सुरू झाली आहे. हा टोला राजापूरवरुनच हाणलेला नाही ना, असा प्रश्नही आता राजकीय कार्यकर्ते आपापसात करत आहेत.

रिफायनरी, उमेदवारी हे विषय बाजूलाचराजापूर तालुक्यात बहुचर्चित आणि लांबकळत राहिलेली रिफायनरी तसेच शिवसेना आणि भाजपा नेत्यांच्या विधानांमुळे चर्चेत आलेली रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाची उमेदवारी या दोन्ही विषयांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काहीतरी भाष्य करतील, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी सफाईने हे दोन्ही विषय टाळले.

समर्थक, विरोधक मुख्यमंत्र्यांना भेटलेरिफायनरी प्रकल्पाच्या मुद्द्यावरुन प्रकल्प समर्थक आणि विरोधक अशा दोन्ही गटांमधील लोकांनी राजापूर विश्रामगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट स्वतंत्रपणे घेतली. दोन्ही बाजूच्या लोकांनी आपापल्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांकडे सादर केले आहे. मात्र यावेळी कोणती चर्चा झाली, त्याचा तपशील अजून पुढे आलेला नाही.

अनेकांचा पक्षप्रवेशमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत यावेळी काहींनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामध्ये राजापूरचे माजी नगराध्यक्ष हनिफ काझी, रवींद्र बावधनकर, पाचलचे माजी विभागप्रमुख गोपीनाथ उर्फ आप्पा साळवी, तळवडेच्या लोकनियुक्त सरपंच गायत्री साळवी व अन्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे. त्यांचे मुख्यमंत्र्यांनी स्वागत केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंतUddhav Thackerayउद्धव ठाकरे