शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

पूर्वी शिवाजी पार्कवर दणदणीत सभा; आता चावडीवर बैठका; उदय सामंतांचा ठाकरे गटावर जोरदार प्रहार 

By मनोज मुळ्ये | Updated: January 8, 2024 19:17 IST

'निवडणुकीपूर्वी पक्षप्रवेश करु, असे इकडे तिकडे सांगतात. अशा लोकांना कालमर्यादा द्यावी'

राजापूर : यापूर्वी शिवाजी पार्कवर ज्यांच्या दणदणीत सभा होत होत्या, त्यांच्यावर चावडीवर बैठका घेण्याची वेळ आली, अशा शब्दात राज्याचे उद्योगमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे शिवसेनेवर जोरदार प्रहार केला. आगामी निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात महायुतीचा खासदार दणदणीत मतांनी विजयी होईल व विरोधकांची अनामत रक्कमही जप्त होईल, असा दावा त्यांनी केला.राजापुरातील राजीव गांधी मैदानावर शिवसेनेच्या शिवसंकल्प अभियानांतर्गत सभेत ते बोलत होते. यापूर्वी १९९० साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची राजापूरला विशाल जाहीर सभा झाली होती. त्यानंतर कोकणातील राजकीय चित्र बदलले आणि शिवसेनेचे सर्वच आमदार विजयी झाले होते. शिवसेनेच्या विजयाची मुहूर्तमेढ राजापुरातून रोवली गेली होती, याची त्यांनी आठवण करुन दिली.मागील १५ महिन्यांच्या काळात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती शासनाने अनेक विकासात्मक निर्णय घेतले. कोकणाला खऱ्या अर्थाने न्याय देऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार केले. रत्नागिरीत सुमारे ५२२ कोटी रुपयांच्या वैद्यकीय महाविद्यालयाला मुख्यमंत्री शिंदे यांच्यामुळे गती मिळाली व ते सुरुही झाले. आगामी लोकसभा निवडणुकीत आपलाच खासदार निवडून येईल आणि विरोधकांची अनामत रक्कमही घालवली जाईल, असे त्यांनी ठामपणे सांगितले.पालकमंत्री सामंत यांनी यावेळी महायुती सरकारने केलेल्या कामांचा विस्तृत उल्लेख केला. आंबा, काजू बोर्डसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतलेली सकारात्मक भूमिका आणि त्यासाठी मंजूर केलेला निधी यावरही त्यांनी प्रकाश टाकला.

सामंत यांचा रोख कोणाकडेकाहीजण आपण मुख्यमंत्री शिंदे यांच्या जवळचे आहोत. निवडणुकीपूर्वी पक्षप्रवेश करु, असे इकडे तिकडे सांगतात. अशा लोकांना कालमर्यादा द्यावी, असे त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. त्यांचा रोख नेमका कोणावर होता, याची चर्चा आता राजापुरात सुरू झाली आहे. हा टोला राजापूरवरुनच हाणलेला नाही ना, असा प्रश्नही आता राजकीय कार्यकर्ते आपापसात करत आहेत.

रिफायनरी, उमेदवारी हे विषय बाजूलाचराजापूर तालुक्यात बहुचर्चित आणि लांबकळत राहिलेली रिफायनरी तसेच शिवसेना आणि भाजपा नेत्यांच्या विधानांमुळे चर्चेत आलेली रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाची उमेदवारी या दोन्ही विषयांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काहीतरी भाष्य करतील, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी सफाईने हे दोन्ही विषय टाळले.

समर्थक, विरोधक मुख्यमंत्र्यांना भेटलेरिफायनरी प्रकल्पाच्या मुद्द्यावरुन प्रकल्प समर्थक आणि विरोधक अशा दोन्ही गटांमधील लोकांनी राजापूर विश्रामगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट स्वतंत्रपणे घेतली. दोन्ही बाजूच्या लोकांनी आपापल्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांकडे सादर केले आहे. मात्र यावेळी कोणती चर्चा झाली, त्याचा तपशील अजून पुढे आलेला नाही.

अनेकांचा पक्षप्रवेशमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत यावेळी काहींनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामध्ये राजापूरचे माजी नगराध्यक्ष हनिफ काझी, रवींद्र बावधनकर, पाचलचे माजी विभागप्रमुख गोपीनाथ उर्फ आप्पा साळवी, तळवडेच्या लोकनियुक्त सरपंच गायत्री साळवी व अन्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे. त्यांचे मुख्यमंत्र्यांनी स्वागत केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंतUddhav Thackerayउद्धव ठाकरे