शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ल्याची शक्यता; स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
3
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
4
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
5
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
6
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
7
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
8
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
9
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
10
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
11
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
12
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
13
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
14
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
15
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
16
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
17
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
18
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
19
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
20
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना

मिशन विधानसभा! अनेकांना पक्षांतराचे वेध, तर काहींना तिकिटाची चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2019 04:35 IST

युतीच्या निर्णयावर ठरणार अनेक गुणाकार : पक्ष बदलण्याची शक्यता अधिक, अनेक जण तळ्यात-मळ्यात

मनोज मुळेय ।

रत्नागिरी : विद्यमान आमदार हेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे उमेदवार असणार हे निश्चित असले तरी, त्यातील काहींचे पक्ष बदलणार आहेत. त्यामुळे निवडणुका जवळ आल्या असल्या तरी जिल्ह्यात अजून निवडणुकीचे वातावरण तयार झालेले नाही. जिल्ह्यात राजापूर, रत्नागिरी, चिपळूण, गुहागर आणि दापोली असे पाच विधानसभा मतदार संघ आहेत. २0१४ साली राजापूर मतदारसंघात शिवसेनेचे राजन साळवी, रत्नागिरीत शिवसेनेचे उदय सामंत, चिपळूणमध्ये शिवसेनेचे सदानंद चव्हाण, गुहागरात राष्ट्रवादीचे भास्कर जाधव आणि दापोलीत राष्ट्रवादीचे संजय कदम विजयी झाले.

पाचपैकी तीन मतदारसंघ शिवसेनेकडे आणि दोन मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असे चित्र २0१४ साली विधानसभा निवडणुकीत दिसले असले तरी त्यानंतर झालेल्या नगराध्यक्ष निवडणुकीत सर्वाधिक नगरसेवक आणि नगराध्यक्ष शिवसेनेचे निवडून आले. शिवाय, जिल्हा परिषदेत सत्ता मिळवली. लोकसभा निवडणुकीतही शिवसेनेनेच सर्वाधिक मते घेतली. त्यामुळे आजच्या घडीला शिवसेना हाच जिल्ह्यात सर्वात सक्षम पक्ष आहे.

राजापूर, रत्नागिरी येथे शिवसेनेचा बोलबाला आहे. चिपळूणमध्ये गतवेळी सदानंद चव्हाण यांना राष्ट्रवादीच्या शेखर निकम यांच्यासमोर केवळ ६0६८ मतांची, तर दापोलीत संजय कदम यांना सेनेच्या सूर्यकांत दळवी यांच्यासमोर ३,७८४ मतांची आघाडी मिळाली होती. याहीवेळी या दोन ठिकाणी चुरशीची लढत अपेक्षित आहे. सध्या अनेक नेत्यांच्या पक्षांतराच्या चर्चा सुरू आहे. राजापूरमध्ये राष्ट्रवादीकडून तिकिटाची अपेक्षा करणारे अजित यशवंतराव काँग्रेसकडूनही इच्छुक आहेत. रत्नागिरीत एक बडा लोकप्रतिनिधी शिवसेनेतून भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहे. गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्याशी खासदार विनायक राऊत यांनी आस्थेवाईकपणे केलेली चर्चा राजकारणाला वेगळी दिशा देऊ शकते. दापोलीत सूर्यकांत दळवी यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली आहे. आता त्यांच्याजागी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांचे सुपुत्र योगेश कदम उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. राष्ट्रवादीचे संजय कदम यांच्याशी भाजप विशेष संपर्कात आहे. अर्थात शिवसेना आणि भाजपची युती झाली नाही तरच त्या चर्चा अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचतील, हे निश्चित आहे.

जिल्ह्यातील पाचही मतदार संघात हे असे काहीसे अस्थिर वातावरण आहे. शिवसेना हा सक्षम पक्ष असला तरी भाजपने सर्व मतदार संघात लढण्याची तयारी केली आहे. त्यासाठीच दमदार नेते पक्षात घेण्यावर अधिक भर दिला जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यात दुसºया क्रमांकावर असलेली राष्ट्रवादी काँग्रेस आता खूप मोठ्या प्रमाणात ढेपाळली आहे. सद्यस्थितीत गुहागर आणि दापोली या दोन मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार असल्याने तेथे या दोन पक्षांची ताकद आहे. मात्र, तेथेही शिवसेना प्रबळ आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला येत्या विधानसभा निवडणुकीत फार मोठी संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चित्र शिवसेना आणि भाजपच्या युतीच्या निर्णयावर अवलंबून आहे. युती झाली तर युती विरूद्ध काँग्रेस आघाडी असे पारंपरिक चित्र दिसेल. मात्र युती झाली नाही तर आयात नेत्यांच्या ताकदीवर भाजपकडून शिवसेनेला जोरदार टक्कर दिली जाईल.गेल्या निवडणुकीत दुसºया क्रमांकावरील उमेदवार : शिवसेना १, भाजप २, राष्ट्रवादी १, काँग्रेस १सध्याचे पक्षीय बलाबल : एकूण जागा ५ : शिवसेना ३, राष्ट्रवादी २सर्वात मोठा विजयरत्नागिरी : उदय सामंत (शिवसेना) मते - ९३,८७६(पराभव : बाळ माने, भाजप)सर्वात कमीमताधिक्याने पराभवदापोली : सूर्यकांत दळवी - (शिवसेना) ३७८४(विजयी : संजय कदम - राष्ट्रवादी)

टॅग्स :Bhaskar Jadhavभास्कर जाधवRatnagiriरत्नागिरीElectionनिवडणूकShiv Senaशिवसेना