शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

मिशन विधानसभा! अनेकांना पक्षांतराचे वेध, तर काहींना तिकिटाची चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2019 04:35 IST

युतीच्या निर्णयावर ठरणार अनेक गुणाकार : पक्ष बदलण्याची शक्यता अधिक, अनेक जण तळ्यात-मळ्यात

मनोज मुळेय ।

रत्नागिरी : विद्यमान आमदार हेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे उमेदवार असणार हे निश्चित असले तरी, त्यातील काहींचे पक्ष बदलणार आहेत. त्यामुळे निवडणुका जवळ आल्या असल्या तरी जिल्ह्यात अजून निवडणुकीचे वातावरण तयार झालेले नाही. जिल्ह्यात राजापूर, रत्नागिरी, चिपळूण, गुहागर आणि दापोली असे पाच विधानसभा मतदार संघ आहेत. २0१४ साली राजापूर मतदारसंघात शिवसेनेचे राजन साळवी, रत्नागिरीत शिवसेनेचे उदय सामंत, चिपळूणमध्ये शिवसेनेचे सदानंद चव्हाण, गुहागरात राष्ट्रवादीचे भास्कर जाधव आणि दापोलीत राष्ट्रवादीचे संजय कदम विजयी झाले.

पाचपैकी तीन मतदारसंघ शिवसेनेकडे आणि दोन मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असे चित्र २0१४ साली विधानसभा निवडणुकीत दिसले असले तरी त्यानंतर झालेल्या नगराध्यक्ष निवडणुकीत सर्वाधिक नगरसेवक आणि नगराध्यक्ष शिवसेनेचे निवडून आले. शिवाय, जिल्हा परिषदेत सत्ता मिळवली. लोकसभा निवडणुकीतही शिवसेनेनेच सर्वाधिक मते घेतली. त्यामुळे आजच्या घडीला शिवसेना हाच जिल्ह्यात सर्वात सक्षम पक्ष आहे.

राजापूर, रत्नागिरी येथे शिवसेनेचा बोलबाला आहे. चिपळूणमध्ये गतवेळी सदानंद चव्हाण यांना राष्ट्रवादीच्या शेखर निकम यांच्यासमोर केवळ ६0६८ मतांची, तर दापोलीत संजय कदम यांना सेनेच्या सूर्यकांत दळवी यांच्यासमोर ३,७८४ मतांची आघाडी मिळाली होती. याहीवेळी या दोन ठिकाणी चुरशीची लढत अपेक्षित आहे. सध्या अनेक नेत्यांच्या पक्षांतराच्या चर्चा सुरू आहे. राजापूरमध्ये राष्ट्रवादीकडून तिकिटाची अपेक्षा करणारे अजित यशवंतराव काँग्रेसकडूनही इच्छुक आहेत. रत्नागिरीत एक बडा लोकप्रतिनिधी शिवसेनेतून भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहे. गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्याशी खासदार विनायक राऊत यांनी आस्थेवाईकपणे केलेली चर्चा राजकारणाला वेगळी दिशा देऊ शकते. दापोलीत सूर्यकांत दळवी यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली आहे. आता त्यांच्याजागी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांचे सुपुत्र योगेश कदम उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. राष्ट्रवादीचे संजय कदम यांच्याशी भाजप विशेष संपर्कात आहे. अर्थात शिवसेना आणि भाजपची युती झाली नाही तरच त्या चर्चा अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचतील, हे निश्चित आहे.

जिल्ह्यातील पाचही मतदार संघात हे असे काहीसे अस्थिर वातावरण आहे. शिवसेना हा सक्षम पक्ष असला तरी भाजपने सर्व मतदार संघात लढण्याची तयारी केली आहे. त्यासाठीच दमदार नेते पक्षात घेण्यावर अधिक भर दिला जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यात दुसºया क्रमांकावर असलेली राष्ट्रवादी काँग्रेस आता खूप मोठ्या प्रमाणात ढेपाळली आहे. सद्यस्थितीत गुहागर आणि दापोली या दोन मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार असल्याने तेथे या दोन पक्षांची ताकद आहे. मात्र, तेथेही शिवसेना प्रबळ आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला येत्या विधानसभा निवडणुकीत फार मोठी संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चित्र शिवसेना आणि भाजपच्या युतीच्या निर्णयावर अवलंबून आहे. युती झाली तर युती विरूद्ध काँग्रेस आघाडी असे पारंपरिक चित्र दिसेल. मात्र युती झाली नाही तर आयात नेत्यांच्या ताकदीवर भाजपकडून शिवसेनेला जोरदार टक्कर दिली जाईल.गेल्या निवडणुकीत दुसºया क्रमांकावरील उमेदवार : शिवसेना १, भाजप २, राष्ट्रवादी १, काँग्रेस १सध्याचे पक्षीय बलाबल : एकूण जागा ५ : शिवसेना ३, राष्ट्रवादी २सर्वात मोठा विजयरत्नागिरी : उदय सामंत (शिवसेना) मते - ९३,८७६(पराभव : बाळ माने, भाजप)सर्वात कमीमताधिक्याने पराभवदापोली : सूर्यकांत दळवी - (शिवसेना) ३७८४(विजयी : संजय कदम - राष्ट्रवादी)

टॅग्स :Bhaskar Jadhavभास्कर जाधवRatnagiriरत्नागिरीElectionनिवडणूकShiv Senaशिवसेना