शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
3
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
4
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
5
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
6
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
7
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
8
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
9
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
10
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
11
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
12
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
13
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
14
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
15
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
16
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
17
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
18
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
19
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
20
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!

मोदी, शाह यांची भाजप संघाला मान्य आहे का, उद्धव ठाकरेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 14:27 IST

भाजपच्या मतदारांनीही विचार करावा, शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी घ्या, बतावणी नको

रत्नागिरी : ज्यांनी भाजप रुजवला ते लोक आता नको आहेत. भाजपचे अध्यक्ष नड्डा सांगतात की, आम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज नाही. मोदी आणि शाह यांचा हा नवा भाजप संघाला मान्य आहे का, भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांना मान्य आहे का, असा प्रश्न उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीतील जाहीर सभेत केला. भाजपच्या मतदारांनीही हा विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.उद्धवसेनेचे रत्नागिरीतील उमेदवार बाळ माने, राजापुरातील उमेदवार राजन साळवी यांच्या प्रचारासाठी रत्नागिरीतील साळवी स्टॉप येथे उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी भाजप तसेच मंत्री उदय सामंत यांच्यावर टीका केली.

यावेळी व्यासपीठावर माजी खासदार विनायक राऊत, आमदार मिलिंद नार्वेकर, आमदार भास्कर जाधव, आमदार राजन साळवी, माजी मंत्री रवींद्र माने, माजी आमदार सुभाष बने, रमेश कदम, हुस्नबानू खलिफे, महाविकास आघाडीचे चिपळूणचे उमेदवार प्रशांत यादव, बशीर मुर्तुझा, मिलिंद कीर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

आपल्यावर घराणेशाहीचा आरोप केला जातो. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यात दोन भाऊ निवडणूक लढवत आहेत, सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन भाऊ आणि त्यांचे वडील राजकारणात आहेत. त्यावर कोणी बोलत नाही, असे ठाकरे यांनी सांगितले. यावेळी मंत्री सामंत यांच्यावरही त्यांनी टीका केली. २०१४ साली आयत्या वेळी भाजपने युती होणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे उमेदवारी कोणाला द्यावी, असा प्रश्न होता. त्यावेळी उदय सामंत आमच्याकडे आले आणि त्यांना उमेदवारी देऊन मी चूक केली. त्यांना मंत्री बनवण्याचा शब्द दिला आणि तो आपण पाळलाही. मात्र, तरीही ते आपल्याला सोडून गेले, असा आरोप त्यांनी केला.आताची निवडणूक ही महाराष्ट्राच्या अस्मितेची निवडणूक आहे, असे सांगताना त्यांनी महाविकास आघाडीच्या आगामी धोरणांची घोषणा केली. शिक्षण, रोजगार, महिलांची सुरक्षितता, धान्याचे स्थिर भाव याबाबत त्यांनी विस्ताराने माहिती केली.

सुरुवातीला उद्धवसेनेचे मंगेश साळवी, राष्ट्रवादीचे मिलिंद कीर, आमदार राजन साळवी, आमदार भास्कर जाधव, रत्नागिरीचे उमेदवार बाळ माने यांची भाषणे झाली.

बारसू रिफायनरी प्रकल्प हद्दपार करणारजर आपली सत्ता आली तर बारसू रिफायनरी हद्दपार केली जाईल, असे उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात सांगितले. हा प्रकल्प चांगला असल्याचे चित्र आपल्यासमोर निर्माण करण्यात आले होते. त्यामुळे बारसू येथील जागेचा पर्याय आपण पुढे केला. मात्र, जर तो प्रकल्प जनतेला नको असेल तर तो हद्दपार करू, असे ते म्हणाले.

सुनावणी घ्या, बतावणी नकोसर्वोच्च न्यायालयासमोर ८ नोव्हेंबरला शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी होणार आहे. अडीच वर्षे हे सर्व सुरू आहे. आता न्यायालयाने सुनावणी घ्यावी, बनावणी नको, असेही ते थेट म्हणाले. न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी काढण्यात आली आहे. आता तरी न्यायदेवतेला सर्व काही दिसेल, अशी आपल्याला आशा आहे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ratnagiri-acरत्नागिरीUddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघthane kokan regionThane Kokan Assembly Election 2024