शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच घेतली
2
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
3
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
4
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
5
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
6
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
7
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
8
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
9
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
10
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
11
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
12
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
13
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
14
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
15
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
16
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
17
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
18
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
19
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट

मोदी, शाह यांची भाजप संघाला मान्य आहे का, उद्धव ठाकरेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 14:27 IST

भाजपच्या मतदारांनीही विचार करावा, शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी घ्या, बतावणी नको

रत्नागिरी : ज्यांनी भाजप रुजवला ते लोक आता नको आहेत. भाजपचे अध्यक्ष नड्डा सांगतात की, आम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज नाही. मोदी आणि शाह यांचा हा नवा भाजप संघाला मान्य आहे का, भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांना मान्य आहे का, असा प्रश्न उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीतील जाहीर सभेत केला. भाजपच्या मतदारांनीही हा विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.उद्धवसेनेचे रत्नागिरीतील उमेदवार बाळ माने, राजापुरातील उमेदवार राजन साळवी यांच्या प्रचारासाठी रत्नागिरीतील साळवी स्टॉप येथे उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी भाजप तसेच मंत्री उदय सामंत यांच्यावर टीका केली.

यावेळी व्यासपीठावर माजी खासदार विनायक राऊत, आमदार मिलिंद नार्वेकर, आमदार भास्कर जाधव, आमदार राजन साळवी, माजी मंत्री रवींद्र माने, माजी आमदार सुभाष बने, रमेश कदम, हुस्नबानू खलिफे, महाविकास आघाडीचे चिपळूणचे उमेदवार प्रशांत यादव, बशीर मुर्तुझा, मिलिंद कीर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

आपल्यावर घराणेशाहीचा आरोप केला जातो. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यात दोन भाऊ निवडणूक लढवत आहेत, सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन भाऊ आणि त्यांचे वडील राजकारणात आहेत. त्यावर कोणी बोलत नाही, असे ठाकरे यांनी सांगितले. यावेळी मंत्री सामंत यांच्यावरही त्यांनी टीका केली. २०१४ साली आयत्या वेळी भाजपने युती होणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे उमेदवारी कोणाला द्यावी, असा प्रश्न होता. त्यावेळी उदय सामंत आमच्याकडे आले आणि त्यांना उमेदवारी देऊन मी चूक केली. त्यांना मंत्री बनवण्याचा शब्द दिला आणि तो आपण पाळलाही. मात्र, तरीही ते आपल्याला सोडून गेले, असा आरोप त्यांनी केला.आताची निवडणूक ही महाराष्ट्राच्या अस्मितेची निवडणूक आहे, असे सांगताना त्यांनी महाविकास आघाडीच्या आगामी धोरणांची घोषणा केली. शिक्षण, रोजगार, महिलांची सुरक्षितता, धान्याचे स्थिर भाव याबाबत त्यांनी विस्ताराने माहिती केली.

सुरुवातीला उद्धवसेनेचे मंगेश साळवी, राष्ट्रवादीचे मिलिंद कीर, आमदार राजन साळवी, आमदार भास्कर जाधव, रत्नागिरीचे उमेदवार बाळ माने यांची भाषणे झाली.

बारसू रिफायनरी प्रकल्प हद्दपार करणारजर आपली सत्ता आली तर बारसू रिफायनरी हद्दपार केली जाईल, असे उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात सांगितले. हा प्रकल्प चांगला असल्याचे चित्र आपल्यासमोर निर्माण करण्यात आले होते. त्यामुळे बारसू येथील जागेचा पर्याय आपण पुढे केला. मात्र, जर तो प्रकल्प जनतेला नको असेल तर तो हद्दपार करू, असे ते म्हणाले.

सुनावणी घ्या, बतावणी नकोसर्वोच्च न्यायालयासमोर ८ नोव्हेंबरला शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी होणार आहे. अडीच वर्षे हे सर्व सुरू आहे. आता न्यायालयाने सुनावणी घ्यावी, बनावणी नको, असेही ते थेट म्हणाले. न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी काढण्यात आली आहे. आता तरी न्यायदेवतेला सर्व काही दिसेल, अशी आपल्याला आशा आहे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ratnagiri-acरत्नागिरीUddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघthane kokan regionThane Kokan Assembly Election 2024