शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
6
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
7
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
8
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
9
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
10
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
11
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
12
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
13
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
14
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
15
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
16
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
17
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
18
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
19
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
20
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश

फसल पीक विमा योजनेकडे पाठ, रत्नागिरी जिल्ह्यातील १२१४ शेतकऱ्यांनी घेतला लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 15:50 IST

रत्नागिरी जिल्ह्यात फळपीक विमा योजनेसाठी शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभत असताना खरीप हंगामात शेतकऱ्यांची विमा योजनेप्रती अनास्था असलेली निदर्शनास येत आहे. गतवर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील १२१४ शेतकऱ्यांनी लाभ घेतला होता. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी शेतकऱ्यांची संख्या वाढली असून, १९९९ शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. खरीप हंगामासाठी ५६ हजार ६९ शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले आहे. पंतप्रधान फसल पीक विमा योजनेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे.

ठळक मुद्देखरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ४ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

रत्नागिरी : जिल्ह्यात फळपीक विमा योजनेसाठी शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभत असताना खरीप हंगामात शेतकऱ्यांची विमा योजनेप्रती अनास्था असलेली निदर्शनास येत आहे. गतवर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील १२१४ शेतकऱ्यांनी लाभ घेतला होता. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी शेतकऱ्यांची संख्या वाढली असून, १९९९ शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. खरीप हंगामासाठी ५६ हजार ६९ शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले आहे. पंतप्रधान फसल पीक विमा योजनेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे.हवामानातील सातत्यपूर्ण बदलामुळे पिकाच्या उत्पादनावर परिणाम होत असल्याने शेतऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. परिणामी विमा योजनेव्दारे पिकासाठी केलेला खर्च तरी किमान भरून निघावा, यासाठी शासनाने खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू केली.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत भात व नाचणी पिकाचा समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यातील कुळाने किंवा भाडेपट्ट्याने शेती करणाऱ्यांना शेतकऱ्यांचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे. पीक विमा योजनेत सहभाग घेतल्यानंतर पिकांना विमा संरक्षण मिळते. पीक पेरणीपासून कापणीपर्यंतच्या कालावधीत उत्पादनात येणारी घट पीक पेरणीपूर्व लावणीपूर्व नुकसानभरपाई निश्चित करणे, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत नुकसानभरपाई निश्चित करणे, काढणीपश्चात नुकसान, स्थानिक नैसर्गिक आपत्ती यामुळे पिकाचे नुकसान याची दखल घेण्यात येते.यावर्षी या योजनेची अंमलबजावणी करण्याकरिता इफ्को टोकियो इन्सुरन्स कंपनी लि. या विमा कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. सुरुवातीला २३ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, शेतकऱ्यांच्या अल्प प्रतिसादामुळेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ४ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.

गतवर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील १२१४ शेतकऱ्यांनी लाभ घेतला होता. ६६६.१ हेक्टर क्षेत्राचा विमा काढला होता. संबंधित क्षेत्राची विमा संरक्षित रक्कम २ कोटी ५९ लाख ७६ हजार ८४७ असताना विमा हफ्त्याची ५ लाख १९ हजार ५७६.३ इतकी रक्कम शेतकऱ्यांनी जमा केली होती.गतवर्षी भात पिकासाठी प्रतिहेक्टरी ३९००० रूपये मिळून २ कोटी ५९ लाख ७६ हजार ८४७ इतकी विमा संरक्षित रक्कम शेतकऱ्यांना मिळाली होती. यावर्षी एकूण १९९९ शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री फसल पीक विमा योजनेसाठी प्रस्ताव सादर केला असून, ५६२ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षणाखाली आले आहे. शेतकऱ्यांनी ४ लाख ७१ हजार ७०५ रूपये विमा संरक्षित रक्कम भरली असून, त्यासाठी २ कोटी ३५ लाख ८५ हजार ३१७ रूपयांचा परतावा मिळणे अपेक्षित आहे.मुख्य पीक भातजिल्ह्याचे मुख्य पीक भात असून, फळबाग लागवडही मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. कमी श्रमात अधिक उत्पन्न घेण्याच्या दृष्टीने शासनाकडून विविध योजनांची अंमलबजावणी सुरू आहे. जिल्ह्यात ७० हजार ९१० हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड केली जाते. दुय्यम पीक म्हणून नागली लावण्यात येते. १४ हजार ७५० हेक्टर क्षेत्रावर नागली लागवड केली जाते. ८०९ हेक्टर क्षेत्रावर कडधान्य, ११८० हेक्टर क्षेत्रावर भाजीपाला तसेच ९१३० हेक्टर क्षेत्रावर तृणधान्य, गळितधान्य १०० हेक्टर क्षेत्रावर लावण्यात येते.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाRatnagiriरत्नागिरीFarmerशेतकरी