शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

कोकण तीन लाख कोटीच्या प्रकल्पाला मुकणार, कंपनीचा नाणारला गुडबाय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 1:27 PM

nanar refinery project Ratnagiri : तालुक्यातील बारसू - सोलगांव येथील जागेसाठी रिफायनरी कंपनीचे अखेरचे प्रयत्न सुरू असून यात देखील अपयश आल्यास कंपनी महाराष्ट्राच्या बाहेर प्रकल्प नेण्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

ठळक मुद्देनाणार प्रकल्प : रत्नागिरी रिफायनरी कंपनीचा नाणारला गुडबाय ! बारसू, सोलगांवमध्येशेवटचा प्रयत्नः अन्यथा गाशा गुंडाळणार

राजापूरः गेली दोन वर्षे राजकीय धुळवड उडवून राजापूर तालुक्याला राज्याच्या नकाशावर आणणाऱ्या नाणार येथील सात महसूली गावांतील चौदा वाड्यांना अखेर रत्नागिरी रिफायनरी प्रकल्प कंपनीने बाय - बाय केले आहे. यामुळे शिवसेनेच्या दृष्टीने नाणार विषय संपलेला असतानाच आता रत्नागिरी रिफायनरी कंपनीनेही नाणारमधील जागेचा विषय संपुष्टात आणला आहे. दरम्यान तालुक्यातील बारसू - सोलगांव येथील जागेसाठी रिफायनरी कंपनीचे अखेरचे प्रयत्न सुरू असून यात देखील अपयश आल्यास कंपनी महाराष्ट्राच्या बाहेर प्रकल्प नेण्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

नाणारमधील पूर्वी प्रस्तावित असलेल्या चौदा गावांतील तब्बल साडेआठ हजार एकराचे जमीनमालक असलेल्या शेतकरी व भूधारकांनी त्या भागात रिफायनरी व्हावी यासाठी जोरदार प्रयत्न करून शासनापर्यंत लेखी संमतीपत्रे पोहोचवली होती. मात्र उध्दव ठाकरे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख असताना जाहिर केलेली नाणार विरोधाची भूमिका राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतरही कायम ठेवल्याने अखेर रत्नागिरी रिफायनरी कंपनीने या जागेतून काढता पाय घेतला आहे. यामुळे नाणार होणार नाही हा शिवसेनेचा मनसुबा खरा ठरून शिवसेनेच्या नेतेमंडळींनी बाजी मारली आहे.

दरम्यान नाणारनंतर राजापूर तालुक्यातीलच शहरानजिकच्या बारसू - व सोलगांव याठिकाणच्या जागेत रिफायनरी कंपनीने आपला मोर्चा वळवला आहे. याठिकाणी शिवसेनेच्याच उद्योगमंत्र्यांनी एमआयडीसी अंतर्गत बारसू , सोलगांव , वरचीवाडी याठिकाणी २३०० एकरासाठी अधिसूचना काढलेली आहे. तर धोपेश्वर ग्रामपंचायत हद्दीतील बारसू , पन्हळे , गोवळ ग्रामपंचायत हद्दीतील गोवळ , वरचीवाडी व खालचीवाडी, ग्रामपंचायत सोलगांव ग्रामपंचायत शिवणेखुर्द व देवाचेगोठणे ग्रामपंचायत हद्दीतील देवाचेगोठणे, बुरंबेवाडी, राऊतवाडी व सोगमवाडी आदि भाग मिळून सुमारे ११ हजार पाचशे एकर जमीनीची उपलब्धता आहे.

याठिकाणी धोपेश्वर गावची जमीन प्रस्तावित नाही. शिवाय विशेष म्हणजे तब्बल या साडेअकरा हजार एकरात एकाही गाव अथवा वाडीचे विस्थापन नसल्याने रिफायनरी कंपनीसाठी ही बाब लाभदायक ठरली आहे. नजिकच्या एक - दोन महिन्यात बारसू - सोलगांव भागात नाग रिकांच्या गाठीभेटी घेऊन प्रकल्पाबाबत माहिती देण्यात येणार आहे. या भागातही बऱ्याच ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्यात असल्याने सेनेची भूमिक महत्वाची ठरणार आहे . मात्र याठिकाणीही नाणारचीच री ओढण्यात आल्यास कंपनी जिल्ह्यातून गाशा गुंडाळणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत .

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्पRajapurराजापुरRatnagiriरत्नागिरीShiv Senaशिवसेना