शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
2
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
3
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
4
"लग्न करुन येऊ? घर देणार का मग?", अ‍ॅक्टर असल्यामुळे मिळत नाहीये घर, पूजा कार्तुडे संतापली!
5
इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य
6
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
7
२०२७ पर्यंत ३ राशींना साडेसाती कायम, २ राशींवर शनि दृष्टी; अशुभ प्रभाव वाढेल? ‘हे’ उपाय कराच
8
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
9
ENG vs IND : यशस्वी जैस्वाल इंग्लंडला नडला अन् कॅप्टन बेन स्टोक्सलाही भिडला; नेमकं काय घडलं?
10
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
11
काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा पुढाकार; ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या
12
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)
13
मुसळधार पावसात AC सुरू ठेवणं योग्य आहे का? बहुतेक लोक करतात 'ही' चूक
14
राहुल आणि सोनिया गांधींनी केलेला २००० कोटी रुपये लाटण्याचा प्रयत्न; ईडीचा मोठा आरोप
15
भयंकर! कुत्रा चावल्यामुळे कबड्डीपटूचा तडफडून मृत्यू; अँटी रेबीज इंजेक्शन न घेणं बेतलं जीवावर
16
लग्नाआधीच अनेकदा तुझ्या रूममध्ये का दिसायची रितिका? भज्जीच्या प्रश्नावर रोहित शर्माचं भन्नाट उत्तर
17
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
18
काय वाटले असेल...? एनआयटी टॉपरला ४५ लाखांचे पॅकेज मिळाले अन् अचानक नोकरीवरून काढले...
19
Pitru Paksha 2025: यंदा पितृपक्षावर दोन ग्रहणांचे सावट; श्राद्धविधीत होणार अडचण? 
20
अवघी दिल्ली एवढी लोकसंख्या, तरीही भारताच्या दृष्टीने 'घाना' देश महत्त्वाचा! कारण तरी काय?

काजू उत्पादनावर कोकण क्रांती करू शकतो : उदय सामंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 18:54 IST

रत्नागिरी : ब्राझीलप्रमाणे कोकणही काजू उत्पादनावर क्रांती करू शकतो. कृषी प्रदर्शनाचा उपयोग करून शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोग करावेत, असे प्रतिपादन ...

रत्नागिरी : ब्राझीलप्रमाणे कोकणही काजू उत्पादनावर क्रांती करू शकतो. कृषी प्रदर्शनाचा उपयोग करून शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोग करावेत, असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्रीउदय सामंत यांनी केले.रत्नागिरीत सुरू असलेल्या कृषी तंत्रज्ञान विस्तार सप्ताह व कृषी विकास परिषदेअंतर्गत जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी, तसेच विविध स्पर्धांतील विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार मंत्री सामंत यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले, राज्यमंत्री योगेश कदम, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव उपस्थित होते.मंत्री सामंत म्हणाले की, रत्नागिरीच्या हापूसची आंतरराष्ट्रीय दर्जावर विक्री होते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जगातील विविध पिकांच्या लागवडीकडे वळले पाहिजे. भात, नाचणी, फळबागांचे लागवड क्षेत्र वाढले पाहिजे. नोकरीपेक्षा १० पट पैसे हे शेतीमधून मिळवू शकतो. त्यासाठी शेती वाढविली पाहिजे. निसर्ग सुधारायचा असेल आणि प्रक्रिया उद्योग निर्माण करायचा असेल तर बांबू लागवडीला पर्याय नाही. पुढील कृषी प्रदर्शन हे राज्यातील प्रथम क्रमांकाचे असेल, अशी ग्वाही मंत्री सामंत यांनी दिली.मंत्री भरत गोगावले म्हणाले की, फळबाग लागवडीसाठी १०० टक्के फलोत्पादन योजना सुरू करणारा ऐतिहासिक निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतला जाईल. फळबाग वाढीसाठीचे यंदाचे १९०० हेक्टर उद्दिष्ट पूर्ण करावे, म्हणजे मुंबईत होणारे स्थलांतर थांबेल. शासनाच्या योजनांचा फायदा घेऊन शेतकऱ्यांनी शेती व्यवसाय वाढवावा, असे आवाहन त्यांनी केले.मंत्री योगेश कदम म्हणाले की, शेती हा व्यवसाय म्हणून उदयास येत असून, तो विकसित होत आहे. शेतीपूरक व्यवसाय वाढविण्यासाठी जलसंधारणाची कामे पूर्ण करून पाणी अडवण्याची मोहीमही राबवावी, असे त्यांनी सांगितले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी यावेळी स्वागत व प्रास्ताविक केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीministerमंत्रीUday Samantउदय सामंत